पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ख्वाहिशे

कभी दबे पाँव जो मिलने आती है , कोई देख न ले जाते हुए इसलिए  चुपकेसे चली जाती है ख्वाहिशें। समझदारी ने कंधोपे जो बोझ रख दिया है  वो देखके जाते जाते  हल्केसे मुस्कुराती है ख्वाहिशें। हमारी मुलाकात में  मुझे मिल जाता है सुकून न जाने कैसा, हलका हलका लगने लगता है उतरा हो कोई कर्ज जैसा। ५.३.२०२० #गौरीहर्षल

समांतर

दोन समांतर रेषा आहोत आपण एकाच दिशेने जाणाऱ्या पण तरीही वाटा वेगळ्याच आहेत आपल्या स्वतःच्या धुंदीत वळणाऱ्या तू शोधत आहेस तुझ्या मनातलं सुख चौफेर माझ्या मनात मात्र सतत आठवणींचा फेर तुझ्या वाटेवर आहेत असंख्य व्यक्ती  वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी धावणाऱ्या माझ्या वाटेवर आहेत सावल्या मुखवट्या मागे लपणाऱ्या तुला झाली आहे सवय  खोट्यालाही  खर मानून जगण्याची मला अजूनही आहे जुनीच खोड  खऱ्यालाही पारखून घेण्याची चुकून कधी आपल्या नजरा एकमेकांना भिडल्या तर हसतो आपण सवयीने पण तुला आणि मला ही माहिती आहे कायमस्वरूपी वेगळे ठेवले आहे आपल्याला  नियतीने समांतर असण्याचे आपले असे फायदे आहेत तुझ्या माझ्या जगाचे आपापले कायदे आहेत 26.2.2020

गीतसप्तक भाग ५

#गीतसप्तक मन धागा धागा मला आवडलेलं हे अजून एक गाणं. ह्याचं  प्रत्येक कडवं मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय.  १.        असे कसे बोलायचे न बोलता आता        तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता        डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता        सांगा जरा असे कसे लपायचे रे आता          मन धागा धागा जोडते नवा           मन धागा धागा रेशमी दुवा   तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं..... २.               एकटी मी दिनरात तरीही तू भोवती                हातात नाही हात तरीही तू सोबती                      मन बेभान बेभान

गीतसप्तक भाग ४

#गीतसप्तक कितीक् हळवे, कितीक् सुंदर,  किती शहाणे आपूले अंतर हे गाणं ऐकताना मला नेहमी असं वाटत राहतं की असं समंजस मैत्रीचं नातं कुणासोबत तरी जुळवून यावं. एकमेकांना समजून घेत असतानाच एकमेकांना हवी तितकी स्पेस देणंही तितकंच गरजेचं असतं. अर्थात ही प्रक्रिया दोन्हीकडून व्हायला हवी तरच अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो. आणि हे खरं तर फक्त मैत्रीतच होण्याऐवजी प्रत्येक नात्यात व्हावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने याचा वेगळा अर्थही सुचेल कदाचित.  पण कधी कधी स्वतःच्या असण्याचा हट्ट न धरताही बरेच जण आपल्या मनात घर करून जातात. अशा लोकांना रोज भेटण्याची,बोलण्याची गरज नसते. पण गरज पडलीच तर पहिल्या हाकेला ह्या व्यक्ती धावत येतील ही खात्री असते. अशी माणसं, अशी नाती मनापासून जपण्याची हल्ली खूप गरज पडतेय. कारण योग्य वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर ह्या व्यक्ती अलिप्त होतात त्यांच्याही नकळत. अर्थात नातं तोडणं त्यांना कधीच मान्य नसतं खरतर त्यांना जमणारच नसतं. पण मग असून अडचण नसून खोळंबा होण्यापेक्षा थोड्याश्या अंतरावरूनच ते सर्व काही बघत राहतात. व्यक्तिपरत्वे जसे स्वभाव वेगळे तस

गीतसप्तक भाग ३

इमेज
#गीतसप्तक असावा सुंदर चॉकलेटचा बंगला 'चॉकलेटचा बंगला' कल्पनाच किती मस्त आहे ना? चॉकलेट आवडत नाही अशी फार कमी माणसं आजूबाजूला सापडतील. लहान मुलांना आपल्या पार्टीत घ्यायचं म्हटलं की मोठया ताईदादांच्या कडून हमखास दाखवलं जाणारं आमिष.  प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचे तोटेही आहेतच. पण आज नको त्यावर बोलायला. पूर्वी काही ठराविक चॉकलेट मिळायची आता मात्र इतके सगळे प्रकार, इतक्या सगळ्या चवी असतात की खाणारा गोंधळून जातो.  लहान मुलांच्या मनोराज्यात हळूच शिरून लहान होऊन गेल्याचं फिलींग हे गाणं देतं. ह्या गाण्याच्या संकल्पनेशी मिळताजुळता एक धडाही होता मला. त्यात कलिंगडाचं घर होतं. भर उन्हाळ्यात अशा मस्त कलिंगडाच्या घरात आपण राहतोय ही आयडियाच भारी वाटायची खरंतर अजूनही वाटते.  किती छान असतं ना ते विश्व कसल्याच चिंता काळज्या नसतात. कुणाशी शत्रुत्व नसतं,कसलेही हेवेदावे नसतात. फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो आयुष्यात. मैत्री,नाती सगळी अगदी मनापासून निभावली जातात. म्हणून तर अगदी प्रत्येकाला मोठं झालं की बालपण खुणावत असतं. जितकं निरागस मुलांचं विश्व असतं तितकंच किंबहुना त्याच्या जवळपास सुद्धा न जाणारं जग

गीतसप्तक भाग २

इमेज
#गीतसप्तक भाग २ बस इतना सा ख्वाब है  जो भी चाहूँ वो मैं पाऊँ जिंदगी में जीत जाऊं चाँद तारे तोड़ लाऊं सारी दुनिया पर मैं छाऊँ बस इतना सा ख्वाब है   आपल्याला कळतही नसतं तेंव्हापासून  आपण स्वप्नं बघत असतो. ही स्वप्न म्हणजे नक्की काय असतं तर आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छा. त्या कधी आपण उघड उघड सांगतो कधी नाही सांगत. पण हे गाणं मात्र प्रत्येकाच्याच मनात कधी न कधी येणाऱ्या इच्छा सांगतं. मलातरी आवडतं स्वप्नं बघायला काही क्षणांसाठी का होईना त्या जगात हरवून जायला.  अर्थात एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंतच तिची ओढ असते. यावरून अजून एका गाण्याची ओळ आठवली, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा. एखादं गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जितकी जिवापाड मेहनत करतो तितकाच किंबहुना जास्त आनंद मिळतो ती गोष्ट मिळाल्यावर. तरीही स्वप्न पाहणं हे कायमच आवडत कारण स्वप्न एक आशा सतत जागी ठेवतात मनात की मिळेल 'कष्टाचं फळ' आज न उद्या नक्कीच मिळेल. पण इथे मात्र त्या गाण्यातील हिरोला सगळं हवं असतं. अगदी चंद्र, ताऱ्यांपासून ते ऐश्वर्य, प्रसिद्धी, कौतुक सगळंच. झटपट असं सगळं मिळवण्याचा त

बिती हुई बतीयां

इमेज
#बीती_हुई_बतियाँ                     बीती हुई बतियाँ कोई दोहराये,                    भूले हुए नामों से कोई तो बुलाये ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले. खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले.  लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं  कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.   माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला. जुनी ख

टेक अ चान्स

इमेज
#टेक_अ_चान्स "Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be. "         स्वतःच भिंतीवर चिकटवलेलं  हे वाक्य  सायलीच्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. निमित्त होतं तिच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं.        सायली, वय वर्षे 40, सुस्वभावी  उच्चशिक्षित गृहिणी. गृहिणी हा तिचा स्वतःचा चॉईस.मुलं लहान असताना धावपळ करत राहिलो तर खूप काही सुटून जाईल असा तिचा समज होता. म्हणून तिनेच मी करेन एडजस्ट म्हणत चांगली सुरू असणारी नोकरी सोडून घरी राहायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्यांनी तस तिला वेड्यात काढलं. पण आता काही वर्षांनी तिच्या मुलांना , घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला तिने घेतलेला निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागलं.         आता कुणी म्हणेल अस वेगळं काय केलं होतं?  खूप काही नाही पण सायली आणि तिचा नवरा राजीव दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या होत्या . दोघांपैकी एक जण घरात असल्याने त्या गोष्टी त्यांना जरा नीट कार्यन्वित करता आल्या इतकंच. त्यांच्या घरात टीव्ही अजिबात नव्हता पण पुस्तकं मात्र भरपूर होती. मोबाईलचा  वापर अनिवार्यच असल्याने तो घरात होता

चले आओ

चले आओ इक बार फिर  उसी मोड़ पर  जहाँ कभी सूरज डूबा था हमें देखते हुए चले आओ इक बार फिर  उसी मोड़ पर जहाँ हमारी हँसी सुनकर  माहौल खुश हुआ करता था चले आओ इक बार फिर  उसी मोड़ पर क्योंकि आज भी वो मोड़  तुम्हारी याद लिए यूँही बैठा है खुश होनेकी चाह में आज भी सूरज  हमारे चेहरे की वो रोशनी ढूँढता है फिरसे आनेकी चाह में उम्र छीन ले गयी वो मासूमियत पर  दिल अभीभी वहीं है फिरसे जीने की चाह में चले आओ बस..... #गौरीहर्षल #१९.१०.२०१९

उधार का इतवार

उधार का इतवार इतवार  उधार का  लगता है आजकल पूछूँ मिले तो कहा है मेरे वो अपने पल अजनबी रास्तो और गलियों में अपना कोई मिलता नहीं क्या करें अपनोकी गलीसे आजकल मैं भी तो गुजरता नहीं दरवाजे पर दस्तक मेरे नाम की तो होती है पर खोलने के बाद मुलाकात काम से ही होती है बचपन का इतवार लाता था मस्ती के साथ सुकूनभरे पल आज का इतवार स्क्रीन के साथ ही होता है आंखोंसे ओझल किसी को मिले अगर सुकूनभरा वो इतवार मिलवाना जरूर, मुझे भी है उसका इंतजार #गौरीहर्षल ६.१.२०२०

सामान्य

खरच छान आहे सामान्य असणं सगळं जगच आपलं आहे असं वाटणं हसणं, रुसणं, बोलणं , वागणं असूनही नसणं, नसूनही असणं कुणाला तरी आठवणीत आठवण कुणाच्या तरी आठवणीत रेंगाळण स्वप्नांचे इमले बांधत राहणं पूर्ण होवो न होवो सतत स्वप्न बघत राहणं त्यात रमूनही वास्तवात जगणं खरच छान आहे सामान्य असणं असंच रहावं सगळं साधंच स्वप्नांच्या दारावर सतत तोरण आशेच वास्तवात न मिळणारी सुखं शोधण्यासाठी बळ मिळत राहावं प्रकाशाचं 9.1.2020 #गौरीहर्षल

सुखाची व्याख्या

सुखाची व्याख्या असते प्रत्येकाची वेगळी भौतिक, आत्मिक आणि निरनिराळी कुणीतरी आनंदी असतं आनंदाच्या कल्पनेत कुणालातरी सुख गवसतं पैश्याच्या दुनियेत सुखाच्या शोधात सगळे धडपडत असतात त्यातले किती जण स्वतःला सापडतात?? दुसऱ्याला आनंदात बघतात आणि होतात दुःखी असे कसे हे जीव इतरांवर जळून होतील सुखी?? मनापासून सुखात साद हल्ली कुणी घालत नाही दुःखात मात्र इतरांच्या सोबतीची हवी ग्वाही सुख म्हणजे काय असतं?  हाती न लागणारं मृगजळ सुख म्हणजे काय असतं? हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावपळ सुख म्हणजे काय असत?  कुणालाही अजूनही सापडलं नाही तरी त्याच्या मागे आयुष्य खर्ची करणं  माणसाने सोडलं नाही. सुख असतं समाधानाने जगण्यात, आपल्यासोबत इतरांना सुखी असुदे म्हणण्यात. सुख असत लहान मुलांच्या निरागस हसण्यात,  नको नको म्हणताना मायेने भरवलेल्या घासात. सुख असत आपल्या माणसाच्या सहवासात, कसलीही जाहिरात न करता घालवलेल्या क्षणात. सुख असत आपल्याच हातात, मनात आणि विचारात, छोटया छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात.  लिस्ट तशी मोठी सुख सापडणाऱ्या जागांची  पण  प्रत्येकाची वेगळी असते न व्याख्या सुखाची...... #गौरीहर्षल ४.१.२०२०

दोन शब्द कौतुकाचे

इमेज
#दोन_शब्द_कौतुकाचे        निखिलने लहानपणापासून आईवडील,आजीआजोबा सगळ्यांनाच दुसऱ्याचं भरभरून कौतुक करताना बघितलं होतं. म्हणजे ते उठसुठ कुणाचंही कौतुक करायचे अस नाही. पण जो खरंच काहीतरी छोटीशी का होईना कृती करतोय त्याचं ते कौतुक करायचे. पण ते सुद्धा अस की समोरच्याच्या डोक्यात हवा न जाता तो अजून अजून चांगलं वागण्यासाठी प्रयत्न करेल.  निखिलला कळू लागलं तसा तो सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा की," समोरचा तर आपल्या बाबतीत चांगलं बोलत नाही किंवा खूप कमी बोलतो मग आपणच अस का करायचं???"  तेंव्हा त्याचे आजोबा त्याला समजावून सांगत की,"समोरचा आणि आपण ह्यात हाच तर फरक आहे. आपण आपल्या डोळ्यांना, कानांना, मनाला फक्त चांगलं बघण्याची, ऐकण्याची आणि करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही न काही चांगलं नक्की सापडतं. त्याचा खूप फायदा होतो बघ निखिल. आपण जेव्हा समोरच्या व्यक्ती मधून चांगलंच वाचतो न तेंव्हा आपल्याकडे फक्त चांगलंच येतं. मग त्याच्यात नी आपल्यात बाकी पातळ्यांवर किती का फरक असेना आपल्या मनात त्याच्याविषयी नको ते विचार येतच नाहीत. सो आपण खुश राहतो हा झाला आपला फा

नवी सुरुवात

प्रत्येक नव्या सुरुवातीला जुन्याची काळसर किनार असते जरी पाटी कोरी केली तरी आधीच्या खुणा दाखवत राहते पुसत राहण्याचा अट्टहास माणूस सतत करत असतो कारण पुढे गेल्यावर परत फिरण्यासाठी मार्गच नसतो तरीही सुरूच असतो नव्याने आयुष्य लिहिण्याचा प्रयत्न धडपड, धावपळ , निरनिराळ्या उपायांची होतात आवर्तन कधी कधी ही भट्टी मस्तपैकी जमून येते त्या काळ्या किनारीची सुंदरशी नक्षी होते लिहिणं, पुसणं हा खेळ युगानुयुगे चालणारा माणूस मात्र  होतो फक्त तालावर नाचणारा खेळतं कोण खेळवतं कोण हे प्रश्न विचारू नयेत असे प्रत्येक डावाला एकच इच्छा मनासारखे पडावेत फासे #गौरीहर्षल #१५.११.२०१८

नवीन वर्ष

जीवनातलं अजून एक वर्ष कमी होतंय काही जुन्या आठवणींना मन मागे सारतंय काही इच्छा न मागता आपोआप पूर्ण झाल्या तर काही मात्र ओठांवरही नाही आल्या काही हात सुटून गेले नकळतच काळाच्या ओघात काही बंध नव्याने जुळले घेऊन हात हातात कुठे कुणी उगाचच अडकलं गैरसमजाच्या विळख्यात कुणाकुणाला मात्र सुख गवसलं नात्यांच्या घट्ट बंधनात काही जण अजूनही गोंधळात आहेत हवं की नकोच्या तर काहींना जमलं आहे न्हायला झऱ्यात समाधानाच्या कुणीतरी जुन्या आठवणीत सुख शोधत बसले आहेत काहीजण मात्र नव्या आठवणी जोडण्यात गुंतले आहेत बरंच काही हरवूनही कुणी खूप खुश आहेत सगळं काही असूनही कुणी खूप दुःखी आहेत सरत्या वर्षाचा हिशोब प्रत्येक जण मांडत आहे हात जोडून त्याच्याकडे मनातलं मागत आहे दिवसांमगून दिवस वर्षांनंतर वर्षं अशीच सरत आहेत माणसांमधून माणसं नकळतपणे हरवत आहेत  सुख आणि समाधानाने भरावी ओंजळ हेच आहे साकडे प्रत्येकाला मिळो योग्य ते मागणे येत्या प्रत्येक क्षणाकडे #गौरीहर्षल #३०.१२.२०१८

सुरुवात तर करूया

सुरुवात तर करूया जमलं नाही तर काय चुकलं सगळंच तर काय ह्या सगळ्यातून बाहेर पडून नवं काही करूया सुरुवात तर करूया राहून गेलेलं करण्यासाठी पुन्हा एकदा जगण्यासाठी सुरुवात तर करूया स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ देण्यासाठी सुरुवात तर करूया  दुःखातुन उभं राहण्यासाठी सुखातही जमिनीवर असण्यासाठी खूप काही नाही करायचं मिळालेलं आयुष्य भरभरून जगायचं पण त्यासाठी सुरुवात तर करूयाव #गौरीहर्षल #११.१.२०१९

गोडवा

गोडवा मनांचा हळव्या भावनांचा न कळेना कुठे हरवून गेला साद घालणारा ओलावा आवाजाचा स्मार्टफोनच्या गर्दीत गायब झाला माणूस अजून जिवंत आहे  लास्ट सीन सांगू लागले कुणाला नि कुठे भेटायचं  स्टेटसवरून कळू लागले जवळची आणि लांबची नाती  लाईक वरून ठरू लागली जन्म,मृत्यू, प्रत्येक बातमी फेसबुकवर शेयर झाली पूर्वीच्या काळी माणसांच्या गर्दीत  शोधावे लागायचे आपले परके  आता मात्र फ्रेंड लिस्टमध्ये आपलेच झाले असतात परके  अशीही ही अधोगती प्रगती म्हणून मिरवतेय सगळं काही पब्लिक करण्यात माणुसकी मात्र हरवतेय  #गौरीहर्षल #९.२.२०१९

अवघड

अवघड असतं ना स्वतःला समजावणं प्रत्येकाच्या चौकटीत सामावून जगणं तरीही करतात काहीजण अशी कसरत आयुष्य जगतात स्वतःच्या मनाला मारत जग देतं त्याला गोंडस नाव चांगुलपणाचं मग अखंड जगावं लागतं जीवन त्यागाचं त्यांचा त्रास कुणाला समजत नाही समजला तरी जाणून कुणी घेत नाही हळूहळू सवय होते अलिप्त राहून सुखी होण्याची अन् तीही कधी कधी बळी ठरते स्वार्थी असण्याची चांगलं वागणं इतकं अवघड होईल हे आता कळू लागतं पण रक्तात भिनलेलं हे व्रत सोडणं आता शक्य नसतं गौरी हर्षल

स्वतःला शोधताना

स्वतःला शोधताना आपल्या आजूबाजूला जिवंत माणसंच राहतात हे विसरतोय का आपण? विशेष असं काही नाही पण सहजच फोनच्या गॅलरीकडे आज नजर टाकली. जास्त प्रमाणात निराश, दुःखी मनस्थिती असताना सेव्ह केलेल्या वाक्यांच्या इमेजेस सापडल्या. त्या उडवत असतानाच जाणवत राहीलं की मी एकटीच अशी नाहीये बरेच जण हेच करत आहेत. राग आला म्हणून, वाईट वाटलं म्हणून अशा इमेजेस फेसबुक किंवा वॉट्सएप च्या स्टेटसवर अडकवायच्या. ह्या मागे इच्छा एकच असते ज्याचा राग आला आहे त्याला ते समजावं आणि जगालाही कळावं की आपण वाईट मनस्थितीत आहोत. मी तर गेले कित्येक दिवस हे सगळं करतेय मलाही ठाऊक नाही. पण कुठेतरी असं वाटलं की असं केल्याने मला किंवा त्या परिस्थितीत माझ्या मते दोषी असणाऱ्या व्यक्तीला फरक पडला आहे का? तर उत्तर अर्थातच नाही असं मिळालं. का?? कारण  १. मी किंवा समोरच्याने संवादच साधला नाही. त्यामुळे प्रश्न आहे तिथेच राहिला आणि गैरसमजांचा घडा मात्र भरत गेला. परिणामी नातं फक्त तोंडावर हसून वेळ मारुन नेण्याइतक जिवंत राहिलं.  २. समोरच्याला माझ्या मनात काय आहे हे न कळल्याने मला मात्र जास्तच त्रास झाला. त्याचा परिणाम माझं खाणंपिणं, विचार करण

रिते रिते

कधी रिते रिते होऊन हरवून जाते कधी भरलेल्या आभाळासारखे बरसते मनाचे तर असेच असते... कधी धरते फेर आठवणींच्या घोळक्यात कधी शांत बसून राहते आपल्याच नादात स्वतःच्या तालावर सगळ्यांना नाचवते मनाचे तर असेच असते... कधी भिजते चिंब पावसात कधी रात्र रात्र सरते आसवात हरवलेल्या क्षणांना आठवत राहते  मनाचे तर असेच असते... कधी होते लहान मूल कधी निर्माल्यातले फूल कोमेजूनही टवटवीत असण्याचा प्रयत्न करते  मनाचे तर असेच असते... ©गौरी हर्षल ११.७.२०१९

पॉझिटिव्ह रहा

पॉझिटिव्ह रहा, जगा, विचार करा म्हणणं किती सोपं असतं प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाचं मन जगण्यासाठी झगडत असतं त्रास होतोच , वाईटही वाटत आणि रडूही येतच सर्वानाच पण उघडपणे व्यक्त होण्यासाठी हिंमत नसते कुणालाच जग म्हणजे कोण ?? २,४जवळचे नातेवाईक नी मित्र कळवावं का त्यांना मनातलं सगळं लिहून खरमरीत पत्र?? प्रेम, माया, काळजी ,आपुलकी हे सगळे अनुभवायचे असते त्यासाठी कुणाजवळ तरी व्यक्त होण्याची गरज असते इथेच मात्र सगळं कसं झाकलं जातं बुरख्याखाली इगोच्या  वरून दिसतो स्ट्रॉंगपणा आतून मात्र प्रचंड केमिकल लोच्या विचारणारं कुणीच नाही भेटत तेव्हा लहान व्हावं स्वतःसाठी स्वतःच्या सगळ्या चुका माफ करत घालावं स्वतःलाच पाठी आपल्यासाठी इतर कुणी अस काही का करावं?? ज्याचं त्याचं सुख ज्याने त्यानेमनापासून घडवावं बळजबरीने ओढून ताणून सुख कधी येत नसतं प्रयत्न केला तर आपल्याच मनात सुखाचं गाव वसतं इतरांच्या वागण्यातून सतत आनंद वेचायला शिकावं चिडचिड आणि रागातही मनातलं मूल अलगद जपावं करावी लागत नाही उगाच धडपड पॉझिटिव्ह होण्यासाठी मनातल्या मनात सापडते जागा रुसल्यावर बसण्यासाठी साधा सोपा मंत्र असतो स्वतःला स्वतःच जपण्यात आप

खरंच अस कधी

खरंच असं कधी झालं तर  सकाळच्या पहिल्या किरणांपासून पसरत गेला हवाहवासा वाटणारा प्रकाश  आनंदाचा, चैतन्याचा आणि मन शांत करणारा खरंच असं कधी झालं तर  भरून घेताना नवासा श्वास नवीन दिवसात सोडून गेले सगळे दुःखाचे अडकलेले क्षण मनातून, स्मृतींतून आणि भरलेल्या त्या डोळ्यांतुन खरंच असं कधी झालं तर  आयुष्यात उरलीच नाही जागा सतत दुःख वाटण्यासाठी आसुसलेल्या नकोशा गोष्टींना, वस्तुंना आणि माणसांनाही खरंच असं कधी झालं तर  आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला  मिळाली एक नवी दिशा बदलणारी, हसवणारी आणि नकळतच मळभ दूर करणारी  खरंच असं कधी झालं तर  जगण्याचा होऊन जाईल उत्सव सुखा-समाधानाच्या हातात हात घालून मनाला मिळेल उभारी पुन्हा पुन्हा आशेने जगवणारी....... #गौरीहर्षल #२०/९/२०१८

कधीतरी मला हवं तसं

इमेज
कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या कितीतरी गोष्टी राहून गेल्या आहेत रे करायच्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत याद्या त्यांच्या निसटलेलं बालपण अन्  न जगलेले असंख्य क्षण रोज एकदा तरी येऊन जाते मला त्यांची आठवण आशेच्या झोपाळ्यावर झुलायचे अजून किती तिथे आजूबाजूला आहेत मोडलेल्या स्वप्नांच्या भिंती सतत त्या मला खुणावतात वेडावून दाखवल्यासारख्या   डोळ्यासमोर येतात त्या आठवणी जखमांसारख्या कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या न मागता मिळेल असं काहीच नाही ह्या जगात अन्  मागूनही मिळावं अशी अपेक्षा नाही मनात  म्हणूनच हे मागणं करतेय, मी तुला आणि मला  ह्यावेळी तरी देऊ संधी आपल्या त्या जगण्याला नेमकं मला हवं आहे काय?  खुप काही नाही फक्त एकदा, हसायचं आहे मनापासून डोळ्यात पाणी येईपर्यंत झोपाळ्यावर झुलायचे आहे तो आकाशी नेईपर्यंत  साधी सोपी स्वप्नं आहेत ज्यांना लागत नाही पैसा सोबतीला मात्र हवा आहे श्वास मला पुरेसा खेळ आपला लपंडाव,  तुझ्यामागे सतत चालू माझी धावाधाव  कुठेतरी थांबून घ्यायची आहे विश्रांती प्

तुमसे ही

इमेज
#तुमसे_ही   गाणं तसं फुल रोमँटिक वगैरे टाइप आहे बर का ... पण मला आपलं नेहमीची खोड आहे वेगळंच काहीतरी शोधायची ते कसं ते सांगते .... कशाच्या तरी शोधात निघालेला एक जीव , ज्याला खूप काही हवं आहे आयुष्याकडून. अगदी टिपिकल सामान्य माणसाच्या सारखं सगळी सुखं हवी आहेत. तो ती सतत त्या वरच्याकडे मागत फिरत असतानाच त्याला अस काही गवसतं जे सहजासहजी आजवर कुणालाच मिळालेलं नाही असेच काही पहिल्या कडव्यात येते..... ना है ये पाना ना खोना ही है तेरा ना होना जाने क्यूँ होना ही है म्हणजे ज्या शोधात  मी निघालो होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अस काहीतरी मिळालं आहे आणि ते शब्दातीत आहे. जे असूनही नाहीये आणि नसूनही आहे.  तुमसे ही दिन होता है सुरमई शाम आती तुमसे ही, तुमसे ही हर घड़ी साँस आती है ज़िंदगी कहलाती है तुमसे ही, तुमसे ही… ते जे काही गवसलं आहे न ते सगळ्या चराचरात व्यापून उरलं आहे. त्याच्यामुळेच ही सृष्टी सुरळीत चालू आहे तिला जिवंतपणा, रसरशीत पणा लाभला आहे.जो आयुष्य म्हणवला जातो. आँखों में आँखें तेरी बाहों में बाहें तेरी मेरा ना मुझमें कुछ रहा… हुआ क्या बातों में बातें तेरी रातें सौगातें तेरी क्यूँ तेरा

अधीर मत हो मन

इमेज
अधीर मत हो मन ये दिन भी जाएंगे हसते मुस्कुराते खुशी के पल वापस लौट के आएंगे तब तक तू धीरज से काम ले खुदही खुदको थाम ले रूककर जरा सोच कुछ समय तभी तो थमेगा ये बिन बुलाया प्रलय आज तू अगर रुक गया  समझ बहुत कुछ पाएगा आनेवाला हर दिन खुशी भरभर के लाएगा अधीर मत हो मन तू ही तुझको संभाल सकता है तेरा संयम तेरे लिए वरदान बन सकता है  थोड़े दिन खामोश रहके  अपनी ताकत बढा के तो देख हर कोई जुटा है इसी कश्मकश में  तू जरा नजर उठा के तो देख तू अपनी मर्जी का मालिक है सारी दुनिया जानती है इसीलिए तो तू खुदको रोक ना बिना बात के कर नोंक झोंक मिले हुए पलों में खुशियां बटोर ले  चार दिन अपनों के साथ बाँट ले सबकुछ अब तुझपे निर्भर है तेरे ही हाथों में कल की डोर है इसीलिए कहती हूँ अधीर मत हो मन  उम्मीद से भर दे तू आज मेरा आँगन #गौरीहर्षल २५.३.२०२०

अलक

इमेज
#अलक १.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती.  कारण एकच ती मुलगी होती  २. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली . कारण तेच ... ३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या. कारण तेच .... ४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.  पण ह्यावेळी कारण वेगळं होतं  तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसावला. 

प्रश्न ही तूच उत्तरही तूच

इमेज
#प्रश्नही_तूच_अन्_उत्तरही_तूच ध्यान संपवून त्यांनी डोळे उघडले तशी ती मोठया आशेने समोर बसलेली त्यांना दिसली. तिच्याकडे बघत त्यांनी मंद स्मित केलं. आणि मग आपले गंभीर पण आश्वस्त डोळे तिच्या नजरेत मिसळत ते म्हटले, "बोल, कशाचं उत्तर हवंय?"  थोडंस चुळबुळतच ती म्हणाली, "उत्तर नकोय मला ह्यावेळी. सुटका हवीय ह्या सगळ्यातून. चूक नसताना जे गमावलं ते तर कधीच परत येणार नाही. पण हुरहूर मात्र कायम राहील. म्हणूनच सुटका हवीय मला."  अत्यंत प्रेमाने तिच्याकडे बघत ते बोलु लागले,"सुटका अशी मागून मिळत नसते लेकरा. तुझं नुकसान भरून येईल असं मी म्हणत नाही पण निदान येणारा काळ त्यावरच औषध असेल हे नक्की. राहिला प्रश्न तुझ्या ह्या सुटका प्रश्नाचा तर ती तुझी सध्याची मनस्थिती बोलते आहे. आत्ताच तुला सत्य कळालं आहे ते पचवणं त्यातून बाहेर पडणं ह्यासाठी मनाला वेळ लागेल. चुकार मेंढरासारखं ते अजून काही दिवस तुला त्रास देणारच. पण त्याला सतत योग्य मार्गावर आणण फक्त तुझ्या हातात आहे आणि ते तुला जमेल ह्याची मला खात्री आहे." मग थोडंस थांबून त्यांनी तिच्याकडे बघितलं कुठेतरी तिच्या मनात सुरू असलेली ख

सुखी माणसाचा सदरा

इमेज
#सुखी_माणसाचा_सदरा सिग्नलला गाडी थांबली की माणसांचं निरीक्षण करण्यात मज्जा येते. कुणी मस्त हसून जात असतो, कुणी जोरजोरात फोनवर बोलताना दिवसभराचा कार्यक्रम सगळ्या जगाला ऐकवत असतो. प्रत्येकाची निराळी तऱ्हा आज मात्र दोन विरोधी दृश्य एकाच वेळी दिसली अन् कुठेतरी माणसाच्या मनोवृत्तीबद्दल आश्चर्य वाटलं. पहिलं दृश्य  हातगाडीवर फळं विकणाऱ्या नवराबायकोची जोडी. दुपारची वेळ असल्याने गाडी बाजूला लावून  दोघेही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाखाली गोणपाट अंथरून जेवायला बसले होते. त्याही ठिकाणी आग्रह करून करून एकमेकांना वाढत आणि गप्पा मारत आनंदात होते. टचवूड अगदी अस वाटलं. तर दुसरं दृश्य जराशी जुन्या मॉडेलची चारचाकी. चालवणारे वडील आणि किती भिकारड्या गाडीत मला बसवलं आहे असा चेहरा करून बसलेले चिरंजीव. गाडी जुनी असली तरी टकाटक होती. मुलाच्या चेहऱ्यावर असणारे भाव लक्षात आल्याने वडीलही अक्षरशः सूड उगवल्यासारखे गाडी चालवत होते. कदाचित बाकी आधी काही घडलं असेल ही त्यांची मनस्थिती खराब होण्यासारखं. पण गाडीबद्दल राग आहे हे ते ज्या नजरेने इतर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या न्याहाळत होते त्यावरून कळलं.  क्षणभरासाठी त्या

आमराईचा उत्सव

इमेज
आमराईचा_उत्सव आज सकाळपासून तिची खूप लगबग सुरू होती. ऑफिसमध्ये ही ती काहीशी गडबडीत असल्याचं तिच्या मित्रमंडळी ना जाणवलं शेवटी कुणीतरी तिला हटकलच कुठे लक्ष आहे म्हणून? मग दुपारी जेवताना बोलू असे म्हणत तिने समोरच काम संपवायला सुरुवात केली.  सगळं मित्रमंडळ दुपारच्या वेळी ऐकण्यासाठी तयारीत बसलं होतं. ती आली मग सगळ्यांनी जेवणं उरकली. आता मात्र तिच्या जिवलग मैत्रिणी ला राहवेना. " मिथिले , अग सांग ना आतातरी " , अस म्हणत नेत्राने कोंडी फोडली.  हलकेसे हसत मिथिला म्हटली, "अग हो तेच बोलणार आहे. गेले दोन दिवस मी कसल्या गडबडीत आहे, ह्याबद्दल तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे.  तर माझे आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे बाबा गावाकडे खूप मोठे शेतकरी होते. अडीनडीला लोकांच्या हमखास उपयोगी पडत. पण त्यांना एक दुःख होतं. पाच पिढया घरात मुलगी जन्माला आली नव्हती. कारण पाच पिढ्यांआधी जन्माला आलेली मुलगी  शेतातल्या आंब्याच्या बागेतल्या विहिरीत सापडली होती. आणि त्यानंतर भरभरून आंबे देणारी ती आमराई आणि पाण्याने तुडुंब भरलेली ती विहीर कायमच्या आटल्या." हे ऐकल्यावर सुरक्षित वातावरणात वाढलेल्या सगळ्यांच्या

ओळखीचा अनोळखी मित्र

इमेज
Life is all about adjustment.  प्रत्येक जण कुठेना कुठे, कशासाठी तरी, कुणासाठी तरी एडजस्ट करतच असतो. आणि एडजस्टमेंट करावी लागणार आहे हे कुठेतरी मनात फिक्स असतं.      पण कधीतरी काय होतं मन कंटाळलेले असते. बऱ्याच गोष्टी एकदम घडलेल्या असतात म्हणजे घरात , बाहेर, ऑफिसमध्ये काही घटना अचानकच घडतात. अशावेळी चिडचिड सुरू होते प्रत्येकाचीच मग त्यातून वाद होतात. कुणीतरी माघार घेतं अन विषय थांबवला जातो पण तो खरंच थांबतो का हो?? तर नाही मनाचा एक कोपरा त्यावर विचार करत असतो, कदाचित दुखावलेला असतो. काही जण अशा परिस्थितीत शांत बसतात म्हणजे बाहेरून तरी असच दृश्य असतं, काही जण स्वतःशीच बडबड करून चिडचिड करून मोकळे होतात. काही जण सोशल मीडियावर दर्दभरे स्टेटस टाकून मोकळे होतात तर काही जण उगाच पॉझिटिव्ह जगण्याची धडपड सुरू करतात.     क्षणिक दिसणारा हा त्रास मनाला मात्र खूप त्रास देत असतो. पण आपल्या कडे पद्धत असते न मनातलं कुणाजवळ बोलायच नाही मग काय करणार ?? मन बसतं आतल्याआत रडत कुढत. त्यातूनही कुणीतरी एखाद्या मित्रमैत्रिण , इतर जवळच्या व्यक्ती यापैकी कुणाजवळ तरी व्यक्त होतात. पण आपण विसरतो ही देखील माणसच असतात

यशातलं अपयश

इमेज
यशातलं अपयश चाळिसाव्या मजल्यावर असणाऱ्या त्या आलिशान पेंट हाऊसच्या फ्रेंच विंडोमधून सगळं शहर दिसत होतं. पण ते बघण्याची शुद्ध कुठे होती त्याला. गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांचा क्रम त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होता. त्याचं हे वैभव काही एका रात्रीत आलं नव्हतं. पण लोकांना त्याच्या जवळच्या लोकांनाच अस वाटत होतं. ते लोक ज्यांनी त्याच्या पडत्या काळात त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याचे आईवडील, भाऊबहीण, मित्र सगळेच सतत त्याच्या प्रत्येक कृतीवर आक्षेप घेत ,टोमणे मारत त्याचं मानसिक खच्चीकरण करत होते. पण तो मात्र ठामपणे त्याच्या वाटेवरून चालत राहिला होता. आणि आज त्याचं फळ त्याला मिळालं होतं. पण जोडीने असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीचा प्रत्यय ही त्याला आला होता.  संध्याकाळी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तीच ती पाठ फिरवून निघून गेलेली सगळी नाती त्याला दिसली.  प्रेम तर तस त्याच्या आयुष्यात आलंच नव्हतं पण जे काही आलं ते स्वार्थासाठी आहे हे लक्षात यायला त्याला वेळच लागला होता. मग असे सत्काराचे प्रसंग जसजसे वाढत गेले तसतसे त्याला लोकांचे खरे चेहरे समजत गेले.  आज तो यशाच्या शिखरावर होता पण एकटा. आण