पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कालाय तस्मै नमः (भाग १२ ते १५)

इमेज
कालाय तस्मै नमः| भाग १२ जाणीव स्व अस्तित्वाची एकीकडे माई आणि काका स्वराला भविष्यात येणाऱ्या गोष्टीवर मात करण्यासाठी तयार करत होते. तर दुसरीकडे अजूनही कुणीतरी स्वराच्या मदतीसाठी तयारी सुरू केली होती.  भविष्यात असे काय घडणार होते? त्याची झलक स्वरा सात वर्षाची झाली तशी जाणवू लागली.  एके रात्री अचानक ती झोपेत दचकली. माई शेजारीच झोपल्या होत्या त्यामुळे त्यांना पटकन ते जाणवले. तसे त्यांनी घाबरलेल्या स्वराला जवळ घेतले ती तशी अजूनही झोपेतच होती. पण बडबडत होती. माईंनी नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तसे काही अस्पष्ट शब्द त्यांना ऐकू आले, तिकडे जाऊ नको अस काहीसं. त्या काही विचारणार तेवढ्यात स्वरा कूस पालटत त्यांच्या कुशीत शिरून झोपून गेली.  सकाळी उठल्यावर त्यांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवत नव्हते. स्वरा दुपारी शाळेतून घरी आली तशी नेहमीप्रमाणे माईंच्या खोलीत आली नाही म्हणून माई तिला शोधत तिच्या खोलीत गेल्या. तर ती दप्तर एकीकडे टाकून गुढघ्यात तोंड घालून मुसमुसत कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत माईनी विचारले, “काय झाले राणूबाई?” तशी ती डोळ्यातलं...

90 दिवसांचे चॅलेंज म्हणजे काय?

इमेज
90 दिवसांचे चॅलेंज म्हणजे काय?  तुम्हाला कधी आपल्या डोक्यात विचारांची गर्दी झाली आहे असं वाटतं का? आणि मग नकळतच त्या विचारांच्या गर्तेत आपण अतिविचार करत आहोत हे जाणवतं का??  अशावेळी काय करायचं?  कोणत्याही मानसशास्त्र तज्ञ आणि कौन्सेलर कडे जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला तुमच्या मनातले विचार कागदावर लिहून काढायचा सल्ला देतात. ह्याला सध्याच्या भाषेत brain dump अस म्हणतात. म्हणजे मनात, डोक्यात जो नको असलेल्या विचारांचा कचरा साठलेला असतो त्याला बाहेर काढणे.  पण हे सहज जमते का? तर नाही ...  म्हणून हे 90 दिवसांचे चॅलेंज...  सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा विचार करून मी काही प्रश्न तयार केले आहेत. काही टास्क सुद्धा आहेत.  पण मुख्य काम मात्र लिहिण्याचेच आहे.  सो थोडक्यात सांगायचे तर आपल्या मनात साठलेलं बाहेर काढण्याची ही एक योग्य पद्धत आहे.  यासाठी नियम आहेत का?  हो  1. स्वतःच्या हाताने लिहिणं 2. कुणालाही न सांगता हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.  3. सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करणे.  बास एवढच!!!  90 दिवसांनंतर एकदा...

कालाय तस्मै नमः भाग ९ ते ११

इमेज
कालाय तस्मै नमः| भाग ९ सरप्राईज  अंगणात छानपैकी टेबल मांडलं होता. त्याच्या पलीकडे सगळी नातवंडं हातात Happy birthday चे एकेक अक्षर स्वतःच्या मोडक्या तोडक्या अक्षरात लिहिलेले बोर्ड घेऊन उभी होती. मागे सगळी मुलं मुली त्यांच्या जोडीदारासोबत उभे होते.   माईही त्यांच्या ह्या सरप्राईज मध्ये सामील होत्या. आज तारखेने अन् दुसऱ्याच दिवशी तिथीने काकांचा 75 वा वाढदिवस होता. त्याचीच गुपचूप तयारी करून सगळे जण जमा झाले होते. काकांसाठी जसे ते सरप्राईज होते तसे सकाळपर्यंत माईंसाठीही होते. पण सकाळी भास्कर ला आलेला फोन माईनी उचलला आणि पलीकडून अशोकचा आवाज आला की अरे आम्ही सगळे शेजारच्या पाटलांच्या वाड्यात आलो आहोत तुम्ही कधी पोहोचत आहात. अजून सगळी तयारी करायची आहे. ते ऐकल्यावर माईनी त्याला रागातच विचारले, मग काय माईना सामील करावेच लागले.  शेजारच्या वाड्यात तसेही कुणी नसायचे त्यामुळे सगळ्यांना तिथे तयारी करणे सोपे झाले. रात्री उशिरापर्यंत जागून सगळे जण गप्पा मारत होते. बऱ्याच वर्षांनी सगळ्या मुलां-नातवंडांना आजूबाजूला बघून काकांनाही छान वाटत होते. शेवटी गायत्री सगळ्यांना ओरडली,"अरे उद्य...

कालाय तस्मै नमः (भाग ७-८)

इमेज
कालाय तस्मै नमः| भाग ७ भूतकाळात फेरफटका अरुंधतीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली तरी आयुष्य थांबणार नव्हते. अरुंधतीचे सर्व कार्य आटोपल्यावर महिनाभरात घरातील सर्व सोय बघून निघावे असे श्रीपादने ठरविले. तसे त्याने काकांना बोलूनही दाखवले. ते बोलणे माईंनी ऐकले आणि त्या श्रीपादला बघत म्हणाल्या, “निघावे म्हणजे? ती गेली म्हणजे तूही जाणार का तुझ्या वाटेने? कैवल्य - त्याचं काय?”  श्रीपाद माईंना समजावत म्हणाला, “माई मी जातोय म्हणजे निघून नाही जात. बदली झाली आहे माझी, खरे कारण सांगायचे त्याने टाळले. आणि कैवल्यला ह्या वातावरणापासून दूर घेऊन गेलो तरच तो सावरेल नाही तर त्याला सतत आईची आठवण येत राहील. नवीन ठिकाणी नवीन माणसांमध्ये तो गोष्टी विसरून रमेल. आणि जेव्हा जेव्हा तू मला मनापासून हाक मारशील मी नक्की येईन. ह्या घराला, तुम्हाला माझी गरज असताना मी तुमच्या सोबत असेन. आणि मलाही ह्या घरात तिच्या बाबतीत जे झाले सतत तेच तेच आठवून गुदमरून गेल्या सारखे होते. त्यामुळे तू मला परवानगी दे.”  माईंनाही मनातून त्याचे बोलणे पटले, पण आईचं काळीज होतं ते. त्यात श्रीपाद त्यांची दुधावरची साय म्हणजे कैव...

कालाय तस्मै नमः (भाग ४ -६)

इमेज
कालाय तस्मै नमः| भाग ४ आस्तनीतले साप  श्रीपाद दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधनेच्या खोलीतून बाहेर आला. साधनेच्या वेळी त्याला काही गोष्टींचा अंदाज आला होता त्यामुळे तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अरुंधतीच्या तब्येतीत फारशी सुधारणा नव्हती. पण वैद्यांच्या औषधांमुळे तिचा त्रास बराच सुसह्य झाला होता. तिच्या तब्येतीची बातमी एव्हाना बाकीच्यांकडे पोहोचली होती.  झालं गेलं बाजूला ठेवून सगळेजण एकेक करत वाड्यावर येण्यासाठी तयारी करत होते. सगळे येण्यापूर्वीच अरुंधतीला काकांना काहीतरी सांगायचे होते. त्यासाठी तिने श्रीपादला तशी कल्पना दिली. तसे काकांना त्याने सांगितले. त्यांनाही अंदाज आला होता. ते अरुंधतीच्या खोलीत गेले. जिला बघताक्षणी महालक्ष्मीचा भास काकांना होत असे, ती अरुंधती अगदी कृश अवस्थेत पहुडलेली होती. पण त्या अवस्थेतही तिच्या चेहऱ्यावरचं तेज अजिबात कमी झालेलं नव्हतं. उलट एका वेगळ्या आणि विलक्षण प्रकाशाचं वलय तिच्या आसपास त्यांना जाणवलं. प्रचंड त्रास होत असतानाही ती तो हसतमुखाने सहन करत होती.  काका शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसले. डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना त्यांनी नकळतच टिपण्याचा...