90 दिवसांचे चॅलेंज म्हणजे काय?
90 दिवसांचे चॅलेंज म्हणजे काय?
तुम्हाला कधी आपल्या डोक्यात विचारांची गर्दी झाली आहे असं वाटतं का? आणि मग नकळतच त्या विचारांच्या गर्तेत आपण अतिविचार करत आहोत हे जाणवतं का??
अशावेळी काय करायचं?
कोणत्याही मानसशास्त्र तज्ञ आणि कौन्सेलर कडे जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला तुमच्या मनातले विचार कागदावर लिहून काढायचा सल्ला देतात. ह्याला सध्याच्या भाषेत brain dump अस म्हणतात. म्हणजे मनात, डोक्यात जो नको असलेल्या विचारांचा कचरा साठलेला असतो त्याला बाहेर काढणे.
पण हे सहज जमते का? तर नाही ...
म्हणून हे 90 दिवसांचे चॅलेंज...
सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा विचार करून मी काही प्रश्न तयार केले आहेत. काही टास्क सुद्धा आहेत.
पण मुख्य काम मात्र लिहिण्याचेच आहे.
सो थोडक्यात सांगायचे तर आपल्या मनात साठलेलं बाहेर काढण्याची ही एक योग्य पद्धत आहे.
यासाठी नियम आहेत का?
हो
1. स्वतःच्या हाताने लिहिणं
2. कुणालाही न सांगता हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
3. सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करणे.
बास एवढच!!!
90 दिवसांनंतर एकदा का तुमच्या मनाला मेंदूला सवय झाली की मग ही गोष्ट तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होणार हे नक्की.
फायदे काय??
✓मनातलं सांगण्यासाठी आपल्याला कुणाची तरी गरज असते. पण प्रत्येक वेळी योग्य व्यक्ती मिळेलच असं नाही.
मग अशा वेळी ही युक्ती कामी येते.
✓ गोष्टी गुपित राहतात.
✓ कुणीही जज करू शकत नाही. कारण कुणाला माहीतच नाही.
✓ मोकळेपणाने स्वतःशी संवाद साधला जातो.
✓ आपल्या चुका आणि आपले प्लस पॉइंट आपल्यालाच लक्षात येतात.
आणि
अजून बरंच काही...
सगळच सांगण्यापेक्षा काही गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊन अनुभवायला हव्यात.
सो उद्यापासून म्हणजे 8 फेब्रुवारी 2025 पासून हे 90 दिवसांचे चॅलेंज सुरू होणार आहे.
तुम्हाला जर सहभागी व्हायचं आहे तर लवकरात लवकर आपला सहभाग निश्चित करा.
आयुष्यात नवीन काही तरी तेंव्हाच घडतं जेंव्हा आपण नवीन कृती करण्यासाठी पाऊल उचलतो.
बाकी?
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
संपर्क
गौरी हर्षल कुलकर्णी
एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन (12+ वर्षांचा अनुभव)
9730961014( whatsapp only)
टिप्पण्या