#जाणीव
सकाळी सकाळी लगबगीने सूर्य किरणांना पसरवत जाणीव करून देत असतो नवा दिवस उगवल्याची. नव्या दिवसासोबत नवी पहाट, नवी स्वप्न घेऊन जगा असंच तर सांगत नसतो ना? पण आपल्याला होते का खरंच जाणीव? आपलं आयुष्य रसरशीत आहे अशी. बऱ्याचदा उगाच आपण नको त्या दुःखांना कवटाळून समोर आलेले सुरेख क्षण वाया घालवतो.
जाणीव असायला हवी स्वतःच्या जिवंत असण्याची, चांगलं वागण्याची. फक्त रुटीन फॉलो करण्यापेक्षा त्यात एक उत्स्फूर्तता भरण्याची जाणीव . ती कशी समोर येणार काम, व्यक्ती आपल्या आवडीची असो व नसो आपल्याला आपलं काम इमानेइतबारे करायचं आहे. कुठलं काम ? छानसा प्रतिसाद देत संवाद सुरू करण्याचं. मनात कितीही कटुता असली तरी आपल्या आवडत्या / नावडत्या ठिकाणी ती येऊ न देण्याची जाणीव सतत ठेवावी.ही जाणीव खूप काही सोप्प करेल. तुमचा सदैव हसरा चेहरा लोकांना कोड्यात पाडत चांगलं वागायला भाग पाडेल. लगेच नाहीच होणार कुणाकडूनच ना आपल्याकडून ना समोरच्याकडून पण सुरुवात तर करून बघावी. आपण सदैव ह्या जाणिवेत असलो की त्याचं सुरेख रिफ्लेक्शन आपल्या नजरेत येईल. आणि तुम्हाला माहित आहेच डोळे न बोलता ही खूप काही बोलतात. मग ठेवायची न जाणीव छान प्रतिसाद देत राहण्याची???
प्रत्येकाला आज एक तरी क्षण सुरेख साद प्रतिसाद असलेला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
७.७.२०१७
शुक्रवार, ७ जुलै, २०१७
जाणीव
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
एकटेपणा की गोल्डन पिरियड खूप जण तक्रार करत असतात की तुम्हाला काय कळणार आहे?आम्ही आयुष्यात काय भोगलं आहे?आम्ही किती एकटे आहोत? आमच्या सोबत कस...
-
#तेच_तेच_अडथळे? विचारांचे चक्र आणि बदल कधी कधी आपल्याला वाटतं की नशीबच खराब आहे. सगळीकडे सतत तेच तेच अडथळे, तीच ती "बॅड लक" ची माल...
-
#Quote_of_the_day9 रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजे...
Contact form |
Tags |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा