नात्यांचा रिचार्ज

नात्याचं_रिचार्ज
माणूस जन्माला येणार अशी चाहूल लागली की नाती त्याला चिकटतात. काही नाती रक्ताची, काही मनाची, काही स्वतः स्वीकारलेली तर काही आपसूकच येऊन गळ्यात पडलेली. या सगळ्या नात्यांच्या गुंत्यात काही नाती तरी नक्कीच असतात जी खूप महत्त्वाची असतात, स्पेशल असतात. अशा नात्यांना जपणं खूप गरजेचं असतं. व्यक्तिसापेक्ष ही नातीही वेगवेगळी असतात.
माणूस नात्यांकडून मिळणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुभवांमधून खूप काही शिकत असतो. शिकता शिकता घडत असतो. बरेवाईट अनुभव तर येतातच . पण आपण स्वतः कधी लक्ष देतो का की त्या त्या नात्याची नेमकी गरज काय आहे? उदाहरणार्थ एखाद्या नात्यात आधी खूप सामंजस्य होते पण जसजसे सहवास वाढला त्याची जागा गृहीत धरण्याने घेतली. एखादं नातं आधी खूप खोडकर होतं पण वयानुसार त्यात फक्त गंभीर गोष्टीच उगळल्या जात असतील.
खूप छोट्याश्या गरजा असतात नात्यांच्याही आणि माणसांच्याही.  त्या पूर्ण करण्यासाठी पैश्यांपेक्षा काळजीपूर्वक एकमेकांना नात्याला ओब्जार्व करण्याची गरज असते. हळूहळू राग व्यक्त करण्याऐवजी प्रेम व्यक्त करावे. आवर्जून ते नातं, ती व्यक्ती किती गरजेची आणि मुख्य म्हणजे हवीहवीशी आहे हे सांगावे. हा नियम आईमुलांपासून ते मित्रमैत्रिणी मध्येही लागू पडतो. आपण फक्त कुणाला हवेसे आहोत ही भावनाच व्यक्तीला आत्मविश्वास देते. हल्ली सतत जाणवणारे ताणतणाव माणसाला कुठेतरी आतून एकटं करत असतात. अशावेळी गरज असते ती एकमेकांना ओळखून नात्यांना एक नवा रिचार्ज देण्याची. हे रिचार्ज आपला एक आश्वासक स्पर्श, प्रेमळ नजर, दोन गोड शब्द आणि सोबत असण्याची खात्री देऊ शकतात. फक्त आपण वेळोवेळी आपल्या जवळच्या नात्यांना ते दिलं पाहिजे. 
नात्याचं रिचार्ज नात्यात बांधल्या गेलेल्या सगळ्यांनाच एक रिफ्रेशमेंट देतं. त्याचा खूप चांगला आणि लॉंग टर्म प्रभाव आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात टिकून राहतो.
प्रत्येकाला असंच एक रिफ्रेशिंग रिचार्ज आज मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
#११.७.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी