शुक्रवार, २७ मार्च, २०२०

रिते रिते

कधी रिते रिते होऊन हरवून जाते
कधी भरलेल्या आभाळासारखे बरसते
मनाचे तर असेच असते...

कधी धरते फेर आठवणींच्या घोळक्यात
कधी शांत बसून राहते आपल्याच नादात
स्वतःच्या तालावर सगळ्यांना नाचवते
मनाचे तर असेच असते...

कधी भिजते चिंब पावसात
कधी रात्र रात्र सरते आसवात
हरवलेल्या क्षणांना आठवत राहते 
मनाचे तर असेच असते...

कधी होते लहान मूल
कधी निर्माल्यातले फूल
कोमेजूनही टवटवीत असण्याचा प्रयत्न करते 
मनाचे तर असेच असते...

©गौरी हर्षल ११.७.२०१९

पॉझिटिव्ह रहा

पॉझिटिव्ह रहा, जगा, विचार करा म्हणणं किती सोपं असतं
प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाचं मन जगण्यासाठी झगडत असतं
त्रास होतोच , वाईटही वाटत आणि रडूही येतच सर्वानाच
पण उघडपणे व्यक्त होण्यासाठी हिंमत नसते कुणालाच
जग म्हणजे कोण ?? २,४जवळचे नातेवाईक नी मित्र
कळवावं का त्यांना मनातलं सगळं लिहून खरमरीत पत्र??
प्रेम, माया, काळजी ,आपुलकी हे सगळे अनुभवायचे असते
त्यासाठी कुणाजवळ तरी व्यक्त होण्याची गरज असते
इथेच मात्र सगळं कसं झाकलं जातं बुरख्याखाली इगोच्या 
वरून दिसतो स्ट्रॉंगपणा आतून मात्र प्रचंड केमिकल लोच्या
विचारणारं कुणीच नाही भेटत तेव्हा लहान व्हावं स्वतःसाठी
स्वतःच्या सगळ्या चुका माफ करत घालावं स्वतःलाच पाठी
आपल्यासाठी इतर कुणी अस काही का करावं??
ज्याचं त्याचं सुख ज्याने त्यानेमनापासून घडवावं
बळजबरीने ओढून ताणून सुख कधी येत नसतं
प्रयत्न केला तर आपल्याच मनात सुखाचं गाव वसतं
इतरांच्या वागण्यातून सतत आनंद वेचायला शिकावं
चिडचिड आणि रागातही मनातलं मूल अलगद जपावं
करावी लागत नाही उगाच धडपड पॉझिटिव्ह होण्यासाठी
मनातल्या मनात सापडते जागा रुसल्यावर बसण्यासाठी
साधा सोपा मंत्र असतो स्वतःला स्वतःच जपण्यात
आपण मात्र वेळ गमावतो नको तिकडे धावण्यात
#गौरीहर्षल #२७.३.२०१९











गुरुवार, २६ मार्च, २०२०

खरंच अस कधी


खरंच असं कधी झालं तर 
सकाळच्या पहिल्या किरणांपासून
पसरत गेला हवाहवासा वाटणारा प्रकाश 
आनंदाचा, चैतन्याचा आणि मन शांत करणारा

खरंच असं कधी झालं तर 
भरून घेताना नवासा श्वास नवीन दिवसात
सोडून गेले सगळे दुःखाचे अडकलेले क्षण
मनातून, स्मृतींतून आणि भरलेल्या त्या डोळ्यांतुन

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्यात उरलीच नाही जागा
सतत दुःख वाटण्यासाठी आसुसलेल्या
नकोशा गोष्टींना, वस्तुंना आणि माणसांनाही

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला 
मिळाली एक नवी दिशा
बदलणारी, हसवणारी आणि नकळतच मळभ दूर करणारी 

खरंच असं कधी झालं तर 
जगण्याचा होऊन जाईल उत्सव
सुखा-समाधानाच्या हातात हात घालून
मनाला मिळेल उभारी पुन्हा पुन्हा आशेने जगवणारी.......

#गौरीहर्षल #२०/९/२०१८

कधीतरी मला हवं तसं

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

कितीतरी गोष्टी राहून गेल्या आहेत रे करायच्या
मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत याद्या त्यांच्या
निसटलेलं बालपण अन्  न जगलेले असंख्य क्षण
रोज एकदा तरी येऊन जाते मला त्यांची आठवण

आशेच्या झोपाळ्यावर झुलायचे अजून किती
तिथे आजूबाजूला आहेत मोडलेल्या स्वप्नांच्या भिंती
सतत त्या मला खुणावतात वेडावून दाखवल्यासारख्या  
डोळ्यासमोर येतात त्या आठवणी जखमांसारख्या

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

न मागता मिळेल असं काहीच नाही ह्या जगात
अन्  मागूनही मिळावं अशी अपेक्षा नाही मनात 
म्हणूनच हे मागणं करतेय, मी तुला आणि मला 
ह्यावेळी तरी देऊ संधी आपल्या त्या जगण्याला

नेमकं मला हवं आहे काय? 
खुप काही नाही फक्त एकदा,
हसायचं आहे मनापासून डोळ्यात पाणी येईपर्यंत
झोपाळ्यावर झुलायचे आहे तो आकाशी नेईपर्यंत 
साधी सोपी स्वप्नं आहेत ज्यांना लागत नाही पैसा
सोबतीला मात्र हवा आहे श्वास मला पुरेसा

खेळ आपला लपंडाव, 
तुझ्यामागे सतत चालू माझी धावाधाव 
कुठेतरी थांबून घ्यायची आहे विश्रांती
प्रवास करताना रस्ता चुकू नये ही हवी आहे खात्री
सगळं नीट होणारच आहे हे कळायला हवे
त्यासाठी आयुष्या आपले नाते जुळायला हवे

म्हणूनच म्हणते ....
कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या, 
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या,
                                     भिज ना रे आयुष्या....
#गौरीहर्षल #२.१०.२०१८


तुमसे ही

#तुमसे_ही
 

गाणं तसं फुल रोमँटिक वगैरे टाइप आहे बर का ...
पण मला आपलं नेहमीची खोड आहे वेगळंच काहीतरी शोधायची ते कसं ते सांगते ....

कशाच्या तरी शोधात निघालेला एक जीव , ज्याला खूप काही हवं आहे आयुष्याकडून. अगदी टिपिकल सामान्य माणसाच्या सारखं सगळी सुखं हवी आहेत. तो ती सतत त्या वरच्याकडे मागत फिरत असतानाच त्याला अस काही गवसतं जे सहजासहजी आजवर कुणालाच मिळालेलं नाही असेच काही पहिल्या कडव्यात येते.....
ना है ये पाना
ना खोना ही है
तेरा ना होना जाने
क्यूँ होना ही है
म्हणजे ज्या शोधात  मी निघालो होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अस काहीतरी मिळालं आहे आणि ते शब्दातीत आहे. जे असूनही नाहीये आणि नसूनही आहे. 

तुमसे ही दिन होता है
सुरमई शाम आती
तुमसे ही, तुमसे ही
हर घड़ी साँस आती है
ज़िंदगी कहलाती है
तुमसे ही, तुमसे ही…

ते जे काही गवसलं आहे न ते सगळ्या चराचरात व्यापून उरलं आहे. त्याच्यामुळेच ही सृष्टी सुरळीत चालू आहे तिला जिवंतपणा, रसरशीत पणा लाभला आहे.जो आयुष्य म्हणवला जातो.

आँखों में आँखें तेरी
बाहों में बाहें तेरी
मेरा ना मुझमें कुछ रहा… हुआ क्या
बातों में बातें तेरी
रातें सौगातें तेरी
क्यूँ तेरा सब ये हो गया… हुआ क्या
इतके दिवस मी हे सगळं माझ्या अज्ञानी डोळ्यांनी बघत होतो पण आता मात्र मला त्याच्या नजरेने ह्या सगळ्याचा एक वेगळाच अर्थ कळतो आहे. जो शब्दांत मांडण्यासारखा नाहीये किंवा खरं तर तो शब्दात वर्णावा असे शब्दच नाहीयेत. निर्सगाशी समरस होणं काय हे मी अनुभवतो आहे. 

मैं कहीं भी जाता हूँ
तुमसे ही मिल जाता हूँ
तुमसे ही, तुमसे ही
शोर में खामोशी है
थोड़ी सी बेहोशी है
तुमसे ही, तुमसे ही…

मी कुठेही जातोय तिथे मला त्याच अस्तित्व जाणवत आहे. इथे अजून एक गाणं आठवलं "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया" अशीच काहीशी अवस्था. शांततेत आणि कोलाहलात सुद्धा जाणवणारे त्याचे अस्तित्व..... कालातीत असे.....

आधा सा वादा कभी
आधे से ज्यादा कभी
जी चाहे कर लूं इस तरह वफ़ा का…
छोड़े ना छूटे कभी
तोड़े ना टूटे कभी
जो धागा तुमसे जुड़ गया वफ़ा का…

त्याला मी आता वचन तरी काय देऊ , त्याच्याकडे मागू तरी काय???? फक्त जोडले गेलेले हे अव्यक्त नाते असेच चिरंतन राहूदे हीच इच्छा....

मैं तेरा सरमाया हूँ
जो भी मैं बन पाया हूँ
तुमसे ही, तुमसे ही…
रास्ते मिल जाते है
मंज़िले मिल जाती है
तुमसे ही, तुमसे ही…

तुझ्या सावलीत मी एक हिस्सा होऊन गेलो आहे , इथून पुढे रस्ते, ध्येय ह्यांची मला काळजी उरली नाही ते आपसूकच मला शोधत येतील ही खात्री आहे.
तू आहेस तिथे कमतरता कशी असेल ???? 
#गौरीहर्षल #७.१०.२०१८

अधीर मत हो मन

अधीर मत हो मन
ये दिन भी जाएंगे
हसते मुस्कुराते खुशी के पल
वापस लौट के आएंगे

तब तक तू धीरज से काम ले
खुदही खुदको थाम ले
रूककर जरा सोच कुछ समय
तभी तो थमेगा ये बिन बुलाया प्रलय

आज तू अगर रुक गया 
समझ बहुत कुछ पाएगा
आनेवाला हर दिन
खुशी भरभर के लाएगा

अधीर मत हो मन
तू ही तुझको संभाल सकता है
तेरा संयम तेरे लिए
वरदान बन सकता है 

थोड़े दिन खामोश रहके 
अपनी ताकत बढा के तो देख
हर कोई जुटा है इसी कश्मकश में 
तू जरा नजर उठा के तो देख

तू अपनी मर्जी का मालिक है
सारी दुनिया जानती है
इसीलिए तो तू खुदको रोक
ना बिना बात के कर नोंक झोंक

मिले हुए पलों में खुशियां बटोर ले 
चार दिन अपनों के साथ बाँट ले
सबकुछ अब तुझपे निर्भर है
तेरे ही हाथों में कल की डोर है

इसीलिए कहती हूँ
अधीर मत हो मन 
उम्मीद से भर दे तू
आज मेरा आँगन
#गौरीहर्षल
२५.३.२०२०

अलक

#अलक

१.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती. 
कारण एकच ती मुलगी होती 

२. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली .
कारण तेच ...

३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या.
कारण तेच ....

४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. 
पण ह्यावेळी कारण वेगळं होतं 
तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसावला. 
कारण तेच ....

#गौरीहर्षल
#२४.४.२०१९