मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

जो थांबला तो संपला

#जो_थांबला_तो_संपला
"जो थांबला तो संपला" हे आपल्या मनावर इतकं खोलवर रुजलेलं आहे की आपण त्याचा शब्दशः अर्थ घेतो. 
पण आपले सुप्त मन याला मानत नाही. ज्या वेळेला आपण 'वाया गेलेली' म्हणत असतो , त्याच वेळी ते माहितीवर प्रक्रिया करते, ती साठवते आणि पुनर्बांधणी करते. आपल्या मेंदूची खरी जीवशास्त्रीय(biology) रचना अशीच काम करते.
नीट विचार केला तर लक्षात येईल की कुठेतरी हे गणितच चुकले आहे. विश्रांती ही मिळवण्याची गोष्ट बनली आहे. काम पूर्ण केल्यावर मिळणारे एक बक्षीस अशा अर्थाने आपण तिच्याकडे पाहतो. आपल्या डोक्यात जातात हे झालं की मग मला आराम मिळेल, ते पूर्ण केलं तर मला मनःशांती मिळेल असे विचार असतात. आणि ह्या 'पूर्ण'ची व्याख्या सतत बदलत राहिल्यामुळे, विश्रांती कधी मिळतच नाही. 
जेव्हा शरीर थकलेले असते आणि आपण तरीही त्याला काम करण्यासाठी अजून धक्का मारत असतो , तेव्हा विचार करण्याची गती मंदावते आणि भावनांवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. तुमचे मन हे सर्व कुठेतरी टिपून ठेवत असते. 

पण आपल्या तयार झालेल्या माईंड सेटमुळे आपण विश्रांतीला काय समजत असतो ते बघा...
आपल्याला असं वाटत असतं आपण जेव्हा विश्रांती घेत असतो तेव्हा आपण तो वेळ वाया घालवत असतो. कारण आपल्याकडून कोणतंही काम होत नाही. आणि कोणतही काम होत नाही म्हणून नकळतच आपण स्वतःचीच किंमत कमी करत असतो. 

लक्षात घ्या, आठवड्यातून एकदा मिळणारा सुट्टीचा दिवस हा ऐच्छिक पर्याय नसून तुमच्या मज्जासंस्थेसाठी तो गरजेचा असतो. आणि हे आपल्याला नव्याने शिकणं गरजेचं आहे. 

तुम्हाला काय वाटते?
१. कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःला विश्रांती घेण्यासाठी वेळ देता का, की फक्त थकल्यावरच थांबता?
२. 'काहीही न करणे' म्हणजे वेळ वाया घालवणे असे तुम्हालाही वाटते का?
३. तुमच्या मते शरीरापेक्षा मनाची विश्रांती जास्त महत्त्वाची आहे का?
आतल्या आत घुसमटण्यापेक्षा, व्यक्त व्हा... कारण संवाद हीच समाधानाची पहिली पायरी आहे.
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

1 टिप्पणी:

निनावी म्हणाले...

शरीराबरोबर मनालाही विश्रांती देणं गरजेचं असतं त्याशिवाय पुढचं काम आपण उत्स्फूर्तपणे करत नाही