सोमवार, १६ मार्च, २०२६

असं का झालं?

#असं_का_झालं? 
जेव्हा उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा शांतपणे पुढे जाणंच चांगलं...
"काही गोष्टींचा शेवट ' आता सगळं काही नीट झालंय' अशा उत्तराने किंवा स्थितीत होत नाही; तर तो होतो मनाला झालेल्या स्पष्ट जाणिवेने आणि स्वतःच्या स्वाभिमानाने."

कधीकधी आपल्या आयुष्यातली काही पावलं अशी असतात की तिथे समोरचा माणूस आपल्याला ना काही सांगतो, ना आपली माफी मागतो. आपण मात्र उगाच विचार करत बसतो की 'असं का झालं?'

तुमच्यासोबत सुद्धा असं झालं असेल ना??? 
पण खरं सांगू का? 
मनाला शांतता मिळवण्यासाठी समोरच्याने उत्तर द्यायलाच पाहिजे असं काही नसतं.
जेव्हा आपल्याला वस्तुस्थिती नीट समजते, तेव्हा ती गोष्ट तिथेच संपते. आपण जसा विचार केला होता तसं जग नसतं, हे जेव्हा आपल्याला उमजतं ना, तेव्हा एक प्रकारची शांतता मिळते. त्या शांततेत आपला स्वाभिमान जागा होतो आणि आपल्याला सांगतो की, "जिथे तुझी किंमत नाही, तिथे आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही."
कोणत्याही उत्तराची अपेक्षा न ठेवता आयुष्यात पुढे जाणं म्हणजे हार मानणं नसतं; तर तो स्वतःचा सन्मान करण्याचा एक मार्ग असतो. शेवटच्या शब्दासाठी भांडण्यापेक्षा स्वतःच्या मनाची शांतता निवडणं कधीही श्रेष्ठच!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही healing journey सुरू करायची असेल,
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: