मॉर्निंग मंत्रा १

#मॉर्निंग_मंत्रा १ 

१९ ऑक्टोबर २०२२

#थॉट्स_पॅटर्न (स्विकार आणि बदल) 

Acceptance म्हणजे स्विकारणं. 

आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण नाईलाजाने स्विकारतो. 
पण काही गोष्टी मात्र खरोखरच स्विकारण्याची गरज असते. 
जसं की, 
- स्वतःला आहे तसं स्विकारणं 
- आपल्यामध्ये असलेले दुर्गुण स्विकारणं 
- आपल्याला एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, घटनेचा त्रास होतो हे स्विकारणं. 
- आपणही चुकू शकतो, चुकलो आहोत, चुकतो आहोत हे स्विकारणे

आपली बऱ्याच परिस्थितीत प्रतिक्रिया काय असते माहीत आहे? मला नाही करायचं हे, लोक काय म्हणतील? , मला जमणार आहे का असलं काही? म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला पलायन करायचे असते. 

पळायचे मग ती एखादी समस्या असो किंवा आलेली संधी. 

पण पळून प्रश्न सुटतात का? विचारा.... स्वतःला विचारा की बाबारे आत्तापर्यंत मी कितीतरी वेळा कितीतरी गोष्टींपासून, माणसांपासून , समस्यांपासून, संधींपासून पळालो आहे तर त्यामुळे माझे प्रश्न सुटले की अजून गुंतागुंतीचे झाले? 

जर उत्तर सुटले अस असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत🙏 ग्रेट आहात तुम्ही. 

पण जर गुंतागुंत वाढली असेल तर ती सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? की नेहमीप्रमाणे कुणीतरी दुसऱ्याने येऊन माझ्या समस्येवर उपाय शोधून द्यावा म्हणून वाट बघत बसला आहात? 

आता आजूबाजूला मी असे अनेक जण बघतेय जे अस करतात. स्वतःच्या समस्येवर स्वतः काहीच करायचं नसतं ह्यांना दुसऱ्याने ह्यांच्या समस्येवर विचार करून, कृती करून सगळं आयतं ह्यांना आणून दिले पाहिजे का? तर उद्या पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झालाच तर पुन्हा एकदा हे दुसऱ्यांवर खापर फोडायला मोकळे. 

अशा लोकांना आयुष्यात कधीच काहीच धड जमलेलं नसतं. हेच का असे अनेक जण सापडतील जे सकाळी बस चुकल्यापासून ते रात्री झोप नीट लागली नाही इथपर्यंत दुसऱ्यांना दोष देत असतात. 

त्यांना मला विचारावेसे वाटतं की तुम्ही स्वतःच्या वागण्याचं, बोलण्याच काही निरीक्षण कधी केलं आहे का? 

तुम्ही स्वतःला स्वतःसाठी कधी बदललं आहे का? 
उशीर होतो म्हणून लवकर उठुया अस कधी ठरवलं? रात्री उशिरापर्यंत जागत बसण्यापेक्षा लवकर फोन बाजूला ठेवू अस कधी केलं? उत्तर अर्थातच नाही असं असतं. 

एखादी व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाली की आपण त्याच्या यशाची पिसे काढू लागतो. कुणालाही त्या व्यक्तीचे श्रम दिसत नाहीत. 

तुम्हीही विचार, कृती बदलून बघा ,सातत्याने प्रयत्न करा , तुम्हीही व्हाल की यशस्वी. ह्यावर लगेच सुरू नाही हो , अस काही होत नाही. अरे मग अभ्यास वाढवा ,निरीक्षण करा,  कुठे काय चुकतंय बघा, नोंदी घ्या , पद्धत बदलून बघा ह्या गोष्टी सगळ्या बाबतीत लागू पडतात शाळेच्या अभ्यासपासून ते नाते आणि व्यवसाय नोकरी इथपर्यंत. 

मी जेव्हा लोकांना गाईड करत असते तेव्हा बऱ्याचदा एक कॉमन प्रश्न विचारला जातो,  आयुष्यात सतत अडथळे येतात, समस्या निर्माण होतात, कुठल्याही गोष्टीत यश मिळत नाही. 

अशा बाबतीत माझं साधं सरळ विचारणं असत, स्वतःच्या बेसिकवर काम केले आहे का? ते करण्याची तयारी आहे का? 

बेसिक म्हणजे काय? तर आपल्या मनात सतत येणारे विचार. मग ते स्वतःबद्दल असू दे किंवा इतरांबद्दल.

एक छोटासा टास्क करून बघा. हा लेख वाचल्यापासून पुढचे काही तास स्वतःच्या वागण्याचं निरीक्षण करा. आपण किती वेळा स्वतःबद्दल वाईट बोलतो ते बघा. कितीवेळा समोर आलेल्या, व्यक्ती, वस्त बद्दल वाईट विचार करतो ते बघा. हा विचारांचा पॅटर्नच तुमच्या अपयशाचं कारण असतो. 

हा आपल्या सगळ्यांचाच एक महत्वाचा दुर्गुण आहे. उघडपणे किंवा मनातल्या मनात सतत चुकीचे विचार घोळवत राहायचं. सगळेच अस करतात , कुणीही संत नाहीयेत. 

हे अस का घडतं? तर बऱ्याचदा आपल्या स्वतःबद्दल वाईट विचार करणं हे आपण लहानपणापासून जे काही इतरांकडून ऐकत आलो आहोत त्यामुळे असतं. आणि इतरांबद्दल ? ते ही तसच. घरातली मोठी मंडळी बऱ्याचदा लहान मुलांच्या उपस्थितीतच नातेवाईक, शेजारी, स्नेही, सहकारी ह्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करत असतात. 
झालं अनुकरणातून मुलंही तेच शिकतात. 


म्हणून आपल्याला सगळ्यात आधी आपल्या थॉट पॅटर्न वर काम करावं लागणार आहे. त्यासाठी स्वतः चुकत आहोत हे स्विकारण्याची गरज आहे. 

काही तास स्वतःच निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला आपोआपच लक्षात येईल की तुम्ही काय विचार करता आणि किती पातळीवर जाऊन करता. 

त्यानंतर पुढची स्टेप घेता येईल. 

मंडळी, अध्यात्मिक साधनेत जर प्रगती करायची असेल न तर हा पाया नीट करणं प्रचंड गरजेचं आहे. कुणी त्रास दिला असेल आणि त्यामुळे तुम्ही चिडत, रागवत असाल तर गोष्ट वेगळी. पण जर विनाकारणच तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर मात्र त्यावर उपाय करणे आवश्यक असते. 

सो लोक्स, 

आयुष्याला बनवायचे असेल सुखकर
तर नकारात्मक गोष्टींना दूर कर 

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Aayushyakade pahanyacha navin drishtikon dila aaj ya lekhachya madhyamatun. Aaplyala mahit aste ki kalat nkalat kelelya pratyek vicharacha parinam aplya ayushavar hoto tari aapan tasch vagat rahato.ha lekh kuthetari yogy marg dakhavnara aahe. Dhanyawad Tai
Swapnali C Jadhav म्हणाले…
Agadi khar aahe tai tumche.
Barech vela aapan aplya life madhil problem sathi dusryala dosh deto pan aapan suddha chukat asu hi gosht manya nahi karat aani problem ajun vadhtat.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी