शुक्रवार, २७ मार्च, २०२०

बिती हुई बतीयां

#बीती_हुई_बतियाँ 

                   बीती हुई बतियाँ कोई दोहराये, 
                  भूले हुए नामों से कोई तो बुलाये
ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले. खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले. 
लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं  कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.  
माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.
जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली. 
संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत  पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....
बीती हुई बतियाँ कोई दोहराये,
भूले हुए नामों से कोई तो बुलाये💖💖
#गौरीहर्षल
२८.१२.२०१७

टेक अ चान्स

#टेक_अ_चान्स
"Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be. "

        स्वतःच भिंतीवर चिकटवलेलं  हे वाक्य  सायलीच्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. निमित्त होतं तिच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं. 
      सायली, वय वर्षे 40, सुस्वभावी  उच्चशिक्षित गृहिणी. गृहिणी हा तिचा स्वतःचा चॉईस.मुलं लहान असताना धावपळ करत राहिलो तर खूप काही सुटून जाईल असा तिचा समज होता. म्हणून तिनेच मी करेन एडजस्ट म्हणत चांगली सुरू असणारी नोकरी सोडून घरी राहायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्यांनी तस तिला वेड्यात काढलं. पण आता काही वर्षांनी तिच्या मुलांना , घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला तिने घेतलेला निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागलं. 
       आता कुणी म्हणेल अस वेगळं काय केलं होतं?  खूप काही नाही पण सायली आणि तिचा नवरा राजीव दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या होत्या . दोघांपैकी एक जण घरात असल्याने त्या गोष्टी त्यांना जरा नीट कार्यन्वित करता आल्या इतकंच. त्यांच्या घरात टीव्ही अजिबात नव्हता पण पुस्तकं मात्र भरपूर होती. मोबाईलचा  वापर अनिवार्यच असल्याने तो घरात होता पण वापरण्याचा वेळ मात्र ठरवलेला होता. या आणि अशा इतर लहानसहान सवयीमुळे मुलं आपोआपच वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली. अर्थातच त्याचा प्रभाव इतर क्षेत्रात दिसू लागला. 
दोन्ही मुलं  स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून त्या दिशेने वाटचालही करू लागली होती. असो पण आपली गोष्ट सायलीची आहे . आता मुलांची जबाबदारी कमी झाल्याने सायलीकडे खूप मोकळा वेळ असे. यावेळाच काय करावं हे काही तिला सुचत नव्हतं. अशातच तिच्या घराजवळ एक नवीन कंपनी सुरू झाली. कंपनीची मालकीण म्हणजे शेजारच्याच कॉलनीत राहणारी दीप्ती होती. गृहिणी असणाऱ्या बायकांना लक्षात ठेऊनच तिने काही नवीन पद्धती सुरू केल्या होत्या. पण नवखी असल्याने तिचा थोडाफार गोंधळ उडत असे. सायली आणि तिच्या शेजारच्या सगळ्यांना  तिथे येण्याचे आमंत्रण दिले होते. म्हणून सगळं महिला मंडळ आज लवकर काम आवरून दुपारी त्या छोटेखानी मॉल मध्ये पोहोचले. एकाच छताखाली बऱ्याच सोयी देण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त स्त्रियांसाठी अन् तेसुद्धा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी खासकरून.  परवडतील असे दर आणि बचतगट वगैरेंच्या मदतीने चालवली जाणारी दुकानं. 
सायली आणि सगळ्या जणी खूपच खुश झाल्या हे सगळं पाहून. अशातच एका ठिकाणी काहीतरी खूप गोंधळ निर्माण झाला अन् सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं. उत्सुकता म्हणून सगळ्या तिकडे वळल्या. बिल काउंटर वर गोंधळ होऊन चुकून काही झाल होतं. दीप्ती कुणाशी तरी फोनवरून येण्याबद्दल बोलत होती. पण तिथेही काहीतरी प्रॉब्लेम होत असल्याने ती जरा गडबडली होती. सायली हळूच तिच्याजवळ गेली आणि तिने मी बघू का असा विचारलं. दिप्तीला आश्चर्य वाटलं पण तिने होकार दिला. थोड्या वेळातच सायलीने बिलात झालेला घोळ सांगत काय चुकलं हेही दाखवलं आणि योग्य भाषेत काम करणाऱ्या मुलींना समजही दिली. दीप्ती हे सगळं बघत होती आणि अचानक तिने एक निर्णय घेतला. 
तिने सायलीच्या समोर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन संभाळशील का? असा प्रश्न ठेवला. त्याच प्रश्नावर विचार करता करता सायली आज गोंधळली होती. 
संध्याकाळी राजीव आणि मुलं घरी आली तस तिने झालेला प्रसंग त्यांना सांगितला आणि काय करू असही विचारलं. त्यावर मुलं आणि राजीव अर्थातच उत्साहाने म्हटले की संधी  मिळाली आहे तर सोडू नकोस. त्यांनी गोंधळलेल्या तिला तिनेच चिकटवलेलं वाक्य दाखवलं. तिने दिप्तीला होकार कळवला. रात्री उद्या किती आणि काय आवरत निघावं लागेल याचा विचार करतच ती झोपली.
नेहमी 5च्या ठोक्याला उठणाऱ्या  तिला सकाळी मात्र उशिरा जाग आली. अस कस झालं ह्याचा विचार करत ती स्वयंपाक घरात शिरली आणि समोरच दृश्य पाहून चकित झाली. नवरा आणि मुलं सगळं आवरून नुसते तयारच नव्हते तर तिच्यासाठी नाश्ता, एक फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवला होता. ती समोर दिसताच मुलं तिला येऊन बिलगली आणि बेस्ट लक म्हणाली.  इथून पुढे मात्र सायलीला स्वतःला सिध्द करायचं होतं. ते अर्थातच ती करणारच होती. आपलं आवडतं वाक्य मनात घोळवतच सायलीच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली . 

तात्पर्य काय   तर हेच  "Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be." स्वतःला एक संधी तर देऊन बघा कोण जाणे कदाचित सुरेख अस काहीतरी  निर्माण होईल . 
#गौरीहर्षल
१७.७.२०१८

चले आओ

चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर 
जहाँ कभी सूरज डूबा था
हमें देखते हुए
चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर
जहाँ हमारी हँसी सुनकर 
माहौल खुश हुआ करता था
चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर
क्योंकि
आज भी वो मोड़ 
तुम्हारी याद लिए यूँही बैठा है
खुश होनेकी चाह में
आज भी सूरज 
हमारे चेहरे की वो रोशनी ढूँढता है
फिरसे आनेकी चाह में
उम्र छीन ले गयी वो मासूमियत पर 
दिल अभीभी वहीं है
फिरसे जीने की चाह में
चले आओ बस.....
#गौरीहर्षल #१९.१०.२०१९

उधार का इतवार

उधार का इतवार
इतवार  उधार का  लगता है आजकल
पूछूँ मिले तो कहा है मेरे वो अपने पल
अजनबी रास्तो और गलियों में अपना कोई मिलता नहीं
क्या करें अपनोकी गलीसे आजकल मैं भी तो गुजरता नहीं
दरवाजे पर दस्तक मेरे नाम की तो होती है
पर खोलने के बाद मुलाकात काम से ही होती है
बचपन का इतवार लाता था मस्ती के साथ सुकूनभरे पल
आज का इतवार स्क्रीन के साथ ही होता है आंखोंसे ओझल
किसी को मिले अगर सुकूनभरा वो इतवार
मिलवाना जरूर, मुझे भी है उसका इंतजार
#गौरीहर्षल
६.१.२०२०



सामान्य

खरच छान आहे सामान्य असणं
सगळं जगच आपलं आहे असं वाटणं
हसणं, रुसणं, बोलणं , वागणं
असूनही नसणं, नसूनही असणं
कुणाला तरी आठवणीत आठवण
कुणाच्या तरी आठवणीत रेंगाळण

स्वप्नांचे इमले बांधत राहणं
पूर्ण होवो न होवो
सतत स्वप्न बघत राहणं
त्यात रमूनही वास्तवात जगणं
खरच छान आहे सामान्य असणं

असंच रहावं सगळं साधंच
स्वप्नांच्या दारावर सतत तोरण आशेच
वास्तवात न मिळणारी सुखं शोधण्यासाठी
बळ मिळत राहावं प्रकाशाचं
9.1.2020
#गौरीहर्षल

सुखाची व्याख्या

सुखाची व्याख्या असते प्रत्येकाची वेगळी
भौतिक, आत्मिक आणि निरनिराळी
कुणीतरी आनंदी असतं आनंदाच्या कल्पनेत
कुणालातरी सुख गवसतं पैश्याच्या दुनियेत
सुखाच्या शोधात सगळे धडपडत असतात
त्यातले किती जण स्वतःला सापडतात??
दुसऱ्याला आनंदात बघतात आणि होतात दुःखी
असे कसे हे जीव इतरांवर जळून होतील सुखी??
मनापासून सुखात साद हल्ली कुणी घालत नाही
दुःखात मात्र इतरांच्या सोबतीची हवी ग्वाही
सुख म्हणजे काय असतं? 
हाती न लागणारं मृगजळ
सुख म्हणजे काय असतं?
हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावपळ
सुख म्हणजे काय असत? 
कुणालाही अजूनही सापडलं नाही
तरी त्याच्या मागे आयुष्य खर्ची करणं 
माणसाने सोडलं नाही.
सुख असतं समाधानाने जगण्यात,
आपल्यासोबत इतरांना सुखी असुदे म्हणण्यात.
सुख असत लहान मुलांच्या निरागस हसण्यात, 
नको नको म्हणताना मायेने भरवलेल्या घासात.
सुख असत आपल्या माणसाच्या सहवासात,
कसलीही जाहिरात न करता घालवलेल्या क्षणात.
सुख असत आपल्याच हातात, मनात आणि विचारात,
छोटया छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात. 
लिस्ट तशी मोठी सुख सापडणाऱ्या जागांची 
पण 
प्रत्येकाची वेगळी असते न व्याख्या सुखाची......
#गौरीहर्षल
४.१.२०२०





दोन शब्द कौतुकाचे

#दोन_शब्द_कौतुकाचे

       निखिलने लहानपणापासून आईवडील,आजीआजोबा सगळ्यांनाच दुसऱ्याचं भरभरून कौतुक करताना बघितलं होतं. म्हणजे ते उठसुठ कुणाचंही कौतुक करायचे अस नाही. पण जो खरंच काहीतरी छोटीशी का होईना कृती करतोय त्याचं ते कौतुक करायचे. पण ते सुद्धा अस की समोरच्याच्या डोक्यात हवा न जाता तो अजून अजून चांगलं वागण्यासाठी प्रयत्न करेल.
 निखिलला कळू लागलं तसा तो सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा की," समोरचा तर आपल्या बाबतीत चांगलं बोलत नाही किंवा खूप कमी बोलतो मग आपणच अस का करायचं???"
 तेंव्हा त्याचे आजोबा त्याला समजावून सांगत की,"समोरचा आणि आपण ह्यात हाच तर फरक आहे. आपण आपल्या डोळ्यांना, कानांना, मनाला फक्त चांगलं बघण्याची, ऐकण्याची आणि करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही न काही चांगलं नक्की सापडतं. त्याचा खूप फायदा होतो बघ निखिल. आपण जेव्हा समोरच्या व्यक्ती मधून चांगलंच वाचतो न तेंव्हा आपल्याकडे फक्त चांगलंच येतं. मग त्याच्यात नी आपल्यात बाकी पातळ्यांवर किती का फरक असेना आपल्या मनात त्याच्याविषयी नको ते विचार येतच नाहीत. सो आपण खुश राहतो हा झाला आपला फायदा. आता जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टी साठी त्या व्यक्तींचं मनापासून कौतुक करतो तेव्हा नकळत का होईना ती व्यक्ती सुखावते. त्यामुळे होत काय तिच्याही मनात आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते. आणि त्याबरोबर ती अजून चांगलं काम करण्यासाठी तयार होते आपोआपच. अर्थात हे सगळं सगळ्यांच्या बाबतीत लागू होईलच अस नाही पण आपण मात्र आपलं काम करायचं. काही जणांना आपण जेन्यूईन आहोत हे लगेच कळतं काहींना उशिरा. पण कळतं हे नक्की आणि ह्या कौतुक ट्रॅकवर राहिल्याने  आपल्या आयुष्याची गाडी मस्त चालते. कधी कधी ना माणसाला फक्त कौतुकाची गरज असते आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी. आपण फक्त न मागता देत राहायचं त्याला कुठे खर्च येतो??? तुला एक गंमतही सांगतो कौतुक करण्याची सवय लागली की तू पुढे विसरूनही जाशील कुणाला कौतुकाने काय बोलला होतास, पण हे समोरची व्यक्ती मात्र कधीच विसरणार नाही बघ. आणि कधीतरी अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता." 
        ह्यातल्या काही गोष्टी निखिलला समजल्या काही नाही, पण आजोबांनी जे काही सांगितलं ते मात्र त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. 
जसं आपण म्हणतो की मुलं अनुकरणप्रिय असतात तसच काहीस पुढे निखिलच्या बाबतीत घडत गेलं. घरच्यांनी केलेले हे संस्कार त्याला उत्तम माणूस म्हणून उपयोगीपडत राहिले. पण आजोबांचं एक वाक्य मात्र त्याला अजूनही पटलं नव्हतं ते म्हणजे की,"अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता."  ते कसं होणार ह्याचा विचार कधीतरी त्याच्या मनात डोकवायचाच. त्याचीही प्रचिती त्याला आलीच लवकर. काही दिवसांनी तो ऑफिसमध्ये असताना त्याला एक फोन आला की तुमच्या आजोबांना चक्कर आल्याने ते फिरायला गेले असताना पडले आणि लोकांनी त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. नेमके आईबाबा आणि आजी नसताना हे झाल्याने निखिलच्या लक्षात येईना काय करावे. तो तसाच हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण तिथे जाऊन बघतो तर काय आजोबांवर आधीच उपचार सुरू केले होते. काहीतरी गुंतागुंत झाल्याने अर्जंट ऑपरेशनही करणे गरजेचे होते. त्याची प्रोसिजर पूर्ण करून डॉ फक्त निखिलच्या सहीसाठी थांबले होते. निखिल डॉ च्या केबिनमध्ये गेला आणि डॉ ना बघताच त्याला आठवले की हा तर गावी आपल्या शेजारी राहणारा सूरज तो दहावीत नको त्या मुलांच्या नादी लागला होता. हे जेंव्हा त्याच्या घरी कळालं तेंव्हा खूप मारलं होतं त्याच्या बाबानी त्याला. पण निखिलच्या आजोबांनी मध्ये पडत त्याच्या बाबांना समजावलं आणि एक संधी दे मुलाला असही सांगितलं. आजोबांच्या शब्दाखातर सुरजचे वडील तयार झाले. मग आजोबांनी सुरजला वेगळे घेऊन प्रेमाने समजावून सांगितले.काही दिवस सतत आजोबा त्याच्याशी बोलत. आजोबांच्या बोलण्याची पद्धतच अशी होती की सूरजच मन बदलून गेले. त्याने मन लावून अभ्यास केला अर्थातच मार्कही उत्तम मिळाले आणि त्याच  वर्षी बदली झाल्याने ते सगळे दुसरीकडे शिफ्ट झाले. त्यानंतर आजच तो निखिलला भेटत होता आणि तेही एका निष्णात सर्जनच्या रूपात. 
आजोबांचं ऑपरेशन उत्तमरीत्या पार पडले. निखीलसह सगळेच चिंतेत डॉ ची वाट बघत होते. डॉ सूरज समोर येताच सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तसं त्याने हसत हसत सांगितले की,"आजोबा आता ठीक आहेत काळजी करू नका. फक्त शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागेल."
त्यानंतर मात्र तो आजीकडे वळला धीर गोळा करून इतका वेळ आजी कशीबशी शांत उभी होती. सूरज त्यांचे हात हातात घेऊन म्हटला, "आजी...आज मी जो काही आहे तो फक्त तुम्हा दोघांमुळे त्यावेळेस मला सावरत, वेळोवेळी कौतुक करत तुम्ही जर मला योग्य मार्गावर आणले नसते तर मी आज कुठेतरी हरवलेला असतो. मग अशा आजोबांना मी कसं बरं काही होऊ दिलं असतं?"
सगळ्यांच्याच मनाला ह्या कृतीने खूप आधार मिळाला. 
काही वेळाने आजोबा शुद्धीवर आले हे एक चांगल लक्षण होतं त्यांच्या रिकव्हरीच. थोड्याच दिवसात ते नीट फिरूही लागल्याने घरी आले. एक दिवस असच शांत बसलेले असताना त्यांनी निखिलला विचारलं, "काय रे मग मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर???" तसा निखील हसू लागला. 
      तात्पर्य काय, तर कुणी कसही असुदे, वागुदे आपण मात्र आपल्या मनाला लागलेली चांगली सवय सोडायची नाही. कळत नकळतपणे होत गेलेल्या चांगल्या कृतींचं फळ योग्य वेळी योग्य स्वरूपात मिळतच हे नक्की. 

कौतुक केलं जाणं ही खूप महत्त्वाची भावना असते प्रत्येक व्यक्तीसाठी.  कौतुक करताना ते अर्थातच मनापासून असेल तर समोरच्या माणसाला त्यातला खरेपणा जाणवतोच. तर थोडंस ट्राय करून बघू इतरांचं , त्यांच्या योग्य कामाचं कौतुक करू आणि ते ही वेळेवर. कोण जाणे कधीतरी तो वर बसलेला आपल्या नावाचा कौतुकाचा ब्लॅंक चेक कुणाहाती पाठवेल😄😄 बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! 
शुभं भवतु..
#गौरीहर्षल.  ©Gauri Harshal Kulkarni
१८.७.२०१८