स्वामींचा प्रगट दिन आणि शेरुचा स्मृतिदिन

#स्वामींचा_प्रगटदिन_आणि_शेरूचा_स्मृतीदिन
लॉकडाऊन लागलं आणि दोन दिवसात आमच्या शेरूची तब्येत जरा जास्तच बिघडली. त्याच्याबद्दल मी हनुमान जयंती आणि हार्ट बीट या लेखामध्ये लिहिलेल आहे. शेरुला रामरक्षा आणि हनुमान चालीसाच प्रचंड वेड होत.  कोणी म्हणेल की कसं काय? पण ही खरंतर खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्याला घरात अखंड रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकायला हवी असायची. 
 आणि त्यासाठी एक सेपरेट मोबाईल, त्याच्यामध्ये ते दोन्ही स्तोत्र सतत चालू ठेवावे लागायचे. 
 कधी जर चुकून बॅटरी संपून मोबाईल स्विच ऑफ झाला तर त्याच्यावर पंजा आपटून फोन माझ्यापर्यंत आणून  सांगणं की चार्ज कर आणि लाव माझे गाणे. 
याचा अर्थ  फक्त रामरक्षा आणि हनुमान चालीसा एवढे दोनच गोष्टींशी संबंध होता.  बाकी शक्यतो फारसा काही त्याला लागायचं नाही. 
जेव्हा मी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा काही वाचायला बसायचे की शेरू महाराज समोर येऊन मस्तपैकी ऐटीत बसणार अन् ऐकणार. अजिबात हलणार नाही, तास दोन तास त्याची समाधी लागलेली असायची.  ते म्हणतात ना, की प्राण्यांना त्यांच्या जाण्याचा दिवस कळतो किंवा ते खूप संयतपणे स्वतःचा मृत्यू स्वीकारतात असंच काहीसं माझ्या शेरुनी केलं.  जेव्हा त्याला लक्षात आलं की आता आपण बरे होणार नाही आहोत. 
 डॉक्टरकडे जाणं सलाईन लावून घेणे हे तीन, चार दिवस झाल्यानंतर मात्र त्याने अन्न पाणी सोडून दिलं. जवळपास 15 दिवस तो थोडाफार काहीतरी बळजबरीने खाऊन त्यावरती असायचा.  पण शेवटी मात्र त्याने एक दिवशी माझ्याकडे बघितलं डोळ्यात पाणी होतं.  मी म्हटलं ठीक आहे बाबा तुला जे योग्य वाटतं ते तू कर. 
दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाला काय वाटलं माहित नाही. त्याने मला सांगितलं की मला शेरू साठी संक्षिप्त गुरुचरित्राची पोथी वाचायची.  एक दीड तासाचे पारायण असतं ते मी करणार आहे.  त्याप्रमाणे पहाटे उठून शेरुला मांडीवर घेऊन त्याने ती गोष्ट केली.  त्यानंतर तो ऑफिसला निघून गेला.  आणि साधारणतः दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान शेरू शांतपणे गेलेला होता.  त्याला कुठलाही त्रास झाला नाही असे भाव चेहऱ्यावर होते. 
 कुठेतरी असं आम्हालाही वाटलं की शेरूने  एक गोष्ट जाता जाता सांगितली.  माणसं सगळ्याचा मोह बाळगतात. 
 पण हे पिल्लं मात्र जीव लावतात, आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त प्रेम आपल्याला देतात आणि जायची वेळ आली की एक एक गोष्ट सोडत, सगळं काही इथेच त्यागून पुढच्या प्रवासाला निघून जातात  
स्वामींच्या प्रकटदिनी शेरू ने संक्षिप्त गुरुचरित्राचा पारायण करून घेऊन त्यानंतर स्वतः या सगळ्या गोष्टी स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट किंवा हा एक खूप वेगळा योगायोग होता. 
शेरु मुळे रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणण्याची, ऐकण्याची सवय इतकी सहज लागली की रोज ते आपोआपच होतं. 
त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असली तरीही त्याचं असणं जाणवतं ते  पद्माक्ष च्या कडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा साठी केल्या जाणाऱ्या हट्टामुळे. 
कुणी कितीही नाकारलं तरी माझ्या मनीमाऊनी नेहमीच त्या स्पेशल आहेत हे सिद्ध केलं. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

टिप्पण्या

Swapnali C Jadhav म्हणाले…
Khar aahe bolta nahi aal tari prani khup jeev lavtat.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी