स्वतःसाठी बदलताना 15

#स्वतःसाठी_बदलताना 15
 कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते ना की प्रचंड उलथापालथ सुरू असते. काहीही नीट घडत नसते, मन अस्थिर असतं, आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो, असं वाटत असतं की कुठून तरी एखादा तरी आशेचा किरण दिसावा.
आणि ॲट द सेम टाइम या सगळ्यांमध्ये आपण स्वतः सुद्धा स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करत असतो. 
माझ एक प्रामाणिक मत आहे की अगदी आत्महत्या करणारे व्यक्ती असू दे किंवा डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती... पहिल्या स्टेज पासून ते शेवटच्या स्टेजला पोहोचेपर्यंत व्यक्ती हात पाय मारत असते, प्रयत्न करते डायरेक्ट असं कोणीच या सगळ्या चक्रात जाऊन अडकत नाही. 
पण  जेव्हा ती व्यक्ती हातपाय मारायचा प्रयत्न करत असते, बाहेर पडायचा प्रयत्न करत असते, तेव्हा जर तिच्या जवळच्या लोकांनी तिला शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर??? कित्येक जीव तिथेच सावरले जाऊ शकतात. 
पण दुर्दैवाने आपल्याकडे याबाबतीत अवेअरनेसही कमी आहे आणि शक्यतो जर कोणी असं बोलायला लागलं तर त्याला टोचून टोचून बोलण्याचा प्रमाण खूप जास्त आहे. 
 उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जिच्या आयुष्यात नुकतंच काहीतरी घडून गेलेल आहे. घटस्फोट झालेला आहे किंवा तिचा आयुष्यात कोणीतरी मृत्यू पावलेल आहे त्या परिस्थितीतून सावरताना ती व्यक्ती बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला जाते. 
कुठलेही प्रयत्न... स्वतःला जिवंत असण्याची खूण पटवून देण्यासाठी... ती व्यक्ती चांगले कपडे घालून बघते तर तिला ऐकायला मिळतं, "अरे लगेच सावरलात? Xyz या गोष्टी झाल्या त्याला अजून फार वेळ नाही झाला एवढं कसं कोणी पटकन गोष्टी बदलू शकतो? तुम्हाला दुःख नाही होत?".
 अशाच काही गोष्टी अगदी नोकरी किंवा व्यवसायात फटका पडलेल्या माणसांच्या बाबतीतही होतात. चुकून ती व्यक्ती कुठे बाहेर गेलेली दिसली,  काही गोष्टी केलेल्या दिसल्या. रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलीये, काहीतरी वस्तू विकत घेताना दिसते.
" अरे आत्ता एवढा सगळा खर्च झालाय. तुम्ही कर्जात बुडलेले आहात तुम्ही हे सगळं कसं काय करू शकता???"
 हे त्या व्यक्तीला ऐकवलं जातं. ऐकवणाऱ्या व्यक्तीला जनरली गोष्टींच बॅकग्राऊंड माहीत नसतं. तिला फक्त तिच्या मनात जे आले ते फडकन बोलून मोकळं व्हायचं असतं.
समोरच्या व्यक्तीसोबत जे काही घडलं आहे त्याबद्दल सगळंच आपल्याला माहित असतं का? 
 जी व्यक्ती वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतीये की त्यासाठी पहिली स्टेपच ही घेत असते की मी माझ्या वातावरणातून बाहेर येऊन काही क्षण जगून बघावं मला पुन्हा तो आत्मविश्वास मिळतोय का? दुर्दैवाने हे केलं जात नाही की अशा गोष्टी ऐकायला मिळतात आणि लोक आतल्या आत घुसमटत राहतात. 
 सो इथे एक सांगणं आहे की समोरच्यावर वाईट वेळ आली आहे, तो त्या परिस्थितीतून जातो आहे, ती परिस्थिती किती बिकट आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर कुठलेही जजमेंट पास करू नये. 
 आपल्याला कुणाचं चांगलं करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नये. 
आणि जे अशा परिस्थितीतून जात आहेत त्यांनी मात्र एक गोष्ट नक्की करावी जर आपलं बाहेर निघायचं ठरलेल आहे तर आजूबाजूचा वातावरण,त्यामध्ये असणारी माणसं यांचा आपल्या मनस्थितीवर कितपत परिणाम होऊ द्यायचा हे आपण ठरवायचं. आपल्याला एकट्याच्या जीवावरती गोष्टी करता येत नसतील तर शक्य तिथे न लाजता "योग्य लोकांकडे" मदत मागायची. इथे मी योग्य लोकांकडे म्हणत आहे सरसकट सगळ्यांसमोर आपली परिस्थिती सांगून स्वतःच हसू करून घ्यायचं नाही.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
20.3.2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी