मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

Quote of the day 17

#Quote_of_the_day17


अमेय अगदीच शांत मुलगा. नाही म्हणायला ओळखीच्या लोकांमध्ये थोडा फार मिसळत असे पण बाकी अगदीच अबोल. अभ्यासात मात्र बऱ्यापैकी हुशार. त्यामुळेच तर कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन झालं आणि चांगली नोकरीही मिळाली. एकूणच काय निवांत आयुष्य चाललं होतं त्याचं. थोडया वर्षात लग्नाचं वय झालं म्हणून आईवडिलांनी मुली बघायला सुरुवात केली. अबोल असणाऱ्या अमेयला मात्र अत्यंत बडबड्या सखीने पसंत केले. हो तिनेच पसंत केले कारण हा पठ्ठया मुलगी कशी वाटली विचारलं की नुसता लाजत असे. मग शेवटी तिनेच होकार कळवला. योग्य मुहूर्त बघून लग्नही झालं. 
    अमेयच्या अबोल स्वभावाशी सखी जुळवून घेत होती. पण तिच्या येण्याने त्याच्या आईबाबांना मात्र घर भरल्यासारखं वाटत होतं. सतत तिची चिवचिव , वावरणं त्यांना आवडलं होतं. आवडलं तर अमेयला पण होत पण बोलणार कोण? असो असा त्यांचा संसार छान सुरू होता. वर्ष होत आल होत त्यातच नवीन पाहुण्याची चाहूल लागली.  सगळेच आनंदले. विचारले तरच बोलणारा अमेय आता मात्र हळूहळू बोलू लागला होता, सखीची जास्त काळजी घेत होता. बाळाशी गप्पा मारत होता. त्याच्यातले बदल सगळ्यांनाच सुखावणारे होते. आता सखीला सातवा महिना लागला होता डिलिव्हरी साठी ती माहेरी जाणार होती. त्यातच अमेयला परदेशी जाण्याची संधी आली. एक प्रकारे ते त्याच प्रमोशनच होतं, कारण सहा महिने तिथे जाऊन आल्यानंतर प्रमोशन फिक्स होतं. पण जर ही संधी नाकारली तर पुन्हा मिळणार की नाही ह्याची खात्री नव्हती. अमेयला कळत नव्हतं काय करावं जायचं ठरवावं तर सखीची अवस्था अशी आणि नाही म्हणावं तर भविष्यातल्या काही गोष्टी लांबणार आता तर कुठे त्या गोष्टींची खरी गरज पडणार होती. त्याने विचार करण्यासाठी 3 दिवसाचा वेळ मागितला. कारण निर्णय कळवल्यानंतर पुढच्या महिन्यात जावे लागणार होते. एक महिना वेळ तयारीसाठी दिला होता. 
थोडासा विचारातच तो घरी आला. त्याचा उदास चेहरा बघताच सखीला अंदाज आला होता की काहीतरी बिनसले आहे. फ्रेश झाल्यावर तो सगळ्यांसोबत चहा घेण्यासाठी आला. हळूच तिने विषय काढला काय झालं आहे ? 
दोन सेकंद थांबून अमेयने सगळी परिस्थिती सांगितली. मग प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या तिघांकडे बघू लागला. आई बाबा दोघेही म्हणाले तुम्ही दोघे मिळून जो निर्णय घ्याल त्यात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याची काळजी करू नका. 
मग सखी त्याच्या हातावर थोपटत म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यामुळे कन्फ्युज होतो आहेस. आणि माझीही इच्छा होती की बाळाच्या जन्माच्या वेळी तू सोबत असावस. पण बघ प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याकडे नोकरी हेच उत्पनाचे साधन आहे. आणि सध्या काही वर्षे मी पुन्हा नोकरीचा विचार करू शकत नाही,खर तर मला करायचा नाही कारण बाळाच्या महत्वाच्या दिवसात मला त्याच्यासोबत राहायचे आहे. आपली बऱ्यापैकी सेविंग जरी असली तरी तुझ्यावर जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे तू ही संधी सोडू नये असं मला वाटतं. आपण हे सगळं बाळाच्या भविष्यासाठी तर करत आहोत न मग त्यासाठी आता तडजोड केली तर काय बिघडलं. आणि राहिली गोष्ट सोबत असण्याची तर आता इंटरनेट मुळे आपण कधीही एकमेकांना बघू शकतो. तेंव्हा तू बिनधास्त जा, दोन्ही आईबाबा आहेत माझ्यासाठी. आणि सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे असे संपतील. अमेयच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं. ऑफिसमध्ये होकार कळवत अमेय तयारीला लागला आणि गेलाही. पुढे ठराविक दिवसांनी सखीची डिलिव्हरी झाली आणि गोंडस असा मुलगा झाला. अमेयने व्हिडीओ कॉलवरच समाधान मानले पण मन मात्र आता तयार नव्हते थांबण्यासाठी. लवकरच तो परतला अपेक्षित यश मिळाले. 
काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही. त्या क्षणी समोर असणाऱ्या गोष्टींचा विचार करावा की भविष्याचा. आपल्या जवळच्या माणसांचं मत नक्की विचारात घ्यावं. कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो कदाचित आपल्याला जास्त योग्य उत्तर मिळू शकते. कुठल्याही निर्णयाचा भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो हा विचार नक्की करावा 
Because,
The decisions you make today will determine the stories you tell tomorrow.
कसा वाटला Quote of the day नक्की कळवा.
थॅंक्यु❤️❤️ #गौरीहर्षल

Quote of the day 16

#Quote_of_the_day16


स्टेजवर मुलीचा सत्कार करण्यात येत होता. पण रजनीचे डोळे मात्र सतत भरून येत होते. कारणही तसंच होत रजनी आणि  तिच्या दोन्ही मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यातून मार्ग काढत आजचे यश मिळवले होते. इथे मुलीचा सत्कार बेस्ट बिझनेसवुमन म्हणून होत होता तर दोन दिवसांनी मुलाला त्याच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी सुवर्णपदक मिळाले म्हणून नावाजले जाणार होते. ह्या सगळ्यात जर कुणी त्यांच्यासोबत होते तर तो म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास. 
रजनीच्या नवऱ्याने अगदी मोक्याच्या क्षणी तिची आणि मुलांची साथ सोडून दिली होती ते ही नको त्या लोकांवर विश्वास ठेवून. तिने खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. नोकरी होती म्हणून रजनीला तशी काही आर्थिक काळजी नव्हती. पण अचानक आलेल्या या संकटाने ती नाही म्हटलं तरी कोलमडली. तिच्या मनस्थितीला समजून घेत वरिष्ठांनी काही  दिवस  तिला ब्रेक घ्यायला लावला. मुलं शाळेत गेली की रजनी तासनतास रडत असे. अशीच एके दिवशी ती विचार करत असताना तिची जवळची मैत्रीण स्मिता तिला भेटायला आली. रजनीला बघताच तिला अंदाज आला की ती काय करत होती.  तिने तिच्या ओळखीच्या एका बाईना सोबत आणले होते त्यांना घरकाम समजावून सांगत तिने आपला मोर्चा रजनिकडे वळवला. हे बघ रजनी जे झालं ते झालं, तू शक्य तेवढे प्रयत्न ही केलेस पण जर नाही समोरचा ऐकत तर काय करणार? तुझ्या सुदैवाने तू आर्थिक बाबतीत कुणावरही अवलंबून नाहीस. त्यामुळे तू आणि मुलं ह्या घरात निवांत राहू शकता. पण ज्या माणसाची लायकीच नाही त्याच्यासाठी तू अजून किती दिवस अश्रू ढाळत बसणार आहेस. विसरलीस का ती रजनी जी स्वतःबरोबर दुसऱ्यांसाठीही खंबीरपणे उभी असायची?  बाहेर पड ह्या सगळ्यामधून तुझी मुलं तुझ्याकडे आशेने बघत आहेत. तू कालही त्यांची हिरो होतीस आणि आजही आहेस. अस बघू नकोस मला आज इथे मुलांनीच यायला लावलं. मुलं मोठी झाली आहेत रजनी तुला आता अजून खंबीरपणे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठीही उभं राहावं लागणार आहे. आम्ही सतत सोबत आहोतच पण वाट मात्र तुझी तुलाच चालायची आहे हो न?? 
ह्यानंतरही असे कमकुवत क्षण आले रजनीच्या आयुष्यात नाही असं नाही. पण मुलं आणि जवळच्या लोकांच्या मदतीने ती त्यातून बाहेर पडली. आज दोन्ही मुलांचं जस स्वतंत्र अस्तित्व होत तसच रजनीचही होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अजून एक साक्षीदार होता तो म्हणजे स्मिताने कामासाठी आणलेल्या सखुबाई. त्या सतत निरीक्षण करत होत्या की कस रजनीने सगळं स्वीकारले. हे सगळं नुसतं बघतच नव्हत्या तर त्यातून धडा घेत त्यांनी स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं होतं.  आणि जमेल तसं त्या रजनीला अशाच काही स्त्रियांना समजून सांगण्यासाठी भेटायची गळ घालत असत.
ह्या सगळ्या गोष्टींचा काही जणींना फायदा नक्कीच झाला होता. 
परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही. ती कधी चांगली असते तर कधी वाईट. वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभं रहात जो स्वतःला सावरतो. त्याचं आयुष्य नक्कीच पुढे जाऊन एक उदाहरण म्हणून दिल जातं. परिस्थितीशी दिन हात करताना आपल्याला हे माहीत नसतं की कोण आपल्याला बघत आहे. पण जेव्हा आपण काही मिळवतो एका पदावर पोहोचतो. अन् कुणी कधीतरी येऊन सांगत की ही गोष्ट तुमच्याकडे बघून आम्ही शिकलो तेव्हा नकळतच जबाबदारी कळते. कदाचित ती गोष्ट छोटीशीही असू शकते पण समोरच्या व्यक्तीला जर त्याचा उपयोग झाला आहे तर ती नक्कीच महत्वाची आहे. 
So folks , 
Be strong...
You never know who you are inspiring.

कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. 
प्रतिक्रिया द्या. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

Quote of the day 15

#Quote of the day 15

यश आणि जय दोघे सख्खे भाऊ. यश थोरला तर जय धाकटा. यश जरा अभ्यासू त्यातच जास्त रमणारा अगदी आदर्श टाईप. त्याउलट जयला मात्र शेंडेफळ असल्याने सगळं काही स्वतःला आवडेल तेच करायला आवडत असे. जय लहान असल्यापासून जरा आईच्या मागेच जास्त वेळ असायचा. त्यामुळे त्याला स्वयंपाकाची गोडी कधी लागली त्यालाही कळालं नाही. आधी अगदी इमर्जन्सी किंवा फारच मूड आला तर एखादा पदार्थ करणारा जय हळूहळू जास्त रस घेऊन सगळं बघत असे. आईने आपल्या टिपिकल स्वभावधर्माला धरून विरोध केला पण थोडासाच. मुलांनी स्वयंपाक करू नये वगैरे काही तिचे विचार नव्हते पण जयने काहीतरी वेगळं करावं असं तिला वाटायचं. जसं चार लोक यशच कौतुक करतात जयच सुद्धा करावं अशी तिची इच्छा होती. 
      जयच्या आवडीला गृहीत धरून आईबाबा आणि यश नेहमीच त्याला प्रोत्साहन देत. पण जयला अजून स्वतःबद्दल तेवढा विश्वास वाटत नव्हता. ह्यावर उपाय म्हणून यश सतत त्याला नवनवीन प्रयोग करायला लावत असे. अभ्यासात फारशी गती नसल्याने हॉटेल मॅनेजमेंट करणं शक्यच नव्हतं. पण म्हणून जे कौशल्य आहे ते का वाया घालवायचे? मग बाहेरून ग्रॅज्युएशन करता करता यशच्या मदतीने जय वेगवेगळ्या ठिकाणच्या पदार्थांची खासियत शिकण्याचा प्रयत्न करू लागला. यशही स्वतःचे व्याप सांभाळून जमेल तेवढी मदत करत असे. आई आणि आजीच्या हाताखाली तयार झाल्याने त्याला पारंपरिक पद्धतीचे पदार्थ अगदी छान जमत होते. मग यशने त्याला फ्युजन करता येईल का ते बघ असा सल्ला दिला. घाबरतच जयने सुरुवात केली. पहिली ऑर्डर छोटीशीच होती पण त्या ठिकाणी दिलेले पदार्थ सगळ्यांना फार आवडले. त्यासोबतच अजून तीन ठिकाणी ऑर्डरही मिळाली. पहिली कमाई जयने यशच्या हातात ठेवली. ती पुन्हा त्याच्याच हातात टेकवत यश त्याला म्हणाला, सुरुवात केली तर सगळं जमत बघ पण आपण सुरुवातीला कच खातो. मला रुटीन लाईफ आवडतं पण ह्याचा अर्थ असा नाही की तुलाही तेच आवडावं. तुला स्वतःवर विश्वास असेल तर सगळं शक्य आहे. इथून पुढेही ते नक्कीच होईल.
गोष्ट साधीशीच पण खरा अर्थ सांगते. आपल्याला खूप काही येत असत पण चार लोकांसमोर ते आत्मविश्वासाने मांडणं जमत नाही. किंवा भीती वाटते. जर आपणच स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगात कुणीही ठेवणार नाही. ते म्हणतात न बोलणाऱ्याची मातीही खपते पण न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही. 
So If you do not believe in yourself....
chances are nobody else will. 
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल


 

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

Quote of the day 14

#Quote of the day 14

निकिता आणि निखिलचं अरेंज मॅरेज. निकिताच्या माहेरी जशी जॉइंट फॅमिली होती तशी निखीलकडे नव्हती. निखिलच्या घरात तो , त्याचे आईबाबा आणि बहीण एवढेच लोक. बाकी नातेवाईक येऊन जाऊन असत पण ते कधीतरी  निमित्तापुरते. त्यामुळे घरातील व्यवस्था आईच्या हातात होती. आणि इतक्या वर्षांची एकटीने सगळं करण्याची सवय त्यांनाही लागली होती. त्यात सुनेच्या येण्याने बदल होणार हे जरी गृहीत धरले होते तरी तसा अनुभव दोघींचाही पहिलाच असणार होता. इतर घरात जस होत असे तस त्यांच्या घरातही होई भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच. 
निकिताला मिळून मिसळून गोष्टी कराव्या वाटत तर सासूबाई ची एक पद्धत ठरली होती त्यांना ते तस हवं असे. ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण निखिल आणि त्याचे बाबा करत होते. पण सोल्युशन काय काढावं त्यांना समजेना. वयानुसार आईही नमतं घ्यायला तयार नाही मग शेवटी निखिलने वेगळं व्हायचं ठरवलं. त्याच सोसायटीमध्ये पण दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा एक फ्लॅट होता तो आणि निकिता तिथे राहू लागले. हळूहळू गाडी रुळावर आली. दोघीही आपल्या आवडीच्या कामात मन रमवू लागल्या. आई आणि निकिता दोघींनाही चूक कळली होती. पण आता बाबा आणि निखिल दोघांचंही म्हणणं होतं जे जस आहे ते तसच राहूदे. आपल्या सगळ्यांना एका स्पेसची गरज असते ती आपल्याला वेगवेगळ्या घरात राहून मिळतेय. कमी काम असल्याने दोघींनाही स्वतःच्या इतर गोष्टींना वेळ देता येतो आहे. आई इतकी वर्ष जे  करू करू म्हणत होती पण एकटीने घर सांभाळताना ते शक्यच नव्हतं आता तिला ते सगळं करता येईल. गरज पडली तर जवळच असल्याने आपण लगेच एकमेकांना बघू शकतो. त्यामुळे उगाच एकत्र राहण्याचा अट्टहास नको. ते दोघींनाही म्हणाले, तुम्ही बायका घरासाठी जगताना स्वतःला विसरता. तुमच्या आवडीनिवडी, छंद हे सगळं कुठेतरी हरवून जातं. आणि मग एका काळाने जेव्हा आयुष्यात तोचतोचपणा येतो तेव्हा साहजिकच चिडचिड सुरू होते. आम्हाला काय घरी आल्यावर तुमचे हसरे चेहरे बघितले की बरं वाटतं पण जेव्हा चिडचिड होते तेव्हा एकामागे एक सगळेच त्यात ओढले जातात. रुटीनमधून ब्रेक घेणं, स्वतःच्या आवडीनिवडी जपणं हेही तितकंच महत्वाचं असतं कारण त्यामुळे तुमचा दिवस चांगला जातो. आणि अर्थातच तुम्ही हे का विसरता की, You are someone's reason to smile.
छोटे छोटे प्रॉब्लेम असतात आयुष्यात पण आपण त्यांना मोठं करतो उगाचच आणि मग आपलं हसणंच हरवत जातं. एक गोष्ट नोटीस करा कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला ही खळखळून हसताना बघून नकळतच आपल्याही चेहऱ्यावर हसू येतं. मग जवळच्या लोकांना आनंदी बघितल्यावर तर नक्कीच जास्त आनंद मिळेल न?? 
So all readers keep smiling, stay happy always. You never know who is getting his/her reason to smile😊😊. 

कसा वाटला हा Quote of the day नक्की सांगा. 
2020 येतंय मग काय काय संकल्प करायचे आहेत आणि त्यातले पूर्ण किती करायचे आहेत ते ठरवलं की नाही?? मग ठरवा. 
ब्लॉगबद्दल प्रतिक्रिया नक्की द्या थॅंक्यु ❤️❤️#गौरीहर्षल

Quote of the day 13

#Quote_of_the_day13

रिद्धी आणि सिद्धी दोघी जुळ्या बहिणी. स्वभाव सोडले तर दिसणं, वागणं, बोलणं सगळं तंतोतंत सारखं होतं दोघींचं. रिद्धी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून कुढत बसे तर सिद्धी मात्र अगदी उलट होती नाही पटलं तर स्पष्ट नकार देऊन आपला मुद्दा नीट पटवून देणार. नुकतंच दोघींचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. दोघींचे मार्ग तसे बारावी नंतरच वेगळे झाले होते. सिद्धीला कम्प्युटर मध्ये रस असल्याने तिने त्यात शिक्षण घेतलं तर रिद्धी होम सायन्स शिकली. कॉलेज तर पूर्ण झालं. आता पुढे शिकायचं की अजून काही प्लॅन आहे ह्यावर विचार करून ठेवा मग आपण बोलू अस त्यांचे बाबा सकाळी ऑफिसला जातानाच सांगून गेले होते. 
पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं अस सिद्धीच ठरलं होतं. रिद्धीला मात्र कळत नव्हतं काय करावं. शेवटी तुला सगळ्यात जास्त काम कुठल्या फिल्डमध्ये करायला आवडेल त्यावर विचार करून मग ठरव अस सिद्धीने सुचविल्यावर तिला आपल्याला dietician व्हायला आवडेल अस जाणवलं. मग त्यात अजून काय करता येईल. त्यावर सर्च करून बरीच माहिती तिने मिळवली. 
यथावकाश दोघींचे एडमिशन झाले त्या आपापल्या नवीन विश्वात रमू लागल्या. लहान लहान गोष्टी शेयर करायला येणारी रिद्धी हल्ली फारशी बोलत नाही हे सिद्धीला जाणवलं होत. मग तीच काहीही कारण काढून रिद्धीला बोलत करण्याचा प्रयत्न करू लागली. त्यातून तिला समजलं की तिच्या परफेक्ट असण्याचं कौतुक कॉलेजमध्ये एक दोन वेळा झालं. फार काही मोठी गोष्ट नव्हती पण तिच्या मैत्रिणी मात्र आता तिच्याशी हातचं राखून वागू लागल्या. प्रोजेक्ट वगैरे करताना त्या रिद्धी सोबत असायच्या पण जेव्हा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरत असे त्या तिला कळू देत नसत. मग उडत उडत तिला कुठून तरी समजले की त्यांना तिचं साधं असणं आवडत नसे. रिद्धी जरी मॉडर्न असली तरी फार मॉडर्न कपडे घालणं तिला जमत नसे. बॉयफ्रेंड वगैरे तर लांबचीच गोष्ट. त्यामुळे सोबत बाहेर जाण्यासाठी तिच्या मैत्रिणी तिला टाळू लागल्या. आपण हुशार आहोत पण साधे राहतो म्हणून एकटे पडतोय हे रिद्धीला पचवताच येत नव्हते. काय करावे हेही तिला सुचत नव्हते. त्यामुळे ती गप्प गप्प राहू लागली होती. बास एवढंच सगळं ऐकून घेतल्यावर सिद्धी म्हणाली तस रिद्धीला वाटलं ती आपली चेष्टा करते आहे. पण सिद्धी पुढे म्हणाली अग वेडे तू जशी आहेस तशीच खूप चांगली आहेस. राहीली गोष्ट मॉडर्न होण्याची तर ते विचारात हवं कपड्यात नको. आणि तू सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घे एखादी गोष्ट जर आपल्या बाबतीत सतत सतत घडतेय म्हणजे ह्याचा अर्थ काय?? ह्याचा अर्थ तुला काहीतरी बदल घडवणं गरजेचे आहे. म्हणजे काय करायचं तर फार काही नाही. थोडंस स्वतःचा लूक चेंज कर,फ्रेश रंगाचे कपडे घाल, स्वतःला ग्रुम कर. थोडक्यात काय तर किंचित बदल कर. हो पण हे करताना कुणाला कॉपी नको करुस तुला जे रुचतं आवडत मुख्य म्हणजे कम्फर्टेबल वाटतं ते कर. लोकांना आवडण्यासाठी नको बदलू . तुझ्या मैत्रिणी आधीही तुला टाळत होत्या पण तुला आता ते कळतंय. ह्यातून एक मुख्य गोष्ट शिक ती म्हणजे स्वतःला रिस्पेक्ट दे. तू जर स्वतःला रिस्पेक्ट दिलास तर लोक तुला देतील नाहीतर हे सतत असच होईल. 

Don't feel bad if someone reject you.
People usually reject expensive things because they can't afford them.  आणि तुला तर माहितीच आहे आपण दोघी खूप expensive आहोत हो ना? सिद्धी अस विचारताच रिद्धी खळखळून हसली. 
पडद्याआड दोघींचा संवाद ऐकणाऱ्या आईबाबांना आपल्या संस्कारांची पुन्हा एकदा खात्री पटली. 

अस खूपदा होत कारण नसताना कुणी आपल्याला टाळतो, दुर्लक्ष करतो. समोरच्याकडे कदाचित कारणही असतील पण आपण मात्र दुखावले जातो. त्यातून हे नक्की शिकावं कारण आपण , आपले मूड ही आपली जबाबदारी आहे इतरांची नाही. आपण स्वतःला जितकी छान ट्रिटमेंट देऊ तशीच आपल्याला मिळणार. म्हणून सेल्फ रिस्पेक्ट ही गोष्ट लक्षात ठेवावी. 
बाकी ही सिरीज तुम्हाला कशी वाटतेय. आवडतेय, की कंटाळा येतो आहे वाचताना नवनवीन अनुभव पटतात का? तुमच्याकडेही असतील तर कळवा त्यांना कथेच्या रुपात वाचायला आवडेल का ते ही कळवा. 
हा एक छोटासा प्रयत्न आहे स्वतः सोबतच इतरांना काहीतरी छान पॉझिटिव्ह देण्याचा.
नक्की प्रतिक्रिया द्या. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

Quote of the day 12

#Quote_of_the_day12

वैभव घरात मधला होता मोठा भाऊ होता आणि धाकटी बहीण. मोठा भाऊ पहिला म्हणून घरात प्रचंड लाडका तर बहीण एकुलती एक म्हणून. अशात वैभवकडे कधीतरी चुकून दुर्लक्ष होत असे. पण तो तसा समजूतदार होता. त्यामुळे ते आपल्या मनावर न घेता तो स्वतःच्या पायावर लवकर उभा राहिला. जिद्दीने शिक्षण ही पूर्ण केले. त्या उलट घरात इतर दोघांची अवस्था वेगळी होती. भाऊ अति लाडामुळे हट्टी बनला होता, एका नोकरीत फार काळ टिकत नसे. तर बहिणीला हुशार असूनही नटणे मुरडणे ह्यातून अभ्यासासाठी वेळ नव्हता. त्यामानाने वैभव लवकर सेटल झाल्याने घरीदारी सगळ्यांच्या तोंडी आता वैभव असे. त्याचे उदाहरण सतत इतरांना ऐकायला मिळत होते. जो मुलगा इतके दिवस कुणाला दिसतही नव्हता तोच आता प्रकाशझोतात होता. वैभव मात्र ह्या सगळ्याने हुरळून जाणाऱ्यातला नव्हता तो आपला स्वतःच्या विश्वात बिझी राहत असे. घरात पैसे देत असतानाच तो स्वतःसाठीही इन्व्हेस्टमेंट करत होता. काही दिवसांनी बहिणीचे लग्न झाले वैभवने स्वतःच्या सेविंगमधून मदत केली. वडिलांना त्याचा अभिमान वाटला पण त्यांनी बोलून दाखवल नाही. वैभवच्या तर अशा काही अपेक्षा नव्हत्याच त्यामुळे तो मदत करून बाजूला होई. भाऊ सुद्धा बऱ्यापैकी नोकरीत स्थिर झाला त्याचेही लग्न झाले. वैभवची बायको आल्यावर जबाबदारी आहे असं सांगत भाऊ कुटुंबासह वेगळा झाला आणि घरात लक्षही देणं बंद केलं. वैभव बायकोसोबत सगळं निभावत होता. पण आईवडिलांचा ओढा थोरल्या कडे जास्त होता. ते त्याच्याकडेच राहू लागले. खटकले तरी वैभवने फारसं मनावर घेतले नाही. तो आपल्या कुटुंबात खुश होता. अशातच त्याचे प्रमोशन झाले. आनंद साजरा करण्यासाठी त्याने सगळ्यांना आमंत्रण दिले. सगळे आले पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता कसातरी कार्यक्रम झाला आणि सगळे निघून गेले. त्या दिवशी त्याला प्रकर्षाने जे जाणवलं त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. पण त्याचवेळी त्याच्या हातावर हलकेच थोपटत त्याचा जिवलग मित्र त्याच्या जवळ बसला. तो वैभवकडे बघत म्हणाला, माणसं आपलीच आहेत ह्यात शंका नाही. पण परिस्थिती आपली नाही. तू पहिल्यांदा यशस्वी झालास तेंव्हाच मला हे जाणवलं होत पण मी तुझं तुला समजावं म्हणून काही बोललो नाही. जेंव्हा लोकांना आपल्या यशाने त्रास होतो तेंव्हा समजून जावं की ते यश खूप अनमोल आहे. त्यांना ते मिळवण शक्य नाही म्हणून त्यांना त्रास होतो आहे. आणि सोबतच आपला पाय खेचला जाणार ह्याच भानही असू द्यावं. माणसाला कुणी गेलं तर जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास जवळच्या व्यक्तीच्या यशस्वी होण्याने होतो. मानवी स्वभाव आहे हा.अरे सुखात आनंदाने सहभागी होणाऱ्या लोकांना काय रडवतो रे तू अस मित्र म्हणाला तसा वैभव मनापासून हसला आणि सगळ्यामध्ये सहभागी झाला.
       आपण आपल्या मार्गावर जात राहावे लोकांना चूक कळली तर ठीक नाहीतर त्यांना गेट वेल सून म्हणत शुभेच्छा द्या आणि पुढे चला. 
Anyone that can pull you down is already below you.
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. 
थॅंक्यु. #गौरीहर्षल

Quote of the day 11

#Quote_of_the_day11

काही लोकांना विज्ञानातले नियम खऱ्या आयुष्यात ही वापरायचे असतात. म्हणजे ह्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया हवी असते. त्यांना अस वाटतं की न्यूटनच्या नियमाचा वापर जसाच्या तसा झाला पाहिजे 😂 कोणता नियम तोच तो,
Every action has an equal and opposite reaction. 
पण प्रत्येक जण असच वागेल अस नसत न. काही लोक असतात शांतताप्रिय माझ्यासारखी😜😜. अस अजिबातच नाहीये पण तरीही जेंव्हा कुणीतरी आपल्याला राग यावा म्हणून माकडचाळे करत असतात तेंव्हा शांत बसून गंमत बघण्यात जी मज्जा असते ना ती दुसऱ्या कशात नाही. 
          तर असाच एक किस्सा राजवी चा. राजवी आपलं काम भलं आपण भले ह्या कॅटेगरी मधील. तिला फारसं कुणाच्या खाजगी गोष्टीत,  कामात लक्ष घालणं आवडत नसे. पण हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात तसच एका ठिकाणी काम करणारी लोकही नसतात. राजवीच्या काही सहकारी होत्या ज्या नोकरी फक्त घरातून बाहेर पडणे ह्या एकाच हेतूने करत होत्या. त्यामुळे कामापेक्षा इतर भानगडीमध्ये जास्त लक्ष असणे साहजिकच होते. गॉसिप करणे मज्जा करणे आणि कधीतरी जमलं तर थोडस काम नाहीतर काम करणाऱ्या लोकांना त्रास देणे. अशा एका स्वघोषित ग्रुपची लीडर होती तनिशा. त्यात ती कंपनीच्या वरिष्ठांची नातेवाईक असल्याने तिचे उपद्व्याप त्यांच्या पर्यंत जात नसत. राजवी बदली होऊन आल्यापासून तनिशाच्या लिस्टमध्ये होती. तिने मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण राजवीने इंटरेस्ट दाखवला नाही. तिला स्वतःच्या जबाबदारीतून इतका वेळ मिळणार नाही असं सांगत राजवीने तनिशाच्या ट्रीपला नकार दिला. ह्यात खर तर अपमान वगैरे नव्हता पण तनिशाच्या मनाने तेच घेतलं. आता ती उठता बसता राजवीला त्रास देण्यासाठी प्रयत्न करू लागली. कधी तिचा डेस्क खराब कर, कधी अजून काही कर . तिला वाटत होते की हे कुणालाही कळणार नाही कारण राजवी लक्ष देत नव्हती. पण ह्या सिनियरच्या जीवावर तनिशाचे उद्योग सुरु होते नेमकं त्यांच्याच हे सगळं लक्षात आलं. त्यांनी काही ऍक्शन घेण्याआधी निरीक्षण करायचे ठरवले. तनिशाच्या तक्रारी उडत उडत त्यांच्याही कानावर आल्याचं होत्या. 
अशातच राजवीकडे एक महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशन चे काम दिले गेले. ऐन वेळी तनिशाने अजून एकाची मदत घेत ते प्रेझेंटेशन राजवीच्या लॅपटॉप मधून डिलीट केले. राजवी प्रेझेंटेशन देण्यासाठी समोर आली तेंव्हा तिच्या हे लक्षात आले पण तिने प्रसंगावधान राखत पटकन स्वतःचा पेन ड्राईव्ह जोडून प्रेझेंटेशन पूर्ण केले. सगळ्यांनीच राजवीच्या कार्य तत्परतेचे खूप कौतुक केले. शेवटी फक्त ती आणि तनिशा कॉन्फरन्स रूममध्ये होत्या तिला वाटले की आता राजवी चिडेल पण राजवीने शांत हसून तेथून निघून जाणे पसंत केले. तनिशाला अर्थातच अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण आता तिच्यासाठी एक एक्शन वाट बघत होती सिनियरच्या केबिनमध्ये. असो तनिशाच्या बाबतीत जे झाले असेल ते त्याचा अंदाज आपण लावू शकतो. पण राजवीने ज्या पद्धतीने स्वतःला हाताळले तसे करणे गरजेचे असते काही ठिकाणी. प्रत्येक घटनेला आपल्या प्रतिक्रियांची गरज असतेच असे नाही. विशेषतः अशा ठिकाणी जिथे आपल्याला राग येईल. त्यामुळे कोणी कुठे कधी कस वागायचं हे ठरवावं. 
कारण,
How beautiful is to stay silent when someone expects you to be enraged. 
जगात सगळ्यात जास्त काही अवघड असेल तर ते म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे. पण ते अशक्य नक्कीच नसते.
कसा वाटला हा #Quote of the day नक्की कळवा. 
#गौरीहर्षल

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

Quote of the day 10

#Quote_of_the_day10

सकाळी सकाळीच डॉ. पटेलांचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव बघितल्यावर त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं. पण फोन उचलून ते म्हणाले, बोल रे गाढवा आज सकाळी सकाळी माझी आठवण कशी आली तुला?? इतक्या प्रेमाने डॉ कुणाशी बोलत आहेत हे त्यांच्या सौभाग्यवतीना लगेच कळालं. डॉक्टर त्यांचा जिवलग मित्राशी म्हणजेच मि. नाईकांशी बोलत होते. दोघे अगदी जीवश्चकंठश्च मित्र शाळेपासूनचे मधल्या काळात फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग मुळे एकमेकांपासून दूर होते. ते कामाच्या ठिकाणामुळे पुन्हा एकदा एकत्र आले. त्यात योगायोगाने बायकाही मैत्रिणी निघाल्याने त्यांची मैत्री मैत्री न राहता अगदी एकच कुटुंब असल्यासारखी झाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या मैत्रीचा 50वा वाढदिवस साजरा केला होता. असो तर विषय हा की नाईकांनी पटेलांना जे की एक psychiatrist आहेत त्यांना सकाळी सकाळी फोन का केला??? 
समोरून नाईक बोलू लागले , मला तुझी अपॉइंटमेंट हवी आहे रे? पटेलांना अजूनच विचित्र वाटलं अरे हो देतो की पण कशासाठी आणि कुणासाठी?? 
ते आपण भेटलो की बोलू न,इति नाईक.
ठीक आहे , तुला शक्य असेल तर उद्या सकाळी 11 वाजता ये क्लिनिकमध्ये किंवा घरीच ये. -डॉ.पटेल
घरी नको रे क्लिनिकमध्येच येतो,चल भेटू उद्या मग बोलू. सगळा सस्पेन्स राखून ठेवत नाईक म्हणाले.  
दुसऱ्या दिवशी डॉ. बाकीचे पेशंट,त्यांचे डिटेल्स बघत असतानाच त्यांचा फोन वाजला. रिसेप्शन वरून नाईक आल्याची बातमी दिली गेली. डॉ नी त्यांना आत पाठवायला सांगितलं. नाईक पती पत्नी त्यांच्या धाकट्या लेकिसोबत स्वरा सोबत आत आले. डॉ नी हसत हसत तिघांनाही वेलकम केलं. स्वराकडे वळून पाहिलं आणि तिला विचारलं काय म्हणतीय माझी अँग्री बर्ड?? स्वराने थोड्याश्या नर्व्हस मूड मधेच उत्तर दिलं, काही नाही ठीक आहे. 
तिच्या आवाजावरून काहीतरी गडबड झाली आहे हे डॉ च्या लक्षात आलं. 
इकडच्या तिकडच्या गप्प न मारता डॉ नि सरळ विषयाला हात घालत विचारलं , काय बोलायच आहे? 
तस हातांची अस्वस्थ चुळबुळ करत नाईक बोलू लागले , स्वराबद्दलच आहे. तिला कस समजवायच आम्हाला कळत नाहीये. 
म्हणजे काय झालं आहे असं?? डॉ बुचकाळ्यात पडले. 
कारण स्वरा प्रचंड प्रॅक्टिकली विचार करणारी मुलगी होती. मुलं वगैरे मित्र म्हणून होते पण त्या पलीकडे तिच्या मनात काहीही नसे. त्यातून ती आईबाबांशी सगळं काही शेयर करत असे. मग काय ??
तेवढ्यात नाईक बोलू लागले, तुला तर माहीतच आहे समीर आता युकेतच सेटल होणार आहे. त्याला तिथे जॉब ऑफरही आहे. आम्हाला वाटतं की स्वरानेही तिच्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत करियर निवडून पुढे जावं.  पण हिच्या डोक्यात मात्र ते वाइल्ड लाईफ फोटोग्राफी आलं आहे. हिला ट्रेकिंग वगैरे आवडत प्रवास आवडतो विशेष म्हणजे मार्कावर परिणाम न करता ती ते करते म्हणून आम्ही परवानगी दिली. पण त्यातच करियर म्हणजे? बरं करायचंच आहे न मग आत्ता जस सुट्टीत करते तस करायचं पण नाही हिला फुल टाइम तेच हवं आहे. पुढे जाऊन कस होणार हीच हेच मला कळत नाही. नाईक प्रचंड हताश होऊन बोलत होते. साहजिकच होते ते कारण आईवडील म्हणून ते ज्या शक्यता बघत होते त्यातून त्यांना काही चांगले आहे हे पटत नव्हते. 
डॉ जरासे विचार करत म्हणाले, तुझा नेमका मुद्दा काय आहे हे मला थोडं थोडं कळतंय पण त्याच बरोबर मला स्वराशीही बोलायच आहे. आधी आपण स्वरा काय म्हणते ते बघू. 
स्वरा-- काका , मला पटतात ह्यांचे काही मुद्दे नाही असं नाही. आणि माझं आयुष्य आहे मी काहीतरी विचार केला असेलच न? मला ह्या गोष्टीत करियर करायचं आहे हे मला आधीपासूनच जाणवत होतं. पण मी स्वतःला वेळ दिला नक्की काय हवंय हे ठरविण्यासाठी. माझ्या सुदैवाने मला ही कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जॉब मिळत आहेच की आणि तो ही योग्य वेळी. राहिली गोष्ट दादासारखं पोस्ट ग्रॅज्युएशन करून वगैरे सगळं करण्याची तर मला नाही करायचं ते. सगळे एका ठराविक मार्गाने जातात म्हणून मी ही तेच का करू? दादाला ज्या गोष्टी आवडतात त्याच मलाही आवडायला हव्यात असा नियम आहे का? मला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत फोटोग्राफी करताना जो आनंद मिळतो तो ऑफिसमध्ये लॅपटॉप वर सतत बोट आपटून नाही मिळणार हे मला ज्या क्षणी समजलं त्या क्षणी मी माझा मार्ग निवडायचं ठरवलं. बर मी हा निर्णय काही शिक्षण अर्धवट सोडून घेणार आहे का तर नाही. माझं अजून हे वर्ष पूर्ण व्हायचं आहे आणि ते मी उत्तम प्रकारे करणार आहे. आणि इतर कुठलीही तयारी न करता मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात उतरणार नाहीये. बेसिक माहिती जरी माझ्याकडे असली तरी महत्वाचे कोर्स , सेफ्टी साठी अजून काही टेक्निकच शिक्षण  घ्यायचं आहे मला. हे सगळं मला ह्या दोघांशी बोलायच होत पण हे ऐकूनच घेत नाहीत. शेवटी तुम्हाला भेटून बोलायच हे त्यांनी सांगितले जे मला अर्थातच मान्य होतं. कारण तूमच्यासमोर हे माझं ऐकून तरी घेतील ही अपेक्षा होती. 
अग पण, तिला मधेच थांबवत नाईक बोलले, पूर्ण वेळ कशासाठी?? छंद म्हणून कर ना. 
पुढे जाऊन तुझं लग्न वगैरे गोष्टींच्या वेळी हे कसं सांगणार की मुलीला भटकायला आवडतं?? आता मिसेस नाईक बोलल्या. 
आई अग लग्न कुठून आलं मधेच ?? स्वरा जरा हायपर होते आहे हे बघितल्यावर डॉ मध्ये पडले. 
एक मिनिट सगळे थांबा , डॉ बोलले तसे तिघेही त्यांच्याकडे बघू लागले , हे बघा सुरेश आणि वहिनी तुमचे मुद्दे तुमची काळजी तुमच्या जागी योग्यच आहे. पण आजकालच्या पिढीला म्हातारं होण्याची वाट बघत आयुष्य जगायला नाही आवडत. आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी हातात वेळ आणि पैसे दोन्ही असताना वाट का बघायची असा विचार ते करतात. आता स्वरा जे बोलली तिने तिच्या पातळीवर ह्या गोष्टीचा खूप नीट विचार केला आहे आणि ते कौतुकास्पद आहे. नोकरी करत स्वतःच्या पैशांनी हवं ते करायची सोय असताना ती एक अशी वाट निवडते आहे जी वेगळी आहे पण चुकीची नक्कीच नाही. बर तुमचं एक स्वप्न ती पूर्ण ही करत आहे ते म्हणजे समीर सारख परदेशात जाण्याचं. फक्त तिला त्याच पायवाटेने नाही जायचं. स्वराची भटकंतीची आवड कुणाकडून आली आहे हे तुम्ही ही नीट जाणता हो न वहिनी? आपल्याला आपले मार्ग निवडायचं स्वातंत्र्य नव्हतं पण मुलांना ते देऊ शकतो न आपण? आणि तुम्ही दोघेही ह्या गोष्टीचा विचार करा जिथे मुलं पैसा हातात आला की कसा उडवायचा हा विचार करतात तिथे आपली मुलं वेगळ्या वाटेने जात आहेत. जी वाट सोपी नक्कीच नाही पण ते प्रयत्न करत आहे हे काय कमी आहे. स्वरा सुशिक्षित आहे विशेष म्हणजे सेल्फ डिफेन्स बद्दल जागरूक आहे अशा ठिकाणी जाताना आपल्याला अजून तयारी करावी लागेल हे तिला माहीत आहे. अजून काय हवं? तुम्ही तिला वेळ द्यावा अस मला वाटतं आणि हे मी डॉ म्हणून नाही तर तिचा काका म्हणून सांगतो. आपल्याला फक्त कुठल्याही परिस्थितीत आपण तिच्या सोबत आहोत एवढा विश्वास मुलांना द्यायचा आहे बाकी तुम्हाला माहित आहे तुमचे संस्कार त्यांना कधीही वाकडे पाऊल टाकू देणार नाहीत. हो न?? डॉ नी विचारलं तसं मि आणि मिसेस नाईकांनी समाधानाने मान डोलावली. 
करियर निवडताना अजूनही आपल्याकडे त्याच त्याच वाटेने जाण्याचा अट्टहास असतो. कारण नोकरी म्हणजेच सेटल असणे हे समीकरण समाजाच्या मानसिकतेमध्ये फिट्ट आहे. हळूहळू आजूबाजूला त्या चौकटीला धक्के देणारी पब्लिक वाढताना दिसत आहे जे की सुखावह आहे. पण तरीही घरच्यांचा सपोर्ट बऱ्याचदा कमी असतो. 
एखादी व्यक्ती ठराविक मार्ग सोडून वेगळ्या वाटेने जातेय म्हणजे ती हरवेलच अस नसतं कदाचित त्या वाटेवर तिला बरच काही नवीन सापडू शकत. 
So just wait and watch. And please don't force your children to participate in the rat race.  
Just because their path is different does not means they are lost. #गौरीहर्षल
कसा होता हा #Quote_of_the_day नक्की कळवा. 
थॅंक्यु

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

Quote of the day 9

#Quote_of_the_day9

रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजेच्या वेळी स्वतःहून पुढे येऊन मदत करणार मग ते करताना तिला कितीही त्रास झाला तरी तिची तक्रार नसे. चिडखोर नव्हती ती पण सतत येणाऱ्या अनुभवांनी तिची रिएक्ट करण्याची पद्धत तशी झाली होती. मूळ स्वभाव मात्र सहनशील आणि मदतीला तत्पर असा असल्याने तो उफाळून वर येईच. पण जेव्हा मदत घेतल्यानंतर लोक वळूनही बघत नसत ओळखही दाखवत नसत तेंव्हा तिला खूप मनस्ताप होऊ लागला. मदत करताना तिला तशी अपेक्षाही नसे पण लोक चक्क जेंव्हा ओळख नाकारत तेंव्हा वाईट वाटण स्वाभाविक होतं.
जे काही जवळचे लोक होते ते तिला समजावत की तू जशास तशी वागत जा शब्दात, भावनांमध्ये अडकून वाहवत जात जाऊ नकोस. तिलाही ते पटत असे पण पुन्हा कुणी रडकुंडीला येऊन मदत मागितली की ती व्यक्ती मागच्या वेळी कशी वागली ह्याचा विसर पडून रजनी मदत करे. 
हळूहळू मात्र जशी तिची चिडचिड जवळच्या लोकांना त्रासदायक होऊ लागली तेंव्हा तिचा मित्र रोहितने तिला समजवण्याचे ठरवले. कारण ह्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान रजनीचेच होत होते. झोकून देऊन मदत करताना ती मानसिक आणि शारीरिक दृष्टीने थकतच असे पण सगळ्यात जास्त परिणाम नंतरच्या वाईट अनुभवांमुळे होऊ लागला.सतत हसतमुख , टवटवीत दिसणारी रजनी आता सुकल्यासारखी दिसू लागली. नकळतच तिचे वजनही कमी होऊ लागले होते. तिला पुन्हा चियर अप करून ताळ्यावर आणण्यासाठी तिच्या जवळच्या 4,5 मित्रमंडळीनी ज्यात रोहितही होता छोटीशी ट्रिप काढायचं ठरवलं. जोडून 3 दिवस सुट्ट्या आल्या आणि ते सगळे जण फिरायला निघाले. तिथे गेल्यावर मजा मस्ती करण्यात सगळेच रमले. रिसॉर्ट अतिशय सुंदर होतं निसर्गनिर्मित तलावाच्या भोवतीने चालण्यासाठी वाट तयार केली होती. रजनीला मोकळं करण्यासाठी रोहित सगळ्यांपासून दूर घेऊन तिथे आला. जुन्या आठवणी ताज्या करत दोघेही मस्त हसत होते. हळूहळू गाडी रजनीला काय खटकत आहे त्याकडे वळली. मग ती बोलू लागली, खटकत अस नाही रे मला मदत करणं आवडत , खर तर आवडत म्हणण्यापेक्षा ती गोष्ट मला जगण्याचं बळ देते. आपण कुणाला तरी उपयोगी पडतो आहोत हेच खूप महत्वाचे असत मला , मी परतफेड म्हणून अपेक्षा ही ठेवत नाही. पण हल्ली काही अनुभव असे आले की मी चुकीची होते का अस मला वाटू लागलं.  गरज संपली तसं लोकांनी झिडकारल रे मला. म्हणजे मी काही आवर्जून पुन्हा कुणाला ओळख दाखवत नाही तो माझा पिंड नाही. पण समोरासमोर आल्यावर एक smile द्या आणि जा आपापल्या वाटेने बास. पण उलट केलं रे लोकांनी नको नको ते ऐकू आल मला स्वतःबद्दल की मी कुणाची तरी संपत्ती बघून, कुणाच स्टेटस बघून मदत केली म्हणे. तुला तर माहीत आहे ना मला स्वतःला तस काहीच कमी नाहीये मग मी अस का करेन?? 
आता हळूहळू रोहितला रजनीचा प्रश्न कळू लागला , ती दुखावली गेली होती लोकांच्या स्वार्थी आणि इनसिक्युर वागण्याने. त्यामुळेच ती इतके दिवस जे मनापासून स्वतःच्या आनंदासाठी करत होती त्याबद्दल तिच्याच मनात शंका आली होती. त्याने रजनीच्या हातावर थोपटल आणि तो बोलू लागला, रजु तू खूप हळवी आहेस, कुणी त्रासात, दुःखात असेल तर तू स्वतःहून मदतीला धावतेस. हा खूप चांगला गुण आहे ह्यात वादच नाही पण आजकाल हे दुर्मिळ होत चालल आहे. कारणे खूप आहेत त्यातली काही मला जी वाटतात ती सांगतो, पहिलं म्हणजे लोकांना ना हल्ली फुकट मिळणाऱ्या गोष्टींची किंमत राहिली नाही. मदतही मग ती कुठल्या का रुपात असेना विकत घ्यावी लागली तरच ती त्यांना पचते. तू तर स्वतःहून आणि फुकट देत असतेस. हो न? कळलं अस समजून रजनीने मान डोलावली. 
कारण नंबर दोन हे खरं तर खूप महत्त्वाचे कारण. रजू हल्लीच्या काळात कुणीही कुणाचं कोणतंही काम असंच करत नाही. अगदी छोट्यात छोट्या कामातही लोक आपला काय फायदा होतो आहे हे आधी बघतात. नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे सगळेच असे वागतात. पण भरीस भर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आईबाप अन् मुलंही तुला फक्त फायद्यासाठी एकत्र दिसतील. फायदा कुठल्याही स्वरूपात असला तरी. मग तुझ्यासारखी एक तोंडओळख असणारी व्यक्ती प्रेमाने, आपुलकीने, न मागता मदत करतेय म्हणजे त्यात काहीतरी चुकीचेच असणार हा प्रश्न लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. ह्यात तू चुकतेस अस नाही तर चूक परिस्थिती आणि बदललेल्या मानसिकतेची आहे. 
पण मग मला जे करावंसं वाटतं किंवा जे होत माझ्याकडून त्याच काय? रजनीने न राहवून प्रश्न विचारला. 
हलकेच हसत रोहित म्हटला, तू कर न तुला जे योग्य वाटत ते पण त्याचा त्रास तुला होऊ देऊ नकोस. म्हणजे बघ तू फायदा बघत आहेस अशी कुणाला जर शंका आहे तर त्यांना मदत करताना स्वतःला झोकून द्यायची गरज नाही. जेवढ्यास तेवढं करत जा. तू जशी इतर कशाचीही अपेक्षा ठेवत नाहीस तशीच परतून पुन्हा त्या वाटेवरही जाऊ नकोस. स्वतःहून संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नकोस. थोडक्यात काय तर तू ही आपलं काम झालं आता सिनियर लोक म्हणजे बाप्पा ग बघेल काय ते अस म्हणत बाजूला हो.  जितक्या लवकर तू स्वतःला त्या परिस्थिती आणि लोकांपासून अलिप्त करशील तितक्याच लवकर तुला मनशांती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला available करू नकोस म्हणजे कुणीही आलं मदत कर म्हणून की लगेच धावलीस अस करू नकोस. परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती गोष्ट कर. 
गेल्या काही अनुभवांमुळे काय बदल झाला आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच न ?? तुझ्या स्वतःकडे बघ पूर्वी तू कशी फ्रेश असायचीस आता मात्र सतत चिडचिड होते तुझी का?? कारण लोकांनी लावलेली लेबल्स तू स्विकारलीस जे तुझ्या मनाविरुद्ध होतं. कुठेतरी तुझं मन आणि शरीरही विरोध करतच होत त्यामुळे त्यावरही परिणाम झाला. सो, एक गोष्ट लक्षात घे इतरांची मदत कर, काळजी घे पण त्या आधी स्वतःची मदत कर , स्वतःची काळजी घे. 
Don't just be good to others. Be good to yourself too.
You can't pour from an empty cup. Take care of yourself first.  #गौरीहर्षल

रजनीला कळलं की नाही माहीत नाही पण तुम्हाला कळलं न ??? ☺️☺️☺️ कसा वाटला हा #Quote_of_the_day नक्की सांगा 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

Quote of the day 8

#Quote_of_the_day8

घरी खूप मस्का मारल्यावर नेहाला हव्या त्या डान्सच्या कोर्सला बाबांनी एडमिशन घेऊ दिली होती. कारण तिचं रेग्युलर कॉलेज क्लासेस ह्या सगळ्यात खूप कमी वेळ तिच्याकडे उरत असे. तिला नाही म्हणण्यामागे तिचीच दमणूक होऊ नये असा त्यांचा विचार होता. पण नेहाच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. उत्साहाने क्लास सुरू झाला होता. बडबड्या स्वभावाने तिने इथेही भरपूर मैत्रिणी जमवल्या. ह्या सगळ्यात एक जण होती स्मिता. नेहा आल्यापासून सगळ्या तिच्याभोवती असतात हे ती सुद्धा बघत होती. द्वेष किंवा इर्षेने नाही तर कुतूहलाने कारण स्मिताला अस मोकळं बोलणं वागणं जमतच नसे का कुणास ठाऊक पण ती शांत शांतच असायची. घरीही सगळे तिला समजावत की अग हेच वय आहे मजा मस्ती करण्याचं पण स्मिता आपली स्वतःच्याच विश्वात असे. नेहा मात्र इतरांच्या सोबत स्मितालाही आपल्या मस्तीमध्ये घेत असे. हळूहळू स्मितालाही स्वतःहून ओळख करून घेणं, बोलणं जमू लागलं. 
अशातच एके दिवशी क्लासमध्ये लवकरच मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी तयारी सुरू झाली. 
सगळ्याच जणी उत्साहात होत्या. फ्युजन प्रकार निवडून काहीतरी नवीन सादर करावं असं ठरलं. मग विषय सुचवणे, त्यावर चर्चा सुरू झाल्या. सगळ्याबाबतीत उत्साही असणारी नेहा इथेही होतीच. तिनेच विषयही सुचवला आयुष्यातील अपयश किंवा वाईट घटनेमुळे खचलेला व्यक्ती आणि मग कशी त्याला प्रेरणा मिळून तो नव्याने उभा राहण्याचा प्रयत्न करतो. विषय पटण्यासारखाच होता. मग काय गाणी , संगीत वगैरे निवडत छोटे छोटे गट करत गोष्ट गुंफली जाऊ लागली. 
प्रॅक्टिस करता करता एक महिना उलटला. आणि तो दिवसही उजाडला. एक एक करत सगळ्या जणी कार्यक्रमाच्या ठिकाणी जमल्या तयारी सुरू झाली. आधी त्यांचा परफॉर्मन्स आणि मग बाकी सगळे अस नवीनच प्रकार होता. स्मिता आणि नेहा सुरुवात करणार असल्याने त्या पुढे होत्या. गार पडलेल्या हातानी स्मिताने नेहाचा हात धरला. ती नर्व्हस झाली आहे हे नेहाच्या लक्षात आलं तिने तसाच तिचा हात हातात ठेवत डोळ्यांनी सांगितलं आपण मस्तच करणार आहोत काळजी नको करुस. स्मिता थोडी रिलॅक्स झाली. नाव पुकारले जाताच दोघीही स्टेजवर गेल्या म्युझिक सुरू झाले आणि अगदी स्टेज ओळखीचं असल्याप्रमाणे दोघींची पावले टाकली जाऊ लागली. हळूहळू गोष्ट पुढे सरकत गेली 15 मिनिटांचा तो परफॉर्मन्स जेंव्हा संपला तेंव्हा सगळं सभागृह उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करत होतं. कौतुकाचा स्वीकार करत सगळ्या जणी जाऊन ठरलेल्या जागी बसल्या. मग कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली जाऊ लागली. 
तो कार्यक्रम आयोजित केला होता दुर्धर रोग, भयंकर अपघात ह्यातून बरच काही गमावूनही पुन्हा नव्या दृष्टीने आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी. हा एक छोटासा क्लब होता जिथे अशा घटनांमधून जाणाऱ्या लोकांना वाईट मनस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली जात असे. 
कारण कस असत न माणसाकडे जेव्हा सगळं काही असत तेंव्हा त्याला त्याची किंमत नसते पण जेव्हा एखादी घटना आयुष्यात अशी उलथापालथ घडवते तेंव्हा माणूस कोसळतो. तिथे त्याला सगळ्यात जास्त गरज असते ती मानसिक आधार आणि पाठिंब्याची. तोच देण्याचा प्रयत्न ह्या क्लबचे मेम्बर करत होते जे सर्व कधी न कधी त्यामधून गेले होते आणि काही जण जात होते. 
अशातच नेहाचं नाव घेतलं गेलं आणि तिला स्टेजवर बोलाविले गेले. सगळ्या जणी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागल्या. हलकेसे हसत ती स्टेजवर गेली आणि जे बोलली त्यामुळे प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. नेहा आणि तिची आई ह्या क्लबच्या सगळ्यात जुन्या सभासद होत्या. होत्या कारण नेहाची आई कॅन्सरशी लढा देत होती. त्याच ट्रीटमेंट च्या वेळी ह्या क्लबची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि मग हळूहळू समविचारी लोक जोडले गेले. नेहाची आई तर ह्या जगात नव्हती पण नेहा मात्र आईचं व्रत हसतखेळत पूर्ण करत होती. हसतखेळत अशासाठी कारण आई गेल्यानंतर काही दिवसातच नेहाचा भयानक अपघात झाला होता आणि त्यात तिचे दोन्ही पाय तिला गमवावे लागले होते. एकामागे एक धक्के कुणालाही मोडून गेले असते पण नेहा तिच्या आईची लेक होती. जिद्दीने ट्रिटमेंटला प्रतिसाद देत तिने कृत्रिम पायांच्या मदतीने सगळ्यावर मात केली होती. सतत सगळ्यांना हसवताना जगण्यासाठी बळ देताना कुणालाही तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे हे रहस्य कळत नसे. 
आज मात्र ते समोर आले तेंव्हा स्मिताला ही गोष्ट सगळ्यात जास्त जाणवली कारण खुश रहा ग अस सतत तिला नेहा सांगायची आणि स्मिताला मात्र आपले छोटे छोटे प्रॉब्लेम तिला ऐकवायचे असायचे. नेहाने नकळतच स्मिताला आयुष्यातील एक महत्वाचा धडा दिला होता तो म्हणजे आपल्याला देवाच्या कृपेने जे धडधाकट शरीर मिळाले आहे त्याचा आदर करत आनंदाने जगावं. 
म्हणतात न आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही न काही शिकवत असते त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून. बऱ्याचदा खूप कमी वेळासाठी आयुष्यात आलेली माणसं खूप छान अस काहीतरी मनावर उमटवून जातात. 
Temperory people teach permanent lessons. फक्त ही लेसन्स कोणती आहेत हे कळायला हवं. 
हा होता माझा स्वतःसाठी lesson म्हणजेच #Quote_of_the_day #गौरीहर्षल

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

Quote of the day 7

Quote of the day 7

ऋतुजा 4 दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफीसला आली होती. ती आली तसे सगळेच तिच्या आसपास गोळा झाले. कशी झाली ट्रिप वगैरे विचारू लागले. ऋतुजा अगदी मनमोकळी वागणारी आतलं बाहेरचं अस काही नसायचं तिचं त्यामुळे भरपूर मित्रमंडळी जमवलेली. आजही तेच झालं होतं ती आली तसे सगळे बोलण्यासाठी धावले. गर्दीच्या मागे कुणीतरी तिला बघत होते. तिचंही बोलता बोलता त्या व्यक्तीकडे लक्ष गेले. तो चेहरा बघताच ऋतुजाचा चेहरा पडला. कोण होती ती व्यक्ती???

ती होती नयन ऋतुजाची कॉलेजमधली मैत्रीण. ऋतुजा आणि नीरजा ही बेस्ट फ्रेंडची जोडी कॉलेजमध्ये फेमस होती. सगळ्या गोष्टी करताना दोघी सोबत अभ्यासातही आणि मस्ती करताना सुद्धा. अशातच सेकंड इयरला नयनची कॉलेजमध्ये एन्ट्री झाली नवीनच असल्याने ती फारशी कुणामध्ये मिसळत नव्हती. मग हळूहळू तिची ऋतुजा, निरजाशी ओळख झाली. त्याही ती एकटी पडू नये म्हणून मदत करायच्या. पण नयनला मात्र त्यांची मैत्री खटकू लागली होती. कारण तिला असं जिवाभावाचे कुणीच नव्हतं. नयन सतत त्या दोघींचं निरीक्षण करत असायची.काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की ऋतुजा बॅलन्सड आहे पण नीरजा मात्र जरा भोळसट आणि पटकन विश्वास टाकणारी आहे. मग नयनने निरजाबरोबर मैत्री वाढवणं सुरू केलं. तस ते फारसं सोपं नव्हतं पण कॉलेजमध्ये येण्याजण्याचा  दोघींचा रस्ता एकच असल्याने तिला तशी संधी मिळाली.  इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तिने नीरजाला बोलतं करायला सुरुवात केली. मग त्यातून तिला एक नवीन माहिती मिळाली. नीरजाचा एक बालमित्र होता जो तिला आवडायचा त्यानेही तिला तस कबूल केलं होतं. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरी काही बोलायचं नाही असं त्यांनी ठरवल्याने दोघेही भेटणं बोलणं सगळं एका लिमिटपर्यंत करायचे.  त्या दोघांव्यतिरिक्त हे फक्त ऋतुजा ला माहीत होतं आणि आता नयनला. अशातच कॉलेजचं ते वर्ष संपत आलं. सगळे परीक्षा, अभ्यास ह्यामध्ये बिझी झाले. त्यांनतर मोठया सुट्ट्या असल्याने फिरायला जायचं अस ग्रुपमध्ये ठरलं ग्रुपमध्ये म्हणजे ह्या तिघी आणि निरजाचा मित्र आणि त्याचे काही मित्रमैत्रिणी. 8,10 जण झाले ट्रेकिंग वगैरे चा प्लॅन ठरला. 2 दिवसाचा. हो, नाही करत घरून परवानगी मिळवली आणि सगळे गेले. त्या दोन दिवसात नयनच्या वागण्याबद्दल काही गोष्टी ऋतुजाला खटकू लागल्या तसं तिने निरजाशी बोलून दाखवल पण अस काही नाही ग अस ती म्हणाली. पहिल्यांदा ऋतुजा ला जाणवलं की निरजाच्या मनात वेगळं काही सुरू आहे आणि ती ते मला कळू देत नाहीये. काय सुरू होतं निरजाच्या मनात??
 नयनने तिला सतत भरीला घालुन तिचं आणि अर्णवच नातं पुढे नेण्याबद्दल विचार करायला लावला होता. जेव्हा ती ऋतुजाला आवडणार नाही असलं काही अस म्हणाली तेंव्हा ऋतुजाला बॉयफ्रेंड नाही म्हणून ती जळते तुझ्यावर आणि म्हणून तुला पुढे जाऊ देत नाही असं सांगितलं. सतत हे बोललं गेल्याने निरजाचा तिच्यावर विश्वास बसत गेला. ती नकळतच ऋतुजापासून दूर होऊ लागली. आणि वेगळ्याच दृष्टीने तिला बघू लागली. अर्णव त्या दोघींचाही मित्र होता पण तो ऋतुजाला बहिणीच्या जागी बघतो हे नीरजा विसरली. 2 दिवसांनी सगळे परत आले. ऋतुजा ने निरजाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती आता तिला टाळू लागली होती. तिने अर्णवला सुद्धा सांगितले की आमच्या दोघींपैकी एकीला निवड. नयनसोबत फिरणं आता निरजाला आवडत होतं. तिच्या आणि अर्णव बद्दलच्या सगळ्या गोष्टी ती बिनधास्त नयनला सांगू लागली. अशातच कॉलेजमधल्या काही मैत्रिणी निरजाला एकदा भेटल्या. त्यातल्या एकीने सहज हसत हसत अर्णवचा उल्लेख करत तिला टोमणा मारला. तुम्हाला कस माहीत अस विचारल्यावर तुझ्याच बेस्ट फ़्रेंड ने सांगितलं अस म्हणत कुणाचंही नाव न घेता त्या निघून गेल्या. निरजाच्या डोक्यात फक्त ऋतुजा आली. ती तशीच तडक ऋतुजाकडे आली. तिला समोर बघताच ऋतुजाला खूप आनंद झाला. पण निरजाने मात्र पुढचा मागचा विचार न करता तिला धारेवर धरलं. ऋतुजाने शांतपणे तिला बोलू देत सगळं ऐकून घेतलं. मग ती तिला म्हणाली हे जे प्रसंग तू सांगितले ते जेव्हा घडले तेव्हा आपण संपर्कात होतो का??हा प्रश्न ऐकताच नीरजा पटकन खुर्चीवर बसली. तिला समजावत ऋतुजा पुढे म्हणाली मी तुला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तिच्यावर इतका विश्वास टाकू नकोस पण तुझ्या डोक्यावर संशयाचे भूत स्वार होते. असो झाले ते झाले  ह्या गोष्टींवर मी आणि अर्णवने आधीच विचार केला होता. हे सगळं बाहेरून घरी कळण्याआधी तो बोलणार आहे तू काळजी नको करुस. ऋतुजाचं बोलणं ऐकून निरजाच्या डोळ्यात पाणी आले,ती तिची माफी मागत गळ्यात पडून रडू लागली. तिला शांत करत ऋतुजा म्हणाली, वेडाबाई आता तरी शहाणी हो आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणार नाही असं ठरव. नीरजा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव ,
ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं, ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. #गौरीहर्षल
गोड बोलणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असतोच अस नाही. काही विघ्नसंतोषी असतात तर काही प्रत्येक गोष्टीत स्वतःचा काय फायदा होतो हे बघत असतात. अशी लोकं आपल्या वागण्याने समोरच्याला काय त्रास होईल ह्याचा विचार करत नाहीत. आपण मात्र सगळं गुपित उघड करून नंतर पश्चाताप करत बसतो. म्हणूनच आपल्याला इतरांबद्दल काय वाटत , चांगलं की वाईट हे फक्त आणि फक्त योग्य व्यक्तीशी बोलावं जो खरंच आपला जवळचा आहे. नाही तर सरळ गप्प बसावं. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न.  

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

Quote of the day 6

#Quote_of_the_day6

सारिकाच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्या निमित्ताने घरातच पूजा आणि छोटंसं गेट टुगेदर करावं असं तिने आणि तिच्या नवऱ्याने सचिन ने ठरवलं. त्यानुसार एक छान सोयीचा मुहूर्त निवडत तयारी सुरू झाली. हवापालट म्हणून गावी  गेलेल्या माई आणि आबांना आणण्यासाठी गाडीही दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचे ठरले. माई आबा म्हणजे सचिनचे आईवडील. गावी सचिनचा भाऊ सुरेश त्याची पत्नी  सुनीता आणि मुलगा राहत होते. गावी राहणं हा त्या दोघांचा निर्णय होता कारण तिथे राहून काहीतरी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यात सुनीतालाही तिथलं वातावरण आवडल्याने तिने तिथंच राहू अस ठरवलं. त्या हेतूने गावाकडच्या घरातही सगळ्या सोयीसुविधा करून घेतल्या गेल्या. सचिन आणि सुरेशला एक बहीण ही होती सपना तिचं लग्न जवळच्या गावातच झालं होतं पण ते नवराबायको नोकरीनिमित्त वेगळ्या शहरात होते आणि सासुसासरे गावी असायचे.  असा आपापल्या विश्वात रमलेल्या तरीही जिवलगांचा हा गोतावळा सुखी होता.  गेट टूगेदरच्या निमित्ताने सगळेच सचिन-सारिका कडे जमले होते.
 ह्या सगळ्यात अजून एक व्यक्ती ही आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. ती म्हणजे सपनाची जाऊ रेश्मा. ती तिच्या मुलांसह आणि नवऱ्यासह आदल्या दिवशीच आली होती. सपना आपल्या माहेरच्या शिकवणुकी मुळे आणि आपल्या दोन्ही भाऊ वहिनीच्या तालमीत नाती जोडायला शिकली होती. ह्या सगळ्यामुळे ती लांब रहात असूनही सासुसासरे तिचं कौतुक करत असत. रेश्माही लांबच होती पण गावातच आणि भांडून वेगळी झालेली त्यामुळे थोडासा मनाने दुरावा होताच. सपनाच्या कौतुकाने रेश्माला खूप त्रास होऊ लागला आपण तसे वागू शकत नाही हे तिला चांगलं माहीत होतं. मग आता काय सतत संधी मिळाली की सपनाला टोचुन बोलणं , अपमान करणं सुरू झाले. सुरुवातीला सपनाने दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्रास देण्याचं प्रमाण वाढलं तसं कुणाशीच बोलत नसल्याने सपना आतूनच खंगु लागली. त्याचा तिच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. 
आज समोर आलेल्या सपनाला बघताच सारिका आणि सुनीता दोघींनाही काहीतरी गडबड आहे हे कळलं. पूजा वगैरे आटोपल्यावर सगळे निघाले तसे त्या दोघींनि आग्रह करून आराम करण्यासाठी म्हणून सपनाला ठेवून घेतले. वेळ मिळताच दोघीही सपनाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. आणि हळूहळू काय होतंय हे ही काढून घेतले. मुद्दा लक्षात येताच त्यांनी आधी सपनाला रडून मोकळे होऊ दिले. मग कुठल्याही परिस्थितीत माहेरचे सगळे तुझ्या बाजूने असतील हे सांगितलं. सपना थोडी स्थिर झाली. मग सारिका तिला म्हणाली की हे बघ सपना आपली चूक नसताना तू हे सगळं सहन केलं हे तुझं चुकलंच. मान्य आहे ती मोठी आहे पण तुझा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तू वेळीच गोष्टी सासुसासर्यांना , नवऱ्याला नाही तर आम्हाला तरी सांगायच्या होत्या. असो आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे जशास तसे उत्तर न घाबरता दे. आणि सगळ्यात आधी तिच्या आरशात स्वतःला बघणं बंद कर. ती जे करते वागते ते तिचं प्रतिबिंब आहे तुझं नाही. तू जशी आहेस तशीच सगळ्यांना आवडतेस अगदी तुला स्वतःलाही. नवीन नाती जोडून ठेवताना स्वतःलाही जपायला शिक.  आयुष्यात अशी खूप लोकं भेटतील जी तू कशी आहेस हे तुलाच सांगायचा प्रयत्न करतील. पण तुला स्वतःला माहीत आहे न तू कशी आहेस मग बास त्यावर विश्वास ठेव. आणि इतरांच्या वाईट वागण्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर नको करून घेऊ. नाहीतर येणाऱ्या बाळाचं काय होईल हळूच हसत सुनीता म्हणाली. सपनाने चमकून दोघींकडे बघितलं तशा त्या म्हणे लाडकी आहेस तू आमची आम्हाला तुला बघतानाच जाणवलं होतं म्हणून तर तुला ठेवून घेतलं. आता 7,8 दिवस मस्त लाड करून घे मग जा तुझ्या काळजीवाहू नवऱ्याकडे. तिघीही समाधानाने हसू लागल्या. 
आपल्या बद्दल जेंव्हा कुणी काही बोलत तेंव्हा बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देऊ लागतो. स्वतःवर बोट ठेवतो. पण अस करण्याआधी हा विचार करत नाही की अरे माझ्यासोबत माझ्याशिवाय जास्त वेळ कुणीही घालवलेला नाहीये. म्हणजे हे म्हणतात तशी मी नक्कीच नाहीये.  लोकं नकळतच आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आपण स्वतः कसे आहोत हे दाखवत असतात. त्याचं योग्य निरीक्षण करायचं आणि आपण कसे होऊ नये हे ठरवायचं😜  After all, 
The way people treat you is a statement about who they are as a human being. It is not a statement about you. #गौरीहर्षल

कसा वाटला हा #Quote_of_the_day नक्की सांगा ?? थॅंक्यु ❤️❤️

Quote of the day 5

#Quote_of_the_day5

रचना एक खूप चुणचुणीत चटकन कुणाच्याही नजरेत येईल अशी गोड मुलगी. धाकटी असल्याने सगळ्यांची आवडती. जितकी घरच्यासमोर साधी तितकीच बाहेर त्या उलट असे. पण स्वतःच्या मर्यादा तिने आखून घेतलेल्या असल्याने घरचे कधीही तिला कशासाठी अडवत नव्हते. नुकतंच तिने शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता नव्यानेच नोकरीही हातात आली होती. सुरुवातीचे दिवस असल्याने घरून एक दोन महिने पगार हवा तसा वापरायची तिला परवानगी होती. मग काय मस्त मज्जा करणं सुरू होतं. पण त्यातही ती घरच्यांना विसरली नव्हती पहिल्या पगारात सगळ्यांना आवडतील असे सरप्राईज दिले होते तिने ह्या कृतीमुळे आईबाबांना आपल्या मुलीबद्दल असलेली खात्री अजूनच पक्की झाली होती. मित्रही भरपूर होते तसे तिला पण घरचं वातावरण मोकळं असल्याने घरी सर्व माहिती असे. हल्लीच मात्र मित्रमंडळी मध्ये एक नवीन चेहरा सतत दिसू लागला होता. तो होता समीर रचनाचा कलीग समवयस्क असल्याने तो त्यांच्या ग्रुपमध्ये कधी मिसळला कुणाला कळलंच नाही. हळूहळू रचना आणि समीरची फक्त मैत्री नसून पुढे काहीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले होते. तसे आडून आडून सगळे छेडतही असत. पण अजून त्या दोघांनी काही मान्य केलं नव्हतं. विशेष म्हणजे रचनाला काही गोष्टी आधीच स्पष्ट करायच्या असल्याने ती तटस्थपणे स्वतःच्या भावना बघत होती. समीरबद्दल फक्त जुजबी माहिती तिच्याकडे होती त्याच्या घरचे, मित्रमंडळी बाकी गोष्टी त्याने कधी स्वतःहून सांगितल्या नव्हत्या. आणि विचारलं तर तो टाळतो हे तिला समजलं होतं. मग ह्यावर उपाय म्हणून तिनेच तिच्या जवळच्या एक दोन मित्रांना आणि भावाला विश्वासात घेत सगळं सांगितलं पण पुढे जाण्याआधी मला समीरबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी मदत करा असंही ती म्हणाली. मग हळूहळू सगळे आपापल्या परीने कामाला लागले. समीरची फॅमिली कुठे असते , काय करते शोधू लागले. ह्या सगळ्या शोधमोहीमेत फार अविश्वसनीय माहिती मिळाली. इकडे समीरला ह्या सगळ्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो रचनाला कस प्रपोज करावं ह्या विचारात होता.  खरी माहिती मिळाल्यावर रचनाला खूप धक्का बसला पण वेळीच सगळं कळलं म्हणून तिला बरं वाटलं. समीरने आपल्या नावासह सगळी ओळख बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणतात न सत्य बाहेर येतंच. त्याच्या घरचं गुंडगिरी असणार वातावरण, ज्यात समीर ही सहभागी होता. तो नसता तर कदाचित वेगळा विचार करता आला असता. पण हळूहळू त्या गोष्टींची खोली लक्षात आल्याने रचनाला तिच्या भावाने सावध केले. पण तिचं आधीच ठरलेलं होतं  त्यामुळे समीर जेंव्हा तिला प्रपोज करेल अस वाटू लागलं. त्या आधीच बाबांनी आणलेल्या मुलाशीच आपण लग्न करणार अस म्हणत तिने स्वतःच्या भावना प्रॅक्टिकली हाताळल्या. जे प्रचंड गरजेचे होते. ह्या सगळ्यात तिलाही भरपूर त्रास झाला कारण ती तिच्या पातळीवर त्याच्यात गुंतली होती पण समजूतदार कुटुंब पाठीशी असल्याने तिला फायदा झाला. समीरला वेळीच हिंट मिळाल्याने तो मागे फिरला. अर्थात अपवाद ठरला.  
इथं ही कथा आहे पण प्रत्यक्षात अशी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येतात ज्यांच्या आपल्या आयुष्यात असल्याने आपण प्रचंड भावनिक उलथापालथ अनुभवत असतो. वेगवेगळ्या नात्यांच्या रूपाने भेटणाऱ्या अशा लोकांमुळे आपलं आयुष्य डिस्टर्ब होत असत. अशा लोकांना योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळून एक अंतर ठेवून वागायला शिकावं लागतं. नाही तर त्रास होणारच. कधी कधी तर काही लोकांना दूरही करावं लागतं. कुणी आपला फायदा उचलत असतं, कुणी उगाच demotivate करत असत. पण आपण जर स्वतःला स्वतःची पहिली priority ठरवलं न तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आधी करू लागतो. मग आपलं सुखदुःख, आनंद, यशापयश हे इतरांची नाही आपली जबाबदारी होतात. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदाही आपल्यालाच होतो. 
हा #Quote_of_the_day ही असच काही सांगतो, बघा पटतंय का ??     #गौरीहर्षल
Not everyone you loose is a loss. 

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

Quote of the day 4

#Quote_of_the_day4

मैथिली एका छोट्या सोसायटी मध्ये राहत होती. पंचकोनी कुटुंब सासुसासरे, मैथिली ,तिचा नवरा अमेय आणि मुलगी इरा. नणंद त्याच गावात पण तिच्या सासरी होती. ओव्हर ऑल बाहेरून बघताना एक छान हसतखेळत जगणार कुटुंब. ह्या जागी 2bhk फ्लॅट घेऊन नव्यानेच ते शिफ्ट झाले होते. हळूहळू तिथलं वातावरण , शेजार ह्यांच्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. नवराबायको दोघेही काळाची गरज असल्याने नोकरी करणारे त्यामुळे ओघाने मुलीची थोडीशी जबाबदारी आजीआजोबांवर यायची. घरोघरी मातीच्या चुली ह्या नियमाला हे घरही अपवाद नव्हतं पण अमेयच्या वडिलांची शिकवण होती जे काही वाद असतील ते घरातच मिटवायचे. बाहेरच्या कुणालाही त्याची पुसट कल्पना सुध्दा नको. त्यामुळे फारसे विकोपाला जाणारे वाद होत नसतं. आता हल्ली टीव्हीवर असणाऱ्या सासुसुनांची कृपा की लोकांना कुठेही आसपास हसून खेळून राहणारी जोडी दिसली की ते डोकावतात. हे सगळं इतकं छान कसं???असाच प्रकार ह्या कुटुंबाबाबतही होऊ लागला. शेजारच्या पाटील काकूंना जरा जास्तच कुतुहल होतं की सून घरी नसते तर सासू काहीच चिडचिड का करत नाही? मग आपल्या रिकाम्या डोक्याचा काय उपयोग असा विचार करत त्यांनी हळूहळू सासुशी मैत्री वाढवली. पण तरीही काही हाताला लागेना. कारण घरचा नियम सगळे मनापासून पाळत असत. मग पाटीलकाकूंनी दुसरं अस्त्र वापरले त्या आपल्या सुनेच्या कागळ्या करू लागल्या जेणेकरून तरी मैथिलीच्या सासूबाई काहीतरी बोलतील पण पुन्हा तेच. उलट त्या पाटील काकूंनाच थोडस जुळवून घेण्याचा सल्ला देऊ लागल्या. हेही फेल म्हटल्यावर आता पाटील काकू नेहमीच्या ग्रुपकडे वळल्या आणि मैथिलीच्या कुटुंबाबद्दल उलटसुलट बोलू लागल्या जे की सर्व  मनानेच तयार केले होते. हे सगळे मैथिलीच्या घरच्यांना तेव्हा कळले जेंव्हा पाटील काकूंच्या मुलाने त्याला विचारलं की घरात इतके प्रॉब्लेम सुरू आहेत तर तू वेगळा का नाही राहत?? अचानक आलेल्या या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे अमेयला सुचेना पण त्याने अरे इतकं तर सगळ्याच घरात होतं वेळ दिला की सुटेल गुंता अस म्हणत वेळ मारून नेली. 
घरी आल्यावर मात्र त्याने जेवल्यानंतर सगळ्यांशी बोलायचं आहे असं सांगितलं. जेवण झाल्यावर इराला झोपवून सगळे हॉलमध्ये जमले. अमेयने आपला अनुभव सांगितला तसाच अनुभव आपल्याला आल्याचे त्याच्या बाबानी पण सांगितले. 
आई आणि मैथिलीच्या मात्र लक्षात हा प्रकार आला. आणि मग सगळं काही त्यांनी त्या दोघांना सांगितलं. लोकांना हल्लीच्या बिझी आयुष्यात दुसऱ्यांच्या घरात काय वाईट घडत आहे ह्यात इतका रस का आहे हे त्यांना कळेचना. ह्या वर उपाय एकच होता सगळ्यांशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवणे आणि आपल्या वागण्यातून घरात सगळं नीटच आहे हे लोकांना पटवणे. 
दुसऱ्याच दिवशी ठरवलेल्या पद्धतीने वागायला सर्वांनी सुरुवात केली. ऑफिसला जाताना मैथिलीला मुद्दाम थांबवत आई किंवा बाबा डबा आणून देत मग ती हसून त्यांचा निरोप घेई. अमेय आईबाबांसोबत जास्त वेळ घालवू लागला. ह्या कामात तिच्या नणंदेनेही मदत केली सुट्टीच्या दिवशी ती तिच्या नवरामुलांसह  येई दिवसभर गप्पाटप्पा , खाणे ह्याने घर नुसते भरून जाई. सलग दोन महिने अशा काही छोट्या छोट्या गोष्टी इतरांच्या लक्षात येत आहेत अशा करत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला खरा पण ह्यावेळी एक नवीनच प्रश्न समोरून आला इतकं सगळं चांगलं कसं?😂😂 ह्या प्रश्नांनी सगळ्यांची हसून हसून पुरेवाट लागली. पण एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं नातं अजूनच घट्ट झालं. ते सगळे कुटुंब म्हणून अजून जवळ आले. आणि सगळ्यांना हेही लक्षात आलं की लोक बोलणारच आपण मात्र आपलं आयुष्य जगत राहायचं आनंदाने. 
तात्पर्य हेच की आपण कसेही असु समाज मात्र त्याने लावलेल्या चष्म्यातूनच आपल्याकडे बघत असतो. आपलं वाईट होत असेल तर फुकटचे सल्ले देतो आणि चांगलं होत असेल तर बोटं मोडतो. ह्या सगळ्यांवर एकच उपाय असतो तो म्हणजे आपल्या छोट्याशा  विश्वात एकमेकांना समजून घेणे, विश्वास ठेवणे आणि मुख्य म्हणजे आहे त्या क्षणांना भरभरून जगणे. आहे त्या परिस्थितीतही समोरचा आनंदी कसा काय हे लोकांना जास्त कोड्यात पाडते. कुणी आपलं घर तोडण्यासाठी, नात्यात दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ते वेळीच ओळखून आपलं नातं घट्ट व्हावं म्हणून आपण प्रयत्न करावेत जे त्या व्यक्तीला जागेवर आणतील. आपण नेहमी रागाच्या भरात म्हणत असतो की हिने / ह्याने माझं वाईट केलं मी पण त्याच करणार पण हा #Quote_of_the_day काय सांगतो बघा तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. #गौरीहर्षल
The best revenge is happiness, because nothing drive's people more crazy than seeing someone actually living a good life. 

Quote of the day 3

#Quote_of_the_day3
हवीहवीशी_तुलना
शीर्षक जरा विचित्रच आहे न? गोष्टही अशीच आहे विचित्र पण सगळ्यांच्या ओळखीची. गोष्ट म्हणण्यापेक्षा किस्से म्हणूयात. किस्से आपले, आपल्या मनात लपलेले. आपण आपल्या दिसण्यापासून ते वागणं , बोलणं, खाणं पिणं सगळ्याच बाबतीत जास्त जागरूक असतो. कुठे एखादी आकर्षक व्यक्ती दिसली की नकळतपणे आपण स्वतःची तुलना तिच्याशी करू लागतो. कधी कधी ह्या तुलनेमुळे स्वतःला त्रासही होतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काही लोक तर अस कुणी भेटलं तर त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी नको तेवढे बदल स्वतःमध्ये करायला सुरुवात करतात. ह्या सगळ्या धावपळीत आपण खरे कसे आहोत हेच विसरतात. 
फेसबुकमुळे एक गोष्ट चांगली होते ती म्हणजे आपल्याच जुन्या आठवणी बघून आपण किती घडलो आहोत हे कळतं. तसे आपण बदलतच असतो अगदी दररोज. पण अट्टहासाने दुसऱ्यासारखं होण्यासाठी केलेले बदल कुठेतरी मनाला पटत नसतात. जी खूप जवळची आणि जेन्युईन लोकं असतात ती आडून आडून आपल्याला हे सुचवतात सुद्धा पण डोळ्यावर पट्टी असते न. आरशात बघताना नकळतच हे आपल्याला जाणवतं सुद्धा की आपण हे नाही आहोत पण मान्य कोण करणार??? असो
तुलना करणं हा मानवी स्वभाव आहे. पण तुलना कुणाशी , कधी कुठे करावी ह्याचं भान बाळगणं प्रचंड गरजेचं असतं. Just because आपल्या आसपास कुणीतरी  वेगळ्या लाइफस्टाइलने जगणारी व्यक्ती आली आहे.आणि मग तिला दाखविण्यासाठी मी पण तसच करणार , तसच वागणार हा अट्टहास का? ती व्यक्ती, तिच्या जगण्याच्या पद्धती, त्या मागची खरी खोटी कारण आपल्याला माहीत असतात का नाही ना?? मग आपण जसे आहोत तेही त्या व्यक्तीलाही माहिती नसतं. 

एक छोटीशी गोष्ट आठवली इथे रमा आणि रीमा एकमेकींच्या शेजारणी झाल्या होत्या नव्यानेच. रमा अगदी सालस , सोज्वळ वगैरे टाइप तर रीमा मॉडर्न. पहिल्या भेटीनंतर रमा विचार करू लागली की मी किती गावंढळ दिसते रोज अगदी घरच्या कपड्यात असते. माझं राहणीमान पण आकर्षक नाही. त्यावरून एक दोन वेळा ती नवऱ्याला बोलली सुद्धा की तुम्हाला मी अशी राहते म्हणून आवडत नाही का?? नवरा दोन मिनिटे शांत झाला मग बोलला मी तुझ्या साध्या सरळ स्वभावाला आणि राहण्याला बघूनच तुझ्या प्रेमात पडलो होतो. आणि कितीही वर्ष झाली तरी त्यात बदल होणार नाही. पण जर तुला स्वतःहून स्वतःसाठी काही करायचं असेल तर मी तुझ्यासोबत नेहमीच असेन. क्षणभरच रमाला बरं वाटलं पण लगेच मॉडर्न रीमा आणि तिच्याबद्दल सगळीकडे होणारी चर्चा आठवली. दुसरीकडे रीमा होती जिच्याबद्दल इतकी चर्चा सुरू असताना तिला मात्र तिच्या घर आणि नोकरी चक्रातून वेळच मिळत नसे. पण जेव्हा जेव्हा ती रमाला बघे तिला वाटायचं की किती छान आहे न ही, कधी काळी मीही अशीच होते. पण नोकरी करणं ही गरज झाल्याने स्वतःत बदल घडवले आणि स्वतःला हरवून बसले. 
अशा ह्या रमा आणि रिमा ची एका कार्यक्रमात भेट होते. हळूहळू अवघडलेपण जात मस्त गप्पा मारतात दोघीही. एकमेकींबद्दल काय वाटतं हे जेव्हा त्या ऐकतात तेंव्हा दोघींनाही पटत की आपल्याला जे हवंय ते आपल्याकडेच आहे. आपण जर स्वतःला स्वतःहून स्वीकारलं तरच आपण स्वतःला आवडू शकतो. मग एकमेकींच्या मदतीने स्वतःतल्या हरवलेल्या तिला शोधण्याचा प्रयत्न करायचा अस ठरवत त्या एकमेकिंचा निरोप घेतात. 
हे लिहिण्याचं प्रयोजन इतकंच की स्वतःमध्ये बदल घडवताना स्वतःला काय आवडत पटत,रुचतं आणि शोभत हे लक्षात घेऊन बदल घडवले तर व्यक्तिमत्व खुलून येतं आणि ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. 
तुलनाही करावी पण ती फक्त स्वतःशीच. आपल्या जुन्या आणि नव्या व्हर्जन मध्ये. मग आपल्याच लक्षात येईल नेमकं काय बदलल तर आपल्याला आपण सापडू? स्वतःला स्वतःचा शोध लागणं गरजेचं आहे. नाहीतर सोशल मीडियाच्या चकचकीत रूपाने आपण कधी हरवू कळणारही नाही. 
मॉडर्न होण्यापेक्षा क्लासी होणं जास्त योग्य. हो पण आपल्याकडे मॉडर्न किंवा क्लासि फक्त कपड्यांनीच होता येतं असा गोड गैरसमज आहे. प्रत्यक्षात खऱ्या जगात मात्र आपले विचारच आपली परिपक्वता दाखवतात आणि कपडे कसेही असले तरी आपल खरं रूप समोर येतं.
So try to be unique not copy of someone else. 

Compare yourself only to who you were yesterday. Be your own competition.

हाच होता आजचा #Quote_of_the_day. #गौरीहर्षल

Quote of the day 2

#Quote_of_the_day2

प्रतिक्षा आणि तिच्या जिवलग मैत्रिणीचं दिक्षा च एकत्रच पण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. प्रतिक्षाला नव्याने मार्केटमध्ये आलेल्या एका ठिकाणी नोकरी मिळाली तर दिक्षाच मात्र एका मोठ्या कम्पनीत सिलेक्शन झालं. पगार दोघींना जवळपास सारखाच होता पण प्रतीक्षा मात्र नाराज झाली. अर्थातच कारण योग्य होत तिच्या दृष्टीने. हळूहळू दोघीही कामाच्या ठिकाणी रुळू लागल्या. दीक्षा जिथे होती तिथे कामाचे स्वरूप आणि नियम ठराविक होते आणि ते तसेच असावे असासुध्दा नियम होता. त्याउलट प्रतिक्षाच्या कंपनीत मात्र नवनवीन प्रयोग , कल्पना मांडणे , चर्चा करणे व्हायचे. कामाची पद्धत प्रतिक्षाला  सुरुवातीला कळतच नसे. कारण वर्षानुवर्षे आजूबाजूला सगळ्यांना एका साच्यातच काम करताना बघितलं होतं. पण जसजसा वेळ गेला तिलाही वेगळ्या पद्धतीने विचार करणं, तो ठामपणे मांडणं जमू लागलं. खरं तर सिलेक्शन च्या वेळी ग्रुप डिस्कशन मध्ये  तिला हिरीरीने बोलताना बघूनच तिचं सिलेक्शन झालं होतं. इथे फक्त एकच केलं जातं होत की एखाद्या महिन्याचा वेळ प्रत्येक एम्प्लॉयीला न सांगता दिला जात असे. ह्या महिन्यात ती व्यक्ती काम कस करतेय, की फक्त सांगेल तेवढंच करतेय , आऊट ऑफ द बॉक्स आहे का हे निरीक्षण करून मगच लेटर हातात मिळे. अर्थात ही कल्पना आधी दिलेली असायची की आमच्या पद्धतीत, विचारसरणी मध्ये तुम्ही फिट असाल तर आम्ही तुम्हाला कंटीन्यु करू. 
प्रतीक्षा हळूहळू सगळं एन्जॉय करत काम करू लागली. एक दिवस तिची आणि दिक्षा ची भेट झाली. दिक्षा रुटीनला खूप वैतागली होती. तिचं सगळं ऐकून प्रतीक्षा घरी आली तेच विचारांच्या नादात. तिच्या बाबांनी तिला थांबवत विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिलाही आधी वाटलं होतं आपल्याला तिथे जॉब का नाही मिळाला. पण आता अस वाटतय की जे आहे ते खूप छान आहे. मी बरच काही शिकते आहे स्वतःला डेव्हलप करतेय. हे त्या ठिकाणी कदाचित शक्य झालं नसतं. मग तिचे बाबा हसून तिला म्हणाले की मी तुला हेच समजावून सांगत होतो की आत्ता जिथे आहेस तिथून पुढे जायचं आहे हे नक्की. पण त्यासाठी आत्ता जे समोर आले आहे ते नको नाकारू. 
Appreciate where you are in your journey even if it's not where you want to be.  Every season serves a purpose.
एक दिवस नक्की तू तुला हव्या असलेल्या ठिकाणी असशील पण त्यासाठी प्रवासातला प्रत्येक प्रसंग, ठिकाण काय शिकवत आहे त्याकडे लक्ष दे. त्या गोष्टींचा भविष्यात उपयोग नक्कीच होईल. 
आपण खऱ्या आयुष्यात पण असेच वागतो बऱ्याचदा आपल्याकडे जे असतं, आपण जिथे असतो त्या गोष्टीची किंमत नसते आपल्याला. उलट समोरच्या कडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे का नाही म्हणून आपण हळहळत बसतो.  Every season serves a purpose , फक्त तो हेतू ओळखून स्वतःला ग्रुम करणं जमायला हवं. आपली लेटेस्ट फेज कोणती का असेना मग विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी.  आताच्या परिस्थितीत जर बदल घडवून आणायचा असेल तर त्या परिस्थितीला स्वीकारून आवश्यक ते बदल करायला हवेत. हाच होता आजचा #Quote_of_the_day❤️❤️ #गौरीहर्षल

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

Quote of the day 1

#Quote_of_the_day 
     जराशी तणतणत अनुजा तिच्या डेस्कवर येऊन बसली. आज मीटिंगमध्ये पुन्हा बॉसशी वाजलं होतं. तसा अनुजाचा मुद्दा बरोबर होता पण बोलताना जीभ घसरली अन् पुढचं रामायण घडलं. थोडं पाणी पीत तिने तिच्यासमोर असणाऱ्या कम्प्युटर वर आवडतं ब्लॉग पेज ओपन केलं. कामाच्या ठिकाणी हे करणं खर तर योग्य नसतं पण ते ब्लॉग पेज त्यांच्याच कम्पनीने डिझाइन केलेलं होत आणि आता ते बऱ्यापैकी पॉप्युलर असल्याने नवीन प्रोजेक्ट वेळी त्याचा उल्लेख नक्कीच व्हायचा. 
असो. तर बघूया तरी आज काय नवीन आहे म्हणून अनुजाने ब्लॉग ओपन केला होता. 
तिच्या समोर नवीन quote म्हणजेच सुविचार आला आणि तिचं विचारचक्र सुरू झालं. 
“You can give a person knowledge but you can't make them think. "
 खरंय न नकळतच अनुजा पुटपुटली. काही लोकांना बदल करावा लागेल म्हणून सत्य नाकारणं किती सोयीचं वाटतं. पण त्याचा तोटा काय होईल हा विचार करत नसतील का अशी लोकं? स्वतःचे विचार थोडे बाजूला सारून ती पुढे वाचू लागली. 
पुढे लिहिलं होतं, असं अनेक लोक वागतात अगदी पावलोपावली आपली त्यांच्याशी गाठ पडते. ही लोकं  खोटया किंवा चुकीच्या बाजूने अगदी ठामपणे उभी असतात. खर तर त्यांना माहीत असत की कधी न कधी ह्यामुळे आपलं नुकसान होऊ शकत पण ते क्षणिक फायद्याचा विचार करून अस वागतात. त्याउलट जे लोक खरं किंवा योग्य काय आहे ह्याचा विचार करून वागतात त्यांना सुरुवातीला बऱ्यापैकी त्रास होतो पण त्या वागण्याचे लॉंग टर्म चांगले इफेक्ट त्यांना नक्कीच मिळतात. हे वाचल्यावर आपसूकच तिचा मूड बदलला. कारण आज न उद्या आपल्याला आपल्या कामाची योग्य ती पोचपावती मिळणार यावर तिचा ठाम विश्वास होता.  
        मनोमन लिहिणाऱ्याला धन्यवाद देत अनुजा प्रोजेक्ट मध्ये सांगितलेले बदल करण्यात गुंतली. बदल करून होताच तिने प्रेझेंटेशन ला एक फायनल टच देत सुटकेचा श्वास सोडला. दहा मिनिटातच क्लायंट समोर तिला सगळं एक्सप्लेन करायचं होतं. लॅपटॉप घेऊन तिने कॉन्फरन्स हॉल मध्ये प्रवेश केला. क्लायंट बऱ्यापैकी मोठी पार्टी असल्याने आज कंपनीमधले सिनियर मेम्बरही मिटींगला हजर होते. अनुजाने प्रेझेंटेशन सूरु केलं ते जसं जस पुढे जात होतं क्लायंट नाराज होत असल्याचं अनुजाच्या लक्षात आलं. शेवटी मधेच प्रेझेंटेशन थांबवून त्यांनी अनुजाला विचारलं की आपलं जे बोलणं झालं होतं त्यानुसार इथं काहीच दिसत नाही असं का? ती काही बोलणार इतक्यात तिचे बॉस बोलले की ते मी नको अस सांगितलं कारण मला ते बदल फारसे लक्ष वेधून घेतील असे वाटले नाहीत. मधेच बोलण्या मागे बॉसला वाटलं होतं की आता क्रेडिट आपल्याला मिळून हिचं प्रमोशन कॅन्सल होईल. पण झालं उलटंच अनुजाने ते प्रेझेंटेशन बंद करून आपण अजून एक प्रेझेंटेशन तयार केले आहे असं सांगितलं. आणि ते सादर करण्याची परवानगी मागितली. क्लायंट हातातून जाऊ नये म्हणून तिच्या बॉसच्या बॉसने तिला परवानगी दिली. जसजशी अनुजा एक एक मुद्दा मांडत होती तसतसा क्लायंट रस घेऊन ऐकत होता आणि प्रश्न ही विचारत होता. आधी आणि नंतरच्या प्रेझेंटेशन मध्ये मुख्य फरक होता तो टेक्नॉलॉजी आणि नवीन गोष्टी वापरण्याचा. बॉसच्या म्हणण्यानुसार नवीन गोष्टी एड केल्या तर खूप काही बदल करून काम करावे लागेल आणि त्यामुळे सगळ्यानाच जास्त वेळ काम करावे लागेल. पण अनुजाने ते आपल्या पध्दतीने मांडत काही उपाय सुचवले होते  ज्यामुळे काम मॅनेज करणं शक्य होते. सकाळी मीटिंगमध्ये ती हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं ऐकून न घेताच बॉसने सुनावलं आणि वाद झाला. आता मात्र हे क्लियर झाल्याने क्लायंट आणि सिनियर यांच्यासमोर अनुजाचं पारडं जड झालं होतं. 
तिचा बॉस मात्र आज ह्या पदावर इतरांचं क्रेडिट स्वतःच्या नावावर करतच आलेला होता त्याला बसलेली ही मोठी चपराक होती. कारण मिटिंग संपता संपता तो प्रोजेक्ट कंपनीला मिळाला आणि त्याच मीटिंगमध्ये उत्तम कामगिरी केली म्हणून लवकरच अनुजाला त्याचं फळ मिळणार अस सुचवत कंपनीचे सिनियर मेम्बर बाहेर पडले. 
©गौरीहर्षल ११.९.२०१९

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

शुद्ध बिजापोटी....

#शुद्ध_बिजापोटी...
नुकतीच एक गोष्ट वाचण्यात आली एका राजाची आणि चंदनाच्या व्यापाऱ्याची. व्यापारी त्याचा धंदा होत नसतो म्हणून राजाच्या मरणाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे होतं काय राजाच्या मनातही त्याला न बघता , न भेटता फाशीवर लटकवायचा विचार येऊ लागतो. गोष्टीचं तात्पर्य अस होतं की आपण मनात ज्या व्यक्तीबद्दल , जसे विचार करत असतो तशीच प्रतिक्रिया त्या व्यक्तीकडून नकळत आपल्याला दिली जाते. कारण आपल्या विचारांचे व्हायब्रेशन्स त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल विष किंवा साखर पेरण्याचं काम करत असतात. पेरलेले उगवतेच फक्त ते आपल्या फायद्याचे ठरते की नाही हे वेळ ठरवते.
सरिता ला सुद्धा अशीच सवय होती.कुठल्याही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं अस ठरलं की तिच्या मनाचे घोडे नको त्या दिशेने उधळायचे. अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली. सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होतं. त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती. पण आता नवीन गाव, नवीन लोक म्हटलं की सरीताच सुरू झालं नेहमीप्रमाणे. नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचा अनुभव आल्याशिवाय कुठेही काहीही बोलू नकोस. पण ऐकेल ती सरिता कसली नवीन ठिकाणी आली की तिने नुसत्या हाय हॅलो वरून सगळ्या शेजारच्या लोकांबद्दल बोलायला सुरुवात केली. पाटील असे,  पवार तसे वगैरे वगैरे. हळूहळू ज्या शेजारणी तिच्यासारख्या होत्या त्यांच्याशी तिचं गुळपीठ मस्तच जमलं. रोज मुलं, नवरा शाळा ऑफिसमध्ये गेले की एकमेकींना आवाज देत त्या सगळ्या जमू लागल्या. बायको रमली म्हणून नवराही काही म्हणत नसे. अशातच सोसायटी मध्ये एक नवीन कुटुंब राहायला आलं. नवरा बायको दोघेचजण 2,3 दिवस घर लावण्यात गेले मग तीही ह्या सगळ्या जणींमध्ये मिसळू लागली. ह्या काळात सरिता नवरा आणि मुलासोबत गावी गेली होती त्यामुळे तिला काहीच कल्पना नव्हती. गावाहून आल्यानंतर जेंव्हा सरिता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आली तेंव्हा नव्या शेजारणीचा विषय निघाला. कुणीतरी म्हणत होते किती छान राहते न ती, घरही टापटीप असतं. कौतुक सुरू होतं. तितक्यात सरीताची जिवलग मैत्रीण वनिता म्हटली त्यात काय मुलं होस्टेलवर आहेत म्हटल्यावर हे राजराणी मज्जाच करणार ना? 😏 तितक्यात ती नवीन शेजारीण म्हणजे नीता तिथे आली आणि सगळ्याजणी शांत बसल्या. तीही सगळ्यांशी बोलत होती. तस बघायला गेलं तर तिने अजून कुणालाही घरची पार्श्वभूमी सांगितली नव्हती पण म्हणतात न रिकाम डोकं सैतानाच घर त्या नुसार ह्या सगळ्यानी मिळून ऐकीव माहितीवर आपले अंदाजच खरे अस ठरवलं होतं. सरिता मॅडम तर त्यात सगळ्यात पुढे गेल्या अजून पुरेशी ओळख न होताच तिला म्हणाली तुमची मज्जा आहे न मुलं होस्टेलवर सासुसासरे पण लांब आमचा इथं काम करून करून जीव जातो. नीता शांतपणे हसली आणि म्हटली अस काही नाही हो उलट कुणीच नाही त्यामुळे घर खायला उठत पण नोकरीही महत्त्वाची आहे त्यामुळे काही करता येत नाही. नीता दुखावली पण तिने स्वतःला कंट्रोल करत तिथून निघून जाणच निवडलं. सरीताने ह्यावरून काहीतरी शिकायला हवं होतं पण जित्याची खोड मेल्याशिवाय कुठली जाणार ती अजून अजून कुरघोड्या करु लागली नीताला त्रास देण्यासाठी . नीता आणि तिचा नवरा दोघेही जॉबच्या धावपळीत ह्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हते.
त्यातच सरीताच्या नवऱ्याने तिला बातमी सांगितली की त्याचे कुणीतरी बॉस त्यांच्या सोसायटीत राहण्यासाठी आले आहेत. तर त्यांच्या घरच्यांशी नीट वाग आणि मला अजून नाव कळले नाही त्यामुळे कुणीही नवीन असतील तर तोंड उघडून घाण करु नकोस माझं प्रमोशन जवळ आल आहे.पर्सनल गोष्टींमुळे  मला ऑफिसमध्ये कुणाशी शत्रुत्व नको आहे. आता तुम्ही म्हणाल की अस का बोलला तो तर सरीताने आधीच्या बॉसच्या आईसोबत असाच नको त्या काड्या करून पंगा घेतला होता आणि त्यामुळे ह्याला स्वतःच्या प्रमोशन वर पाणी सोडावे लागले होते. कारण प्रत्येक जण सहन करेल किंवा दुर्लक्ष करेल अस होत नाही. आणि चूक सरीताची असल्याने त्याला काही बोलताही आलं नाही. बॉसच्या आईला सरीताच्या मुळेच खूप त्रास झाला होता. असो तर त्यामुळे नवरा आता सतत तिला सूचना देत होता पण सुधारेल ती सरिता कसली.
फायनली कंपनीच्या नेहमीच्या पार्टीची सूचना आली सरीताच्या नवऱ्याचे ऑफिशियल रेकॉर्ड उत्तम असल्याने ह्या वर्षी प्रमोशन मिळणार अस त्याला वाटत होतं. त्याच पार्टीत कंपनीचा नवीन हेड कोण आहे कळणार होत. सरीतासोबत तो पार्टीत पोहोचला. सगळ्यांशी ओळख करून देत असतानाच अचानक सरीताला दोन ओळखीचे चेहरे दिसले आणि ती विवेकला म्हटली हे इथे काय करतात? तो काही बोलणार इतक्यात स्टेजवरून त्याच दोघांच्या नावाचा पुकारा झाला मि. अँड मिसेस जाधव प्लिज स्टेजवर या. आणि विवेकचे बॉस बोलू लागले मला तुम्हांला सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की जाधव यांनी आपली xyz गावाची ब्रँच यशस्वीपणे हाताळल्यामुळे आता कंपनीने त्यांना आपली ब्रँच सांभाळण्यास इथे बोलावले आहे. गेले काही महिने ते अगदी सामान्य कामगारांमध्ये मिसळून सगळं निरीक्षण करत होते. पण आता येणाऱ्या 1 तारखे पासून दोघेही आपापल्या डिपार्टमेंट ची जबाबदारी घेतील. हे सगळं ऐकत असताना सरीताला मात्र दरदरून घाम फुटला होता. आणि त्याचं कारणंही  तिला माहीत होत. कारण होतं मि अँड मिसेस जाधव दुसरं तिसरं कुणी नसून नीता आणि तिचा नवरा होते😂  आणि नीता विवेकची बॉस म्हणून जॉईन झाली होती. विवेकला सरीताची अवस्था पाहून अंदाज आला होता पण त्याने फक्त इतकंच विचारलं हे आपल्या सोसायटीमध्ये राहतात? सरिताने होकारार्थी मान डोलावली. तसा तो म्हटला तुला मी घरी गेल्यावर बघतो. आता सरीताची अवस्था अजूनच अवघड झाली.
स्टेजवरून आभारप्रदर्शन झाल्यावर नीता खाली उतरून सगळ्यांशी बोलू लागली. ती विवेकसमोर आली आणि हात मिळवत म्हटली कसे आहात मि अँड मिसेस काळे? मिसेस काळे तर फार चांगलं ओळखतात आम्हाला हो ना? सरीताला काय बोलावे सुचत नव्हते ती कसनुस हसली. नीता पुढच्या कपलशी बोलू लागली. पार्टीच्या शेवटच्या भागात प्रमोशन कळणार होते. त्यानुसार एकेक नाव घेतले जात होते. नीता आणि तिचा नवरा अभिनंदन करत प्रत्येकाला बुके देत होते. सगळ्यात शेवटी विवेकच्या डिपार्टमेंटची नावं घेतली जाऊ लागली जसजशी लिस्ट पुढे सरकत होती तसतशी सरिता अस्वस्थ होत होती. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले पुन्हा एकदा विवेकचे नाव वगळले गेले. पार्टी पुढे सूरु राहील म्हणत सगळे जिकडेतिकडे गेले. नीता सरिता समोर आली आणि म्हटली तो वरचा असतो न सरिता सगळ्यांना संधी देतो व्याजासह परतफेड करण्याची. आम्ही आमच्या परीने दुर्लक्ष करत तुला खूप संधी दिली सुधारण्याची पण तू आमचं कुटुंब जे इथे नसत त्यांच्याबद्दलही वाईट बोललीस तेही तुला काही माहीत नसताना आणि आम्हा दोघांच्या चरित्र्यावरही नको नको ते आरोप केलेस तुझा काही संबंध नसताना, आम्ही शांत होतो कारण सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे. आता हे सगळं आम्हाला कुठून आणि कसं कळलं ह्याचा विचार करण्यापेक्षा तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचं किती नुकसान होत आहे याचा विचार कर. शहाणी असशील तर सुधारशील नाहीतर जे हातात आहे ते ही गमावशील विवेककडे नजर टाकत नीता निघून गेली.

ह्या सगळ्यातून सरिता काय शिकली ते आपण ठरवायचे आहे. अशा अनेक सरिता आपल्याला पावलोपावली भेटतात ज्या काहीही संबंध नसताना पुरेशी माहिती नसताना इतरांबद्दल गरळ ओकत असतात. ही जी जमात असते ती असमाधानी असते स्वतःच्या आयुष्यात अगदी त्यांचे दोन्ही हात सुखानी भरलेले असले तरी त्यांना इतरांना त्रास दिल्याशिवाय, दुखावल्या शिवाय घास घशाखाली उतरत नाही. त्याबतीत आपण ऊँ इग्नोराय नमः हाच मंत्र वापरू शकतो. कारण अस वागून हे लोक स्वतःचं काय नुकसान करून घेत आहेत हे त्यांना कळत नाही. आणि सांगून सुधारण्या इतकी अक्कल त्यातल्या फार कमी लोकांकडे असते.
बाकी नीता म्हणाली तसं तो वरचा संधी देतो आणि कधी कधी तर तोच आपल्या बाजूने परतफेडही करतो. बघण्याची दृष्टी हवी फक्त.#गौरीहर्षल #४.१०.१९