Quote of the day 5

#Quote_of_the_day5

रचना एक खूप चुणचुणीत चटकन कुणाच्याही नजरेत येईल अशी गोड मुलगी. धाकटी असल्याने सगळ्यांची आवडती. जितकी घरच्यासमोर साधी तितकीच बाहेर त्या उलट असे. पण स्वतःच्या मर्यादा तिने आखून घेतलेल्या असल्याने घरचे कधीही तिला कशासाठी अडवत नव्हते. नुकतंच तिने शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता नव्यानेच नोकरीही हातात आली होती. सुरुवातीचे दिवस असल्याने घरून एक दोन महिने पगार हवा तसा वापरायची तिला परवानगी होती. मग काय मस्त मज्जा करणं सुरू होतं. पण त्यातही ती घरच्यांना विसरली नव्हती पहिल्या पगारात सगळ्यांना आवडतील असे सरप्राईज दिले होते तिने ह्या कृतीमुळे आईबाबांना आपल्या मुलीबद्दल असलेली खात्री अजूनच पक्की झाली होती. मित्रही भरपूर होते तसे तिला पण घरचं वातावरण मोकळं असल्याने घरी सर्व माहिती असे. हल्लीच मात्र मित्रमंडळी मध्ये एक नवीन चेहरा सतत दिसू लागला होता. तो होता समीर रचनाचा कलीग समवयस्क असल्याने तो त्यांच्या ग्रुपमध्ये कधी मिसळला कुणाला कळलंच नाही. हळूहळू रचना आणि समीरची फक्त मैत्री नसून पुढे काहीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले होते. तसे आडून आडून सगळे छेडतही असत. पण अजून त्या दोघांनी काही मान्य केलं नव्हतं. विशेष म्हणजे रचनाला काही गोष्टी आधीच स्पष्ट करायच्या असल्याने ती तटस्थपणे स्वतःच्या भावना बघत होती. समीरबद्दल फक्त जुजबी माहिती तिच्याकडे होती त्याच्या घरचे, मित्रमंडळी बाकी गोष्टी त्याने कधी स्वतःहून सांगितल्या नव्हत्या. आणि विचारलं तर तो टाळतो हे तिला समजलं होतं. मग ह्यावर उपाय म्हणून तिनेच तिच्या जवळच्या एक दोन मित्रांना आणि भावाला विश्वासात घेत सगळं सांगितलं पण पुढे जाण्याआधी मला समीरबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी मदत करा असंही ती म्हणाली. मग हळूहळू सगळे आपापल्या परीने कामाला लागले. समीरची फॅमिली कुठे असते , काय करते शोधू लागले. ह्या सगळ्या शोधमोहीमेत फार अविश्वसनीय माहिती मिळाली. इकडे समीरला ह्या सगळ्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो रचनाला कस प्रपोज करावं ह्या विचारात होता.  खरी माहिती मिळाल्यावर रचनाला खूप धक्का बसला पण वेळीच सगळं कळलं म्हणून तिला बरं वाटलं. समीरने आपल्या नावासह सगळी ओळख बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणतात न सत्य बाहेर येतंच. त्याच्या घरचं गुंडगिरी असणार वातावरण, ज्यात समीर ही सहभागी होता. तो नसता तर कदाचित वेगळा विचार करता आला असता. पण हळूहळू त्या गोष्टींची खोली लक्षात आल्याने रचनाला तिच्या भावाने सावध केले. पण तिचं आधीच ठरलेलं होतं  त्यामुळे समीर जेंव्हा तिला प्रपोज करेल अस वाटू लागलं. त्या आधीच बाबांनी आणलेल्या मुलाशीच आपण लग्न करणार अस म्हणत तिने स्वतःच्या भावना प्रॅक्टिकली हाताळल्या. जे प्रचंड गरजेचे होते. ह्या सगळ्यात तिलाही भरपूर त्रास झाला कारण ती तिच्या पातळीवर त्याच्यात गुंतली होती पण समजूतदार कुटुंब पाठीशी असल्याने तिला फायदा झाला. समीरला वेळीच हिंट मिळाल्याने तो मागे फिरला. अर्थात अपवाद ठरला.  
इथं ही कथा आहे पण प्रत्यक्षात अशी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येतात ज्यांच्या आपल्या आयुष्यात असल्याने आपण प्रचंड भावनिक उलथापालथ अनुभवत असतो. वेगवेगळ्या नात्यांच्या रूपाने भेटणाऱ्या अशा लोकांमुळे आपलं आयुष्य डिस्टर्ब होत असत. अशा लोकांना योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळून एक अंतर ठेवून वागायला शिकावं लागतं. नाही तर त्रास होणारच. कधी कधी तर काही लोकांना दूरही करावं लागतं. कुणी आपला फायदा उचलत असतं, कुणी उगाच demotivate करत असत. पण आपण जर स्वतःला स्वतःची पहिली priority ठरवलं न तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आधी करू लागतो. मग आपलं सुखदुःख, आनंद, यशापयश हे इतरांची नाही आपली जबाबदारी होतात. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदाही आपल्यालाच होतो. 
हा #Quote_of_the_day ही असच काही सांगतो, बघा पटतंय का ??     #गौरीहर्षल
Not everyone you loose is a loss. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी