कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव
कालाय तस्मै नमः ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे असा उल्लेख त्यामध्ये मी केला होता. 
कालाय तस्मै नमः मधील सगळ्यात महत्वाच्या पात्रांपैकी एक पात्र म्हणजे अरुंधती श्रीपाद कुलकर्णी, कैवल्य ची आई. 
ज्यांनी ही कथा प्रतीलिपीवर किंवा पुस्तकाच्या माध्यमातून ( shopizen ॲप वरून मागवता येईल) वाचली आहे त्यांना त्या पात्राबद्दल माहीत आहे. 
नवीन वाचकांसाठी थोडक्यात सांगते ,
 कालाय तस्मै नमः ही गोष्ट आहे कुलकर्णी कुटुंबाची...
ह्या कुटुंबातील थोरल्या सुनेवर अरुंधतीवर घरातील कुणीतरी अमानवीय शक्तींसोबतच विषप्रयोग करत आहे...
पण अरुंधतीला मिळाली आहे दैवी शक्तींची देणगी...
तिच्या जीवाशी खेळण्याचा परिणाम होतो सगळ्या कुटुंबावर ....
अरुंधतीचा अकाली मृत्यू कुटुंबाला देतो मुलगी जन्माला न येण्याची शिक्षा.....
पण मग अचानक काही वर्षांनी घरात एक मुलगी जन्माला येते आणि ती जगते ....
तिच्या जन्माला येण्यामागे काही रहस्य आहे की अरुंधतीने घेतला आहे पुनर्जन्म? 
अरुंधतीच्या मृत्यूला जबाबदार असणारे पुन्हा एकदा प्रयत्न करतील का? त्या नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाला संपवण्याचा... 
वरवर सामान्य दिसणाऱ्या ह्या कुटुंबातील लोकांनी अशी काय रहस्य दडवली आहेत आपल्या मनात?  

तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की या कथेतील अरुंधती च्या मृत्यु आधी ती तिच्या सासऱ्याना काही गोष्टी सांगते. त्यातील एक गोष्ट म्हणजे घरातल्या सर्वांसोबत कुलदैवतेच्या दर्शनाला जाणे. ज्यामुळे तिच्या मृत्युने घराला लागलेला दोष कमी किंवा सुसह्य होईल. 

ह्या मुद्द्यावरून माझ्या एका अध्यात्मिक साधक असलेल्या वाचक मैत्रिणीने नुकतीच एक सुंदर अनुभूती अनुभवली. 

ही मैत्रीण स्वतः अध्यात्मिक साधनेत एका उंचीवर आहे. तिचा अनुभव तिच्या शब्दात जेव्हा तिने मला सांगितला तेंव्हा अंगावर उमटलेला शहारा आजही मला आठवतो. 

माझं या मैत्रिणीशी बोलणं नुकतच झालं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच. त्यामुळे तिला आलेली अनुभूती हा आमच्या दोघींसाठी अध्यात्मिक संकेत आहे असं मला वाटत. 

कालाय तस्मै नमः कथेत ज्याप्रमाणे कुलकर्णी कुटुंब काही अडचणींनी त्रासलेले आहे त्याच प्रमाणे या मैत्रिणीचे माहेरचे कुटुंबीय सुद्धा दीड वर्षांपूर्वी काही गोष्टींना सामोरे जात होते. 
घरात वादविवाद, लग्न न जमणे, जमलेल लग्न मोडणे इतर काही त्रास हे सगळं ही मैत्रीण अनुभवत होती. पण तिला उपाय सापडला तो वर उल्लेख केलेल्या अरुंधतीच्या तोंडी असलेल्या संवादामध्ये तिने तिच्या माहेरच्या घरच्यांना ठामपणे हा उपाय करण्यासाठी सांगितले.
 मी इथे सविस्तर सगळं सांगू शकत नाही. कारण हा त्या कुटुंबाचा वैयक्तिक अनुभव आहे. पण महत्त्वाचा मुद्दा हा की, दीड वर्षांपूर्वी कुलदैवतेच्या दर्शनाला जाऊ लागल्यानंतर या कुटुंबाने विस्कटलेल्या गोष्टी नीट होताना बघितल्या.
यामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी गोष्टी नीट होताना बघितल्या त्याचप्रमाणे आगळीक झाल्यानंतर थोड्या वरून गोष्टी पुन्हा विस्कटताना सुद्धा बघितल्या. 
हे सगळं अनुभवणाऱ्या आपल्या साधक मैत्रिणीने तिच्यावतीने सतत देवीच्या चरणी प्रार्थना करत कुटुंबाला सद्बुद्धी देण्याची विनंती केली. आणि फायनली दीड वर्षानंतर अनेक अडथळे पार करत त्यांच्या घरामध्ये मंगल कार्य छान पद्धतीने पार पडले.
इथे या प्रत्यक्ष अनुभवांमध्ये अनेक गोष्टी होत्या. 
जसं की या घरातील व्यक्तीसुद्धा नको त्या मार्गांचा अवलंब करत होत्या चुकून किंवा हेतुपुरस्सर घरात येणाऱ्या माहेरवाशीणीचा अपमान केला जात होता. कुळधर्म कुळाचार योग्य पद्धतीने केले जात नव्हते. 
जसजसे हे कुटुंब त्यांच्या कुलदैवतेचे दर्शनाला जाऊ लागले, तसतशा हळूहळू गोष्टी मार्गी लागत आहे ते त्यांच्या लक्षात आले. अर्थात या गोष्टींसाठी बराच वेळ जावा लागला आणि तो लागतोच. पण संयमाने या कुटुंबाने एकमेकांची साथ देत त्या अवघड वेळेवरती मात केली.
 आणि देवीच्या इच्छेने आणि कृपाशीर्वादाने ते या सगळ्या दिव्यातून बाहेर पडले. 

ज्या साधक मैत्रिणीने अनुभव शेअर केला तिचे मनापासून आभार मानते आहे कारण मला स्वतःला हे लेखन माझ्याकडुन का करून घेतले जाते याची जाणीव या अशा अनुभवांतून होते. 

या कुटुंबाकडून मिळालेल्या सदिच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. 
माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट ही होती की , मी कधीही न ऐकलेल्या कुलदेवतेची ओळख मला या अनुभवातून झाली. 
श्री गड कालिका माता धार (इंदोर), माहेरची कुलस्वामिनी 🙏
देवीचा फोटो सोबत शेयर करतेय माहिती गुगल वर मिळेल. 
जिथे मी विचार काय कल्पनाही करू शकत नाही तिथून देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. आणि हे कार्य कुठल्या तरी विशिष्ट हेतून माझ्याकडुन करून घेतले जाते आहे याची जाणीव झाली. 
माझ्यासाठी हा अनुभव करुणात्रिपदीच्या अनुभवाप्रमाणे च एक विलक्षण अनुभूती आहे. 
लिहिताना खरे तर मला शब्द सुचत नव्हते पण " हे श्रेय माझं नाही. ही माझ्या मित्राची, दत्ताची इच्छा. आणि दत्त जयंतीच्याच आधी हा अनुभव कानावर येणं हे माझं रीटर्न गिफ्ट ❤️❤️❤️" 
बाकी? आता बाकी नाही...
सगळंच काही दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
आई राजा उदो उदो
स्वतःला शोधताना - गौरीहर्षल
1 जानेवारी 2024 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी