Quote of the day 9

#Quote_of_the_day9

रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजेच्या वेळी स्वतःहून पुढे येऊन मदत करणार मग ते करताना तिला कितीही त्रास झाला तरी तिची तक्रार नसे. चिडखोर नव्हती ती पण सतत येणाऱ्या अनुभवांनी तिची रिएक्ट करण्याची पद्धत तशी झाली होती. मूळ स्वभाव मात्र सहनशील आणि मदतीला तत्पर असा असल्याने तो उफाळून वर येईच. पण जेव्हा मदत घेतल्यानंतर लोक वळूनही बघत नसत ओळखही दाखवत नसत तेंव्हा तिला खूप मनस्ताप होऊ लागला. मदत करताना तिला तशी अपेक्षाही नसे पण लोक चक्क जेंव्हा ओळख नाकारत तेंव्हा वाईट वाटण स्वाभाविक होतं.
जे काही जवळचे लोक होते ते तिला समजावत की तू जशास तशी वागत जा शब्दात, भावनांमध्ये अडकून वाहवत जात जाऊ नकोस. तिलाही ते पटत असे पण पुन्हा कुणी रडकुंडीला येऊन मदत मागितली की ती व्यक्ती मागच्या वेळी कशी वागली ह्याचा विसर पडून रजनी मदत करे. 
हळूहळू मात्र जशी तिची चिडचिड जवळच्या लोकांना त्रासदायक होऊ लागली तेंव्हा तिचा मित्र रोहितने तिला समजवण्याचे ठरवले. कारण ह्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान रजनीचेच होत होते. झोकून देऊन मदत करताना ती मानसिक आणि शारीरिक दृष्टीने थकतच असे पण सगळ्यात जास्त परिणाम नंतरच्या वाईट अनुभवांमुळे होऊ लागला.सतत हसतमुख , टवटवीत दिसणारी रजनी आता सुकल्यासारखी दिसू लागली. नकळतच तिचे वजनही कमी होऊ लागले होते. तिला पुन्हा चियर अप करून ताळ्यावर आणण्यासाठी तिच्या जवळच्या 4,5 मित्रमंडळीनी ज्यात रोहितही होता छोटीशी ट्रिप काढायचं ठरवलं. जोडून 3 दिवस सुट्ट्या आल्या आणि ते सगळे जण फिरायला निघाले. तिथे गेल्यावर मजा मस्ती करण्यात सगळेच रमले. रिसॉर्ट अतिशय सुंदर होतं निसर्गनिर्मित तलावाच्या भोवतीने चालण्यासाठी वाट तयार केली होती. रजनीला मोकळं करण्यासाठी रोहित सगळ्यांपासून दूर घेऊन तिथे आला. जुन्या आठवणी ताज्या करत दोघेही मस्त हसत होते. हळूहळू गाडी रजनीला काय खटकत आहे त्याकडे वळली. मग ती बोलू लागली, खटकत अस नाही रे मला मदत करणं आवडत , खर तर आवडत म्हणण्यापेक्षा ती गोष्ट मला जगण्याचं बळ देते. आपण कुणाला तरी उपयोगी पडतो आहोत हेच खूप महत्वाचे असत मला , मी परतफेड म्हणून अपेक्षा ही ठेवत नाही. पण हल्ली काही अनुभव असे आले की मी चुकीची होते का अस मला वाटू लागलं.  गरज संपली तसं लोकांनी झिडकारल रे मला. म्हणजे मी काही आवर्जून पुन्हा कुणाला ओळख दाखवत नाही तो माझा पिंड नाही. पण समोरासमोर आल्यावर एक smile द्या आणि जा आपापल्या वाटेने बास. पण उलट केलं रे लोकांनी नको नको ते ऐकू आल मला स्वतःबद्दल की मी कुणाची तरी संपत्ती बघून, कुणाच स्टेटस बघून मदत केली म्हणे. तुला तर माहीत आहे ना मला स्वतःला तस काहीच कमी नाहीये मग मी अस का करेन?? 
आता हळूहळू रोहितला रजनीचा प्रश्न कळू लागला , ती दुखावली गेली होती लोकांच्या स्वार्थी आणि इनसिक्युर वागण्याने. त्यामुळेच ती इतके दिवस जे मनापासून स्वतःच्या आनंदासाठी करत होती त्याबद्दल तिच्याच मनात शंका आली होती. त्याने रजनीच्या हातावर थोपटल आणि तो बोलू लागला, रजु तू खूप हळवी आहेस, कुणी त्रासात, दुःखात असेल तर तू स्वतःहून मदतीला धावतेस. हा खूप चांगला गुण आहे ह्यात वादच नाही पण आजकाल हे दुर्मिळ होत चालल आहे. कारणे खूप आहेत त्यातली काही मला जी वाटतात ती सांगतो, पहिलं म्हणजे लोकांना ना हल्ली फुकट मिळणाऱ्या गोष्टींची किंमत राहिली नाही. मदतही मग ती कुठल्या का रुपात असेना विकत घ्यावी लागली तरच ती त्यांना पचते. तू तर स्वतःहून आणि फुकट देत असतेस. हो न? कळलं अस समजून रजनीने मान डोलावली. 
कारण नंबर दोन हे खरं तर खूप महत्त्वाचे कारण. रजू हल्लीच्या काळात कुणीही कुणाचं कोणतंही काम असंच करत नाही. अगदी छोट्यात छोट्या कामातही लोक आपला काय फायदा होतो आहे हे आधी बघतात. नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे सगळेच असे वागतात. पण भरीस भर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आईबाप अन् मुलंही तुला फक्त फायद्यासाठी एकत्र दिसतील. फायदा कुठल्याही स्वरूपात असला तरी. मग तुझ्यासारखी एक तोंडओळख असणारी व्यक्ती प्रेमाने, आपुलकीने, न मागता मदत करतेय म्हणजे त्यात काहीतरी चुकीचेच असणार हा प्रश्न लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. ह्यात तू चुकतेस अस नाही तर चूक परिस्थिती आणि बदललेल्या मानसिकतेची आहे. 
पण मग मला जे करावंसं वाटतं किंवा जे होत माझ्याकडून त्याच काय? रजनीने न राहवून प्रश्न विचारला. 
हलकेच हसत रोहित म्हटला, तू कर न तुला जे योग्य वाटत ते पण त्याचा त्रास तुला होऊ देऊ नकोस. म्हणजे बघ तू फायदा बघत आहेस अशी कुणाला जर शंका आहे तर त्यांना मदत करताना स्वतःला झोकून द्यायची गरज नाही. जेवढ्यास तेवढं करत जा. तू जशी इतर कशाचीही अपेक्षा ठेवत नाहीस तशीच परतून पुन्हा त्या वाटेवरही जाऊ नकोस. स्वतःहून संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नकोस. थोडक्यात काय तर तू ही आपलं काम झालं आता सिनियर लोक म्हणजे बाप्पा ग बघेल काय ते अस म्हणत बाजूला हो.  जितक्या लवकर तू स्वतःला त्या परिस्थिती आणि लोकांपासून अलिप्त करशील तितक्याच लवकर तुला मनशांती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला available करू नकोस म्हणजे कुणीही आलं मदत कर म्हणून की लगेच धावलीस अस करू नकोस. परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती गोष्ट कर. 
गेल्या काही अनुभवांमुळे काय बदल झाला आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच न ?? तुझ्या स्वतःकडे बघ पूर्वी तू कशी फ्रेश असायचीस आता मात्र सतत चिडचिड होते तुझी का?? कारण लोकांनी लावलेली लेबल्स तू स्विकारलीस जे तुझ्या मनाविरुद्ध होतं. कुठेतरी तुझं मन आणि शरीरही विरोध करतच होत त्यामुळे त्यावरही परिणाम झाला. सो, एक गोष्ट लक्षात घे इतरांची मदत कर, काळजी घे पण त्या आधी स्वतःची मदत कर , स्वतःची काळजी घे. 
Don't just be good to others. Be good to yourself too.
You can't pour from an empty cup. Take care of yourself first.  #गौरीहर्षल

रजनीला कळलं की नाही माहीत नाही पण तुम्हाला कळलं न ??? ☺️☺️☺️ कसा वाटला हा #Quote_of_the_day नक्की सांगा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी