blind perception 4/8

Blind perception 

या लेखमालेतल्या आधीच्या एका लेखावरती एक कमेंट आली होती. ती म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो, तेव्हा त्यातली काही लोक मात्र आपल्याला खिजवण्यासाठी आपला अपमान करतात किंवा आपल्याला तुच्छ लेखतात. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही यश मिळवलं आहे. त्याच्यामुळे आता समोरच्याला स्वतःच्या लायकीची जाणीव झाली असेल. 
तर इथे पुन्हा एकदा तुलनेचा मुद्दा येतो. काही लोकांना दुसरे यशस्वी झाले तर पोटात दुखत तर काही लोकांना ते स्वतः यशस्वी झाले की दुसऱ्यांना त्रास द्यावासा वाटतो. पण या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांना इतरांशी आपल्या आयुष्याची तुलना करण्याची सवय असते. आता इथे लोकांनी असं करावं की करू नये हा मुळात वादाचा मुद्दा नाही. 
मुद्दा हा आहे की जेव्हा लोक असे वागतात तेव्हा आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी घ्यायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे, हा पूर्णपणे तिचा दृष्टिकोन आहे. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा नकळतच तिने आपल्याबद्दल केलेल्या कल्पना मग त्या खऱ्या असो किंवा नसो त्या आपण स्वीकारत असतो. तर आपण हे पर्सनली घेणं थांबवायला हवं. 
आपल्याबद्दल इतरांचा दृष्टिकोन आपण कसे आहोत हे ठरवत नाही. तर आपण स्वतः स्वतः बद्दल काय विचार करतो त्यावरून आपले व्यक्तिमत्व ठरते. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ना की माणसाने घातलेले कपडे, त्याने केलेला मेकअप यापेक्षा सुद्धा तो आत मधून स्वतःबद्दल काय फील करतो त्याने त्याचं व्यक्तिमत्व जास्त ठळक होतं. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या यशाच्या फुटपट्टीतून आपल्या आयुष्याचा मोजमाप काढत असेल तेव्हा ते न स्वीकारणं हाच योग्य मार्ग असतो. 

बाकी स्वभावाला औषध नसतच.‌ आणि जी लोक यशस्वी झाल्यानंतर इतरांशी नीट वागत नाहीत त्या लोकांचे पुढे जाऊन काय होतं ते मी सांगायची गरज नाही. 
बाकी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी ती म्हणजे या प्रत्येक गोष्टी फिरून फिरून पुन्हा बाउंड्रीज सेट करण्यावर जाऊन थांबतात. नातं जवळच असो किंवा लांबच त्यामध्ये मर्यादा पाळणं हे खूप जास्त गरजेचे असतं. कारण त्या मर्यादा कटू गोष्टी टाळण्यासाठी मदत करतात. 

 जाता जाता एक सांगते, आपण कितीही म्हणालो की पुराणातली वांगी पुराणात.... तरी कुठल्याही प्रकारचे यश मिळाल्यानंतर उतू मातू नये आणि घेतलेला वसा सुद्धा टाकू नये. 
याचा साधा सरळ अर्थ म्हणजे आपण यश मिळवण्यासाठी जे कष्ट केले आहेत त्याच मार्गावर सातत्याने चालत राहावं पुढे यशस्वी होण्यासाठी... 
#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
४/८

टिप्पण्या

नीता म्हणाले…
मनापासून धन्यवाद, खुप छान लिहिले आहेस. मुख्य boundry set करण शिकवलेस. 😊
रेवती म्हणाले…
योग्य वेळेला वाचनात आलेली post, अगदी बरोबर , thanks a lot

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी