बंधनापासून उकलल्या गाठी

बंधनापासुनी उकलल्या गाठी

आजही तेच , ती जितकी प्रयत्न करत होती, तितके तिच्या वाट्याला येणारे अनुभव रिपीट होत होते. 
शेवटी शेवटचा उपाय म्हणून तिने डोळे मिटून घेतले आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली. 
कोण आहे मी? का म्हणून पुन्हा पुन्हा तेच घडत आहे माझ्यासोबत? हव्यास, अट्टहास हा माझा पिंड नाही आणि कधीही नव्हता. मग पुन्हा तेच का? 

मनात उमटणारे सगळे प्रश्न धडा वाचत असल्यासारखे विचारून ती मोकळी झाली. 

काही वेळ आजूबाजूला आणि मनातही एक निशब्द शांतता पसरली. ती शांतपणे त्या शांततेला शरण गेली. पट्टीचा पोहोणारा कसा आधी पाण्यात भरपूर हातपाय मारून शरीराला थकवतो आणि मग नंतर शांतपणे शरीर सैल सोडून पाण्यावर तरंगत राहतो. तसंच काहीसं......

हळूहळू मनाच्या पाटीवर अलगद शब्द उमटू लागले. 

- अनुभव फक्त शिकवण्यासाठी असतात हे तुझं अनुमान अगदी बरोबर आहे. आणि ते सुद्धा अनुभवातूनच आलेलं आहे. तुला असं वाटतंय की तुझे अनुभव सतत रिपीट होत आहेत. पण तू नक्की सगळे मार्ग चाचपडून बघितलेस का? तर नाही.
हे अनुभव असे आहेत, जिथे तू स्वतःची तुलना इतरांशी करतेस. आणि आमच्या दृष्टीने बघितलं तर ती तुलना अतिशय अयोग्य आहे. 

-आता ती गोंधळात पडली. म्हणजे माझं काही तरी चुकलं आहे का? असा प्रश्न तिच्या मनात आला. 

-पुन्हा चुकीचा विचार करत आहेस. तू कुठेही चुकली नाहीस. फक्त ती तुलना सोडली तर. तू शक्यतो त्या गोष्टींची अपेक्षा ठेवतच नाहीस ज्या ह्या जगात सगळ्यांना हव्या असतात. पण कधी कधी हळव्या क्षणी तुझ्या मनाला त्या गोष्टींची , त्या आयुष्याची भुरळ पडतेच. आणि साहजिकच आहे ते. मनुष्यजन्म आहे तो भुरळ पडणं हा त्याचा स्थायीभाव आहे. 

पण तुला ती भुरळ पडल्यावर हे लक्षात येत नाही की तुला त्या दिशेने जायचंच नाहीये. तुझं स्थान, तुझी जागा ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे कधीच तयार झाली आहे. 

भुरळ पडून होणारा त्रागा आणि येणारे अनुभव हे तुला हे शिकवण्यासाठी आहेत की तुला ह्या चक्रात आता पुन्हा अडकायचे नाहीये. 

त्यामुळे थोड्याशा गोष्टींवरून कधीतरी once in a while ढळणारा तोल सावरायला शिक.

एकांताला , एकटेपणाला सहजपणे स्विकारलं तर आहेस पण आता तो अजून explore करायला शिक. 

खूप काही अगम्य ,अद्भुत तुझी वाट बघत तुझ्या वाटेवर येऊन थांबलं आहे तुला फक्त त्याचं बोट पडकून पुढे पुढे चालत राहायचं आहे. 

बरंच काही शिकली आहेस पण तरीही खूप काही शिकायचं बाकी आहे. 

तुझ्या त्या आवडत्या हॅरी पॉटरच्या पहिल्या भागात बघ हॅरी डंबलडोरला विचारतो की ,परीस तर वॉल्डमॉर्ट ला हवा आहे, मग माझ्याकडे कसा आला? 
तेव्हा ते काय उत्तर देतात तेच उत्तर तुझ्या परिस्थिती ला सूट होतं
"परीस त्याला हवा आहे मान्य त्याला तो कसा आणि कुठे वापरायचा हे माहीत आहे हे सुद्धा मान्य. पण परीस कसा आणि कुठे वापरायचा हे ज्याला माहीत असूनही तो त्या परिसाचा वापर करायची इच्छाही मनात ठेवत नाही तोच खऱ्या अर्थाने त्या परिसाचा मालक आहे."

शेवटी एवढंच सांगतो last but not least,
जगाच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा अट्टहास करू नकोस. तू वेगळी होतीस, आहेस आणि राहशील. 
Accept it ,after all हे तू कमावलेलं आहेस. 

असं म्हणत तो सुखसंवाद थांबला. 

आणि तिच्या कानात एक सुमधुर स्वर ऐकू येऊ लागला 

येणे सोसे मन झाले हावभरी 
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

(अभंग - संत तुकाराम
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
गायिका (स्वतंत्र वेगळी चाल) - किशोरी अमोणकर ) 
कुणाच्याही आवाजातील ऐका दोन्हीही अप्रतिम🤗❤️

बाकी? बाकी काय आनंदाचे डोही आनंदतरंग!!!

#अनुभवाच्या_पोतडीतून
#treasures_inside_you 
#स्वतःमध्ये_लपलेला_खजिना
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी