अध्यात्म म्हणजे काय ? भाग १

#अध्यात्म_म्हणजे_काय_? भाग १

आपण लहानपणापासून काही विशिष्ट आणि ठराविक साच्यातूनच विचार करत आलो आहोत कारण आपल्याला तशीच सवय लागली आहे. आणि तस बघायला गेलं तर त्यात आपली चुक आहे अस काहीच नाही. 

ओव्हरऑल  समरी काढली तर कॉमन पॉईंट हे निघतील

- स्वतःच्या आत्म्यापर्यंत प्रवास
- देवात किंवा त्या शक्तीत लीन होणे
- स्वतःच्या आत्माच्या प्रगतीसाठी 
- स्वतःमध्ये सकारात्मक विचार वाढवणे
- मृत्यू ला शांतपणे सामोरे जाणे
- देवाकडे पोहोचण्याचा मार्ग

पण हे सगळं घडून येण्याच्या मध्ये अनेक पायऱ्या आहेत. 
त्या पायऱ्या गाळून अचानक शेवटच्या टप्प्यात नाही जाता येत. 

त्या पायऱ्या कोणत्या? 
* आपली स्वतःप्रति असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या 
- हो स्वतः, मी , ह्या मी ला विसरून "त्या"च्यापर्यंत पोहोचणे इतके सोपे नसते आणि ते सहज शक्य ही नसते. 
आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तो कुठलीही एकच गोष्ट करण्यासाठी नाही. तर अनेक गोष्टी करत स्वतःची प्रगती करण्यासाठी. 
मी ला विसरणे म्हणजे स्वतःच्या सगळ्या चांगल्या वाईट गुणांकडे डोळेझाक करणे. 
मी खरा कसा आहे? हे ज्याला कळले तोच आणि तोचच स्वतःच्या दुर्गुणांवर काम करू शकतो. 

मी एक टास्क दिला होता स्वतःच्या चुका मान्य करण्याचा.

का करायचं होतं?  कारण हीच पहिली पायरी होती स्वतःकडे जाण्याची. आधी त्या आतल्या खऱ्या मी ला तर भेटा मग पुढच्या गोष्टी बघू. 

कॉमन चुका किंवा दुर्गुण बघू
- नकारात्मक विचार करणे आणि पसरवणे
- दुसऱ्याला जज करणे
- ईर्षा
- तिरस्कार
- वाईट भावना 
- अहंकार

ह्या आणि अजून काही कॅटेगरी आहेत ह्यामध्ये आपल्या कळत नकळत केलेल्या चुका, दुर्गुण मोडतात. 

किती जणांना हे जमलं ? तुमचं तुम्ही ठरवा. 

* आपल्या जवळच्या लोकांप्रती असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या
- आपल्याशी कोणत्याही कारणांनी जोडलेल्या लोकांप्रती आपली काही कर्तव्य असतात. आणि स्वतःची अध्यात्मिक प्रगती करताना त्यातल्या कुठल्याही बाबतीत हयगय केलेली "त्या "लाही आवडत नाही. 

मग बरेच जण म्हणतात की सगळं त्यांच्यावर सोपवून टाकायचं. टाका न , नक्की सोपवा पण त्याआधी एक गोष्ट स्वतःला विचारा की मी अस वागल्याने देव किंवा ती शक्ती माझ्या अध्यात्मिक प्रगतीला सहाय्यक ठरेल का? की मी अजून एक चूक करतोय? 

मी खूपदा सांगते असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. जस युगे बदलली आहेत, माणूस बदलला आहे तसेच वरूनही काही गोष्टी बदलल्या आहेत. बदलल्या म्हणण्यापेक्षा त्या आधीपासूनच तशाच होत्या. ज्या व्यक्ती स्वतःची मदत करण्यासाठी कष्ट घेतात, मेहनत घेतात त्यांना हमखास मदत मिळते, मार्ग सापडतो. 

सो फर्स्ट हेल्प युअरसेल्फ अँड अदर्स ऑल्सो. 

* इतर कुठल्याही जीवाबद्दल मनात वाईट विचार न येऊ देणे. 

जमतं? स्पष्ट उत्तर आहे नाही. 

मग आपण कसे काय पुढे जाणार? 

वाईट विचार हे कुठल्याही प्रकारचे असू शकतात.

उदाहरणार्थ -  अगदी कॉमन फेसबुक फ़्रेंड च्या पोस्टवर xyz अनोळखी व्यक्ती अस का बोलली? मग त्याबद्दल मत बनवायचं आणि वाटत सुटायचं. 
कशासाठी? तुम्ही त्या व्यक्तीला किंवा ती तुम्हाला खाऊ घालतेय का? मग सोडा 

सोडून देणं , let go  करणं जमलंय का मला? 

लेट ईट गो , जाऊदे 

मला का नाही जमत घरात , बाहेर सगळीकडे तटस्थ न्यूट्रल जगणं. 

माझ्यासाठी जे योग्य आहे ते घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. 

अगदी आपले सो कॉल्ड कुणी शत्रू असतील तर त्यांच्याकडूनही योग्य ती शिकवण धडा घ्यायचा आणि स्वतःला सुधरवायच. 

लीन होणं ह्यालाच म्हणत असावेत कदाचित.

जो जो जयाचा घेतला मी गुण 
तो तो म्या केला गुरू जाण


* सकारात्मक विचार वाढवणे , कृती वाढवणे 

हे होतय का?? 

 मेडिटेशन, जप मी केला पण मी कुठेही कुठलीही चांगली गोष्ट बोलले नाही, वागले नाही तर माझं कर्म काय परतून माझ्याकडे आणेल? 

सकारात्मक विचार तर हवाच तसा माईंडसेटही हवा पण अस करताना वास्तवाला नाकारायच नाही. 

फॉर eg. माझं एक काम सुरू आहे मला माहित आहे की मी ते कसं केलं आहे. पण ज्या कारणासाठी ते केलं आहे ते बघितल्यावर मला अंदाज येतो की, माझ्याकडून काही गोष्टी सुटल्या आहेत. त्यामुळे आता मला अपेक्षित यश मिळणार नाही. अशावेळी मी सत्य स्वीकारून जर दुसरे पर्याय शोधायची त्याती ठेवली तर त्याला म्हणता येईल सकारात्मक विचारसरणी. 

पण जर मी नुसतच म्हणत बसले की सगळं नीट होईल तर अर्थातच ते आपोआप घडणार नाही. कारण इथे मी वास्तव स्विकारतच नाहीये. 

सेम गोष्ट अध्यात्म सांगते आधी सर्व बाजूनी स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करा आणि मग अपेक्षित गोष्टींची अपेक्षा बाळगा. 

कारण हे सगळं कनेक्टेड असतं. 

* मला काही माहीत नाही

आपल्याला सगळ्यांनाच अगदी प्रत्येक माणसाला अस वाटत असत की मला सगळं माहीत आहे. 
पण खरंच जगातील सगळ्या गोष्टी कळण्याची, माहीत असण्याची गरज असते का? 

कधी कधी छोटासा अनुभवही आयुष्य बदलून टाकतो आणि कधी कधी मोठ्यात मोठी गोष्ट घडूनही काहीच फरक पडत नाही. 

अशा वेळी आपल्याला सगळंच कळण्याची गरज नसतेच. आयुष्य आनंदी, सुखी करणे हे आपल्याच हातात असते. त्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये आतून बदल घडवावे लागतात. 
आणि त्यात वेळ जाऊ द्यावा लागतो.


* आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा 

रूढी, परंपरा , चालीतीरी 

ह्या गोष्टी प्रत्येक भागातील वातावरणा सोबत बदलेल्या सापडतात. 

अध्यात्म आणि धार्मिक कृत्य ह्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही अस नाही. 

पण धार्मिक कृत्य ही सामान्य माणसाला देवाच्या , योग्य गोष्टींच्या दिशेने वळवण्यासाठी तयार केलेला मार्ग आहेत. 

ती पार पाडत असताना मात्र मनाची आणि पर्यायाने शरीराचीही शुचिता(शुद्धता) अपेक्षित असते. 

आपल्याला श्रद्धा, विश्वास , संयम शिकवण्यासाठी काही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या आयुष्यात करण्यात आला होता.                         

*अध्यात्म मार्गावर अनुभव येण्याची अपेक्षा सगळ्यांनाच असते. पण ही गोष्ट प्रत्येकाच्या पूर्वसंचितावर आणि आत्ताच्या कर्मांवर अवलंबून असते. 

त्यात कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही.

हा प्रवास सुरू करताना आपल्याला आपल्या सगळ्या चुकीच्या सवयींना सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 

आपोआप काहीही घडून येत नाही. 

मी रागवत नाही म्हणायचं आणि मनातल्या मनात समोरच्या व्यक्तीला शिव्या द्यायच्या ह्याला कंट्रोल म्हणत नाहीत. 

मनातल्या भावना स्विकारायला आणि बदलायला जमलं पाहिजे. अवघड असते अशक्य नाही.

इतर लोकांना त्यांच्या वागणुकीला आहे तस स्विकारता यायला हवे. कसलीही कमेंट मनात सुद्धा न करता स्वीकार करायचा. 

अपेक्षा न ठेवता चांगली वर्तणूक करायची पण ह्याचा अर्थ असा नाही की स्वतःची पूर्ण किंमत कमी करून घ्यायची. 

लक्षात घ्या हे कलियुग आहे. इथे तुम्ही आधी स्वतःचा आदर करायला हवा. अस जर तुम्ही करत नाही आहात म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या त्याच्या अंशाचा अपमान करत आहात. 

विनम्रता आणि दुबळेपणा ह्यातला फरक ओळखून वागायचं. 

काही मुद्दे प्रायमरी लेव्हलवर आहेत काही अजून येतील. 

पण आत्तासाठी एवढं बास. 

बाकी #दत्तात्रेयार्पणमस्तू!!!

शुभं भवतु!!!

क्रमश: 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
योग्य मार्गदर्शन
अनामित म्हणाले…
सहमत आणि खूप खूपच पटलं.
अनामित म्हणाले…
इतकं छान समजावून सांगितलेलं मी तरी अजूनपर्यंत पाहिले, ऐकले नव्हते. खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी