#मीच_चांगलं_वागायचं_का?

#मीच_चांगलं_वागायचं_का?
नेहा नव्यानेच आली होती सोसायटीमध्ये. अजून कुणाशी फारशी ओळख नव्हती त्यामुळे ती शांतच असायची. हळूहळू मुलांना खाली खेळण्यासाठी नेल्यानंतर ओळखी होऊ लागल्या. तरीही आपण नवीन आहोत याचं भान ठेवून ती वावरत असे. तशीही तिला इकडंच तिकडे करण्याची सवयही नव्हती.
रोज सगळ्यांसोबत गप्पा मारल्या जाऊ लागल्या. लवकरच  तिला वॉट्सअप्प ग्रुपमध्ये पण घेतलं. पण राहून राहून तिला एक गोष्ट खटकायची घरात असो किंवा बाहेर सगळीकडच्या व्यक्तींबाबत बोलणं सुरू झालं की जास्तीत जास्त जणींचा सूर असायचा #मीच_चांगलं_वागायचं_का? नेहाला समजयचंच नाही की अस का?? म्हणजे इतर सर्वांसारखेच तिच्या घरातही मतभेद, वाद होतेच नाही असं नाही पण तिला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता किंवा तिने शोधला होता अस म्हणूया. मग हळूहळू तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या जणींचा मूळ प्रॉब्लेम #मीच_चांगलं_वागायचं_का? हा नसून कुणीच माझं कौतुक करत नाही हा आहे. आणि खरं तर तो अनंत काळापासून स्त्रियांच्या बाबतीतील मोठ्ठा प्रश्न आहे.
होतं काय सणवार म्हटलं की 3,4 जणी एकत्र येतात बरं तिथे त्या एकमेकींना मदत करण्याऐवजी कुरघोडी कशी करता येईल हाच विचार जास्त करत असतात. मग पुढे जाऊन त्याची परिणीती एकमेकींना टोमणे मारणं, कामात अडथळे निर्माण करणं सुरू होतं. परिणामी कामं बिघडतात , घरातलं वातावरण बिघडतं. आनंदाचे चार क्षण एकत्र घालविण्यासाठी आलेली मनं खट्टू होऊन दूर जातात. पुरुषांचं काय त्यांना वेळ मारून  नेण्याशी मतलब असतं त्यामुळे काही ठिकाणी मन मारून वर्षानुवर्षे हे सगळं असंच चालू राहतं. काही ठिकाणी जिथे एखाद्याचं अरेरावी वागणं इतरांना असह्य होतं तिथं फाटे फुटतात. चूक कुण्या एकाचीच असते असे वरवर पाहता सगळे दाखवतात. पण प्रत्यक्षात मात्र सगळेच कळत नकळत त्यात सहभागी असतात. साधी सोपी गोष्ट असते जी करता येते. ती म्हणजे थोडंसं गोड बोलून प्रत्येकाला आपण महत्वाचे आहोत हे जाणवून देणं.

का जमत नाही हे आपल्याला??? प्रत्येक घरात, समाजात दोन प्रकारचे लोक असतात
एक जे प्रत्येक गोष्टीत अरेरावी, आकांडतांडव करून सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे घडवून आणतात. कधी कधी हे करण्यासाठी हव्या त्या पद्धतीही वापरतात. मग त्यात कुणाला बोलून दुखावणे असो किंवा न बोलता. असे लोक कितीही सगळ्यांमध्ये मिसळल्या सारखे वाटत असले तरी मनाने मात्र कोसो दूर असतात. कारण त्यांना सुख वाटण्यापेक्षा दुःख वाटण्यात जास्त रस असतो. अर्थात कधीनकधी त्यांना त्याचं फळ मिळतच. असो

आता दुसऱ्या प्रकारचे लोक हे आपले गुपचूप आपलं काम भलं नि आपण भले असे असतात. इतर लोक ह्यांच्याशी वाईट वागतात तेंव्हा ह्यांना वाईट वाटतं, प्रसंगी रागही येतो. पण मुळात पिंड सगळं सहन करण्याचा असल्याने वेळ मारून नेत राहतात. मग हळूहळू ह्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ह्यांना गृहीत धरून चालण्याची सवय लागते. ती जेंव्हा टोकाला जाते तेंव्हा हे लोक जागे होतात पण तोपर्यंत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलेलं असतं. आता ह्यांच तोंड उघडणे इतरांना त्रासदायक वाटू लागतं आणि मग शेवटी कित्ती वाईट आहेत असा शिक्का माथी बसतो. 🤦

ह्याव्यतिरिक्त ही एक जमात अस्तित्वात आहे पण ती फटकळ, माणुसघाणी ह्या कॅटेगरी मध्ये असते. अशी लोकं शक्यतो खऱ्याला खरं नि खोट्याला खोटं च अस ठणकावून वागत असल्याने त्यांना जनरली सण उत्सव समारंभ अशा ठिकाणी मनापासून वेलकम नसतं. आणि ते पोहोचले तरी सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी बाकी लोक एकत्र येतात😄

तर कुणी म्हणेल ह्या सगळ्याचा नेहाच्या प्रश्नाशी काय संबंध? आहे आहे करते एक्सप्लेन नेहाने ही थियरी आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी लागू करत लोकांचे स्वभाव लक्षात ठेवले. त्यामुळे झालं काय कुणाशी कसं वागलं की वाद टाळून सगळं गोड होतं हे तिला कळालं. अर्थात हे काही तिचं स्वतःचं ज्ञान नव्हतं तर तडकू, सनकी अशा आपल्या पणतीला पणजी आजीने सासरी जाण्याआधी हळूच दिलेला कानमंत्र होता. इतर कुणाचं काही न ऐकणार्या नेहाला आजीने आधी हा प्रयोग घरातच करायला लावला. सुरुवातीला तिला काहीच पटलं नव्हतं पण ट्राय करू म्हणून तिने जन्माला आल्यापासून सतत तिच्यावर नाराज असणाऱ्या घरातल्या काही लोकांबाबत आपलं वागणं बदललं. उदा. जी काकू तिला बघितलं की चिडचिड करायची तिच्या ड्रेसिंग सेन्सपासून ते प्रत्येक गोष्टीला दाद देणं नेहाने सुरू केलं. दाद द्यायची म्हणजे नुसतं काहीही बोलायचं नाही हं तर अगदी क्षुल्लक गोष्ट नोटीस करून सांगायची. जड तर गेलंच नेहाला आणि ते पचवताना काकुलाही पण आठवड्यात फरक जाणवला. शॉपिंगला गेल्यावर नेहासाठी काहीही उचलून आणणाऱ्या काकूने तिच्या आवडत्या रंगाचा स्कार्फ आणला चक्क. ही बघितल्यावर नेहाला सवयच लागली सगळीकडे हा फंडा वापरायची. त्याचा फायदा असा झाला की आपलं लेकरू इतकं गुणी कसं झालं अचानक ह्यामुळे आईबाबा कन्फ्युज होऊनही खुश झाले. आणि नेहा तिला तर अलिबाबाची गुहाच सापडली. कारण ज्या लोकांमुळे आनंदाच्या क्षणीही तिचा मूड जायचा आता त्याच लोकांसोबत राहून तिला आनंद साजरा करता येत होता. हे सगळं सुरू असताना आजी गालातल्या गालात हसत तिला एकच प्रश्न विचारायची काय मग नकटु आता म्हणशील का ? #मीच_चांगलं_वागायचं_का?😉
आजीचा हा कानमंत्र इतर मैत्रिणींबरोबर शेयर करायचं तिने ठरवलं. त्यातल्या त्यात ज्या तिला प्रॉमिसिंग वाटल्या त्यांना तिने चहाच्या निमित्ताने बोलावून सहज बोलता बोलता सुचवलं. 15 जणी होत्या त्यातल्या 5 जणींनी लगेच हे वापरून बघायचं ठरवलं त्यातील चौघीना आठवड्यात थोड्याफार फरकाने हवे तसे प्रतिसाद मिळाले मग काय त्यांनी इतरांना सांगताच त्याही ट्राय तर करू म्हणून कामाला लागल्या. अर्थात हे सर्व करताना प्रत्येक वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळेलच अस नाही हे सांगायला नेहा विसरली नव्हती. कारण प्रत्येक व्यक्ती , तिचा स्वभाव, त्यावेळेसचा मूड, परिस्थिती ह्यावर तिची प्रतिक्रिया अवलंबून असणार होती. कधी कधी कौतुकाऐवजी आधारासाठी हात पुढे करण्याची गरजही पडणार होती तर कधी फक्त एक मनापासून मिळणारी मूक साथही सगळं नीट करू शकत होती. हे सगळं जाणून घेत पाऊल टाकलं तर नाती निभावताना निदान गोष्टी सुसह्य होतील हे मर्म कळालं तर आनंदी आनंद होणार होता.
मग मंडळी आम्ही बायका तर हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे असे गोंधळ घालतच राहणार आहोत. पण तुमचं काय तुम्हाला कळलं असेलच ना तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते😉😉 जसं हा लेख वाचताना बऱ्याच मैत्रिणींनाही कळलं आहे. कारण मुळात गम्मत अशी होते की आपण माणसं परिस्थितीनुसार कॅटेगरी बदलत असतो अहो 😆😆 एकाच  कॅटेगरीत कुणीच नसतं आयुष्यभर. कधी आपण असे वागतो तर कधी तसे. फक्त चांगलं वागण्यात सातत्य ठेवण अवघड जातं सगळ्यांनाच. आणि मग ओठावर नकळतच प्रश्न येतो #मीच_चांगलं_वागायचं_का?😉😉
आता हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं बरं का!!
बाकी कसेही वागलात तरी त्याचे परिणाम आपल्यावरच होतात त्यांना वेलकम करण्याची तयारी ठेवत मजा करा.

बाप्पाच्या आगमनाने एक सकारात्मक सुरुवात तुमच्या , माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यात होवो ही सदिच्छा.
बाकी ??? दत्तात्रेयार्पणमस्तू ♥️♥️ शुभं भवतू!!!

#गौरीहर्षल #१४.९.२०१८

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Khupach sundar mahiti tai
Kharach asach wagayla hawa

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी